शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडाच्या बँक आॅफ महाराष्ट्रचा कारभार ढेपाळला

By admin | Updated: September 12, 2016 01:25 IST

येथील बँक आॅफ महाराष्ट्रचा कारभार सध्या कमालीचा ढेपाळला आहे. येथील व्यवस्थापक दिक्षीत यांची बदली ...

ग्राहक वैतागले : कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, वीज व इंटरनेट सेवा खंडित होण्याचेही प्रमाण वाढलेपांढरकवडा : येथील बँक आॅफ महाराष्ट्रचा कारभार सध्या कमालीचा ढेपाळला आहे. येथील व्यवस्थापक दिक्षीत यांची बदली झाल्याने नव्याने रूजू झालेल्या व्यवस्थापकाचे नियंत्रण कर्मचाऱ्यांवर नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक कमालीचे वैैतागले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेनंतर बँक आॅफ महाराष्ट्र ही गोरगरिब, सर्वसामान्य, शेतकरी व शेतमजुरांची बँक समजली जाते. या शाखेतील कर्मचारी ग्राहकांशी अरेरावी करून उद्धट वागणूक देत असून ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. येथील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमालीची घटली असून त्याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होताना दिसून येत आहे. बँकेत आलेल्या ग्राहकांची कामे तडकपणे निपटवून मोकळी न करता बँकेत विनाकारण गर्दी जमविली जाते. आधीच ही बँक कमी जागेत चालविली जात असल्यामुळे गर्दी झाल्यास तेथे उभेसुद्धा राहायला जागा नसते. कामाची गती वाढविल्यास गर्दी त्वरित पांगविता येते, हे बँकेला वेगळे सांगण्याची गरज नाही. कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथील ग्राहकांची हेळसांड होत आहे. या बँकेत मोठ्या प्रमाणात शहरी व ग्रामीण ग्राहकांचा भरणा असल्यामुळे बँकेत अनुभवी व कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. असे झाल्यास येथील कर्मचाऱ्यांवर वचक राहिल, असे ग्राहकांकडून बोलले जात आहे. पासबुकात एंट्री करणे, नवीन खाते उघडणे, खाते उतारे, चेक कलेक्शन, विविध कर्ज प्रकरणे, फायनान्सची कामे घेऊन विविध ग्राहक बँकेत येतात. त्यांची कामे रेंगाळत असल्यामुळे त्यांना बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहे. शेतकरी, शेतमजुर मजुरी बुडवून बँकेत कामानिमित्त येतात व त्यांना विविध कारणे सांगून परत पाठविले जाते. वृद्ध व निराधार ग्राहकांनादेखिल मनस्ताप सहन करावा लागत आहे. वृद्ध व निराधारांसाठी वेगळे काऊंटर ठेवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दररोज कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असलेल्या या बँकेत वारंवार वीज व इंटरनेट सेवा खंडित होण्याचे प्रकारही घडत आहे. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण ताटकळत राहावे लागते. असे प्रकार सध्या वाढीस लागले असून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. (वार्ताहर)