शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

बरलोटा रुग्णालयात तोडफोड, मारहाण

By admin | Updated: October 19, 2015 00:15 IST

महिलेच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी येथील महादेव मंदिर रोडस्थित बरलोटा हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी तोडफोड केली.

महिलेचा मृत्यू : हलगर्जीपणाचा आरोप यवतमाळ : महिलेच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी येथील महादेव मंदिर रोडस्थित बरलोटा हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी तोडफोड केली. यावेळी डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचाही आरोप आहे.डॉ. पीयूष बरलोटा यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी जितेंद्र वीरदंडे, पत्रकार विवेक गावंडेसह पाच ते सात जणांविरुद्ध भादंवि १४३, १४४, १४७, ४२६, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तर गावंडे यांनीही पोलिसात तक्रार दाखल केली असून डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. मात्र त्यांची तक्रार चौकशीत ठेवण्यात आली आहे. वर्षा सुधीर डंभारे (२५) रा.येळाबारा असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा मृत्यू नागपूर येथे उपचारादरम्यान झाला. आज तिच्या मृतदेहासह नातेवाईक बरलोटा हॉस्पिटलमध्ये धडकले. याप्रकरणी मृताचे पती सुधीर डंभारे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार लग्नाला चार वर्षे होऊनही मुलबाळ होत नसल्याने त्यांनी डॉ. सुरेखा बरलोटा यांची ट्रिटमेंट घेतली. त्यानंतर दोष दूर होऊन सुधीर यांची पत्नी गर्भवती राहिली. तिला आठ महिने पूर्ण झाले होते. तपासणीसाठी १ आॅक्टोबरला तिला डॉ. बरलोटा यांच्याकडे नेले होते. त्यांनी सोनोग्राफी सांगितली. २ आॅक्टोबरला रिपोर्ट पाहून वर्षाच्या पोटातील पाणी कमी झाले आहे, गर्भाच्या गळ्याला नाळ गुंडाळली असून लगेच सिझर करावे लागेल, असे सांगितले. त्याच दिवशी दुपारी सिझर केले गेले. मात्र दुसऱ्या दिवशीपासून बाळ व बाळंतीण या दोघांचीही प्रकृती बिघडत असल्याचे डॉक्टरने सांगितले. दरम्यान, प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांनी ५ आॅक्टोबर रोजी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नवजात बाळाला खासगी रुग्णालयात ठेऊन वर्षाला नागपूरला हलविले गेले. तेथे उपचारादरम्यान १३ आॅक्टोबरला वर्षाचे निधन झाले. डॉक्टरांनी नागपूरला रुग्ण हलविण्यासाठी स्वत:च २५ हजार व अ‍ॅम्बुलन्स दिली, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप सुधीर डंभारे यांनी केला आहे. यातील नवजात बालिकाही १३ आॅक्टोबर रोजी मरण पावली. याप्रकरणी डॉ. सुरेखा बरलोटा म्हणाल्या, वर्षाच्या सिझरनंतर सर्व काही ठिकठाक होते. मात्र नंतर श्वास घेण्यास त्रास झाल्याने तज्ज्ञांना दाखविण्यात आले. रिस्क नको म्हणून नागपूरला नेण्याचा सल्ला दिला. ५ आॅक्टोबरला वर्षाला नागपूरला हलविले गेले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी आपल्याशी कोणताही संपर्क साधला नाही. गेल्या १२ दिवसात वर्षावर काय ट्रिटमेंट करण्यात आली, याची आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचा माझ्यावर दोष कसा, असा प्रश्नही डॉ. सुरेखा यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)