शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बोरी स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: June 20, 2016 02:17 IST

भारतीय स्टेट बँकेच्या बोरीअरब येथील शाखेचे संपूर्ण व्यवहार गेल्या १९ दिवसांपासून ठप्प पडले आहे.

बीएसएनएल सेवा कोलमडली : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेटबोरीअरब : भारतीय स्टेट बँकेच्या बोरीअरब येथील शाखेचे संपूर्ण व्यवहार गेल्या १९ दिवसांपासून ठप्प पडले आहे. बीएसएनएलची सेवा कोलमडल्यामुळे बँकेचा कोणताही व्यवहार पूर्ण होणे अशक्य झाले आहे. या परिस्थितीमुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी रविवारी येथे भेट देऊन माहिती घेतली.बोरीअरब शाखेतून परिसरातील २४ गावांचा आर्थिक व्यवहार चालतो. शेतीच्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप आणि थकीत कर्जाचे पुनर्गठन कर्ज मंजूर करणे ही कामे तातडीने होण्याची गरज आहे. मात्र नेमक्या याच दिवसात बीएसएनएल लिंक नसल्याने बँकेचे व्यवहार ठप्प पडले आहे. गेल्या १९ दिवसांपासून बँकेत व्यवहार होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर होवून पैसे मिळत नसल्याने त्यांची एकप्रकारे अडवणूकच सुरू आहे. बियाणे खरेदी करणे कठीण झाले आहे. अनेकांचे पैसे बँकेत जमा असूनही ते मिळणे दुरापास्त झाले आहे. नगदी पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना पसंतीचे बियाणे घेता येत नाही. दारव्हा-यवतमाळ रोडवर असलेल्या बोरीअरब गावात भारत संचार निगमची नवीन फोर-जी लाईन जमिनीतून खोदकाम करून टाकणे सुरू आहे. अशावेळी जुनी चालू स्थितीत असलेली भारत संचार निगमची वायर अनेक ठिकाणी तुटली आहे. त्यामुळे बोरीअरब येथील बीएसएनएलच्या सर्वच ग्राहकांना फटका बसत आहे. त्यामुळे येथील स्टेट बँकेचे सर्व व्यवहारही १९ दिवसांपासून ठप्प आहे. यात शेतकऱ्यांप्रमाणेच कर्मचारी व सेवानिवृत्तांनाही चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. भारत संचार निगमचे अधिकारी मात्र आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यातच धन्यता मानत आहे. स्टेट बँकेचे कर्मचारी दररोज बँकेत जावून लिंक येण्याची वाट पाहतात, तर शेकडो शेतकरी बँकेत चकरा मारून त्रस्त झाले आहे. (वार्ताहर)‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ मोहिमेला फटकाबळीराजा चेतना अभियानांतर्गत सुरू असलेल्या अर्ज द्या कर्ज घ्या या मोहिमेलाही बोरीअरब येथील बीएसएनएल सेवा बंद असल्यामुळे फटका बसला. येथील स्टेट बँकेच्या शाखेत या मोहिमेसाठी रविवारी १९ जून रोजी कॅम्प घेण्यात आला. मात्र बीएसएनएल सेवा नसल्याने फटका बसला. वर्ष २०१४-१५ चे थकीत कर्जदार शेतकरी यांनी अर्ज करून त्वरित कर्जाचे पुनर्गठन व त्यातून मागील कर्जाचा हप्ता न कापण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु गेल्या पंधरवड्यापासून या बँकेचे लिंक बंद असल्याने अर्ज द्या, कर्ज घ्या अभियानातून कोणतेही काम होवू शकले नाही. या अभियानात शिवसेनेचे योगेश इलमे यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी बँकेसमोर मंडप टाकून ७८३ अर्ज पुनर्गठनासाठी जमा करून घेतले. स्टेट बँक अधिकाऱ्यांकडे मात्र एकही अर्ज केला नाही.