शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

५८ हजार शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज नाकारले

By admin | Updated: June 13, 2016 00:49 IST

खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील तब्बल ५८ हजार नवीन सभासद शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला आहे.

नवीन सभासद : खरिपात शेतकरी सापडले आर्थिक कोंडीत यवतमाळ : खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील तब्बल ५८ हजार नवीन सभासद शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले असून आता खरिपाची पेरणी कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे पडला आहे. नवीन सभासदांना कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेकडे निधी नाही, तर राष्ट्रीयकृत बँका कर्ज वितरणास टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे.हवामान खात्याने चांगल्या पावसाचे यंदा संकेत दिले. वार्षिक सरासरीच्या १२० टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने खरिपासाठी मशागत केली. त्यासोबतच बँकांकडे कर्जाची मागणी केली. परंतु यावर्षी सुरुवातीपासूनच पीक कर्जात बँका अडवणुकीचे धोरण अवलंबिल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात चार लाख १२ हजार शेतकरी सभासद आहे. २०१५ मध्ये एक लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते. त्यापैकी एक लाख तीन हजार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली. इतर शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. यामुळे या शेतकऱ्यांना कर्जपुनर्गठणाशिवाय पर्याय नाही. तर दुसरीकडे बँकांनी नवीन सभासद शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. जिल्ह्यात तब्बल ५८ हजार नवीन सभासद शेतकरी आहे. परंंतु त्यांना कर्ज मिळाले नसल्याने या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.नवीन सभासदांना कर्ज वाटण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे निधी नसल्याचे सांगितले जाते. तर राष्ट्रीयकृत बँकांकडे निधी असतानाही कर्ज वितरणास टाळाटाळ करीत आहे. यामुळे नवीन सभासदांना कर्ज मिळणार की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी झालेल्या बँकर्सच्या बैठकीत नवीन सभासदांना कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले. कर्ज वितरण वेळेपूर्वी पूर्ण करू असे या बैठकीत सांगण्यात आले. मात्र या बँका हा शब्द कितपत पाळतात यावर शेतकऱ्यांना शंका आहे. विशेष म्हणजे या बैठकीत बँकांच्या व्यवस्थापकांनी लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही बैठक बँक व्यवस्थापक किती गांभीर्याने घेतात यावरही कर्जाचे गणित अवलंबून आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही तर लोकप्रतिनिधी कोणते पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर वार्ताहर)