शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

गणवेशाच्या खात्याला बॅँकांच्या दंडाचा घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:16 IST

बँक खाती तयार नसल्याने जिल्ह्यातील ८१ हजार विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहेत. तर ज्या ७८ हजार विद्यार्थ्यांनी खाते उघडले, त्यांना बँकेकडून ‘मिनिमम बॅलेन्स’ न ठेवल्याच्या कारणाने दंड बसत आहे.

ठळक मुद्देदीड लाख विद्यार्थी गोत्यात : ४०० च्या अनुदानासाठी दोन ते पाच हजार ‘मिनिमम बॅलेन्स’चा निकष

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बँक खाती तयार नसल्याने जिल्ह्यातील ८१ हजार विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहेत. तर ज्या ७८ हजार विद्यार्थ्यांनी खाते उघडले, त्यांना बँकेकडून ‘मिनिमम बॅलेन्स’ न ठेवल्याच्या कारणाने दंड बसत आहे. ४०० रुपयांच्या गणवेशासाठी चक्क दोन ते पाच हजार रुपयांचे बॅलेन्स ठेवण्याची वेळ गोरगरीब पालकांवर येत आहे. साहजिकच असा ‘बॅलेन्स’ न ठेवल्याने जमा झालेले ४०० रुपये दंडातच कपात होत आहे. मात्र, शिक्षण विभाग याबाबत अनभिज्ञ असल्याचा आव आणत आहे.सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत मिळणारा गणवेश यंदा शासन, शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षक, पालक आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसाठीही फसवे गाजर ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या १ लाख ५९ हजार ५११ लाभार्थी विद्यार्थी आहेत. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरपर्यंत केवळ ७८ हजार १२० विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्यात आलेली आहे. त्यापैकी गणवेश पावत्या सादर करणाºया केवळ ४२ हजार १२८ विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी ४०० रुपये जमा करण्यात आले. तर उर्वरित ३५ हजार ९९२ विद्यार्थ्यांनी गणवेश घेतला की नाही, याची खात्री शिक्षण विभागातील अधिकाºयांनाही देणे अशक्य झाले आहे. शिवाय, ८१ हजार ३९१ विद्यार्थी अद्यापही बँक खातेच उघडू शकलेले नाही. अशा १ लाख १७ हजार ३८३ विद्यार्थ्यांना अर्धे सत्र उलटल्यावरही गणवेश मिळालेला नाही.ज्या ४२ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात शिक्षण विभागाकडून ४०० रुपये जमा करण्यात आले, त्यांच्यापुढे बँकांच्या नियमामुळे नवेच संकट उभे झाले आहे. गणवेशाच्या अनुदानासाठी शासनाने विद्यार्थी आणि त्याचा पालक या दोघांचे संयुक्त खातेच उघडण्याचे निर्देश दिले आहेत. मुळात हे खाते उघडण्यासाठीच ५०० रूपयांची जमा ठेवण्यास बँकेकडून सांगितले जात आहे. काही बँकांनी संयुक्त खाते ‘झिरो बॅलन्स’वर उघडले. मात्र, या खात्यात ‘मिनिमम बॅलन्स’ ठेवण्याचा बँकांचा नियम आहे. साहजिकच बहुतांश विद्यार्थ्यांच्या खात्यात मिनिमम बॅलन्सची मर्यादा पाळण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या खात्यातून ५० रुपयांपर्यंत दंडाची कपात केली जात आहे. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांचे खाते स्टेट बँकेत आहे. या बँकेच्या नियमानुसार, ग्रामीण शाखेसाठी २ हजार, शहरी शाखेतील खात्यासाठी ३ हजार रुपये, तर महापालिका क्षेत्रात ५ हजार रुपये ‘मिनिमम बॅलन्स’ ठेवणे आवश्यक आहे.४०० रुपयांच्या गणवेश निधीसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना आपल्या खात्यात २ हजार रुपये ‘मेन्टेन’ करणे आवश्यक झाले आहे. ते कोणत्याही विद्यार्थ्याने न केल्यामुळे त्यांच्या ४०० रुपयांच्या निधीतून ५० रुपयांपर्यंतची कपात केली जात आहे. शिवाय, खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे विड्रॉल करण्यावरही बंधने येत असल्याच्या अनेक पालकांच्या तक्रारीआहेत.