शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

बँंक निवडणुकीला सप्टेंबर उजाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदासाठी निवडणूक घोषित झाली. त्यापैकी पुसद व उमरखेडचे संचालक बिनविरोध झाले. उर्वरित १९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना लॉकडाऊनमुळे ही निवडणूक लांबणीवर पडली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली तीन महिन्याची मुदत संपली आहे. प्रत्यक्षात त्यावरून पाच महिने लोटले आहे. आता निवडणूक नेमकी केव्हा होणार याबाबत संभ्रमावस्था आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची सशर्त शिफारस : चेंडू सहकार प्राधिकरणाच्या कोर्टात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज भवितव्य आजमावित आहे. त्यांना मतदान केव्हा होते याचे वेध लागले आहे. परंतु या मतदानासाठी किमान सप्टेंबर महिना उजाडण्याचा अंदाज सहकार क्षेत्रात वर्तविला जात आहे.जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदासाठी निवडणूक घोषित झाली. त्यापैकी पुसद व उमरखेडचे संचालक बिनविरोध झाले. उर्वरित १९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना लॉकडाऊनमुळे ही निवडणूक लांबणीवर पडली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली तीन महिन्याची मुदत संपली आहे. प्रत्यक्षात त्यावरून पाच महिने लोटले आहे. आता निवडणूक नेमकी केव्हा होणार याबाबत संभ्रमावस्था आहे.महाराष्टÑ राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून बँकेची निवडणूक घेता येईल का अशी विचारणा १२ जून रोजी केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी २ जुलै रोजी रोजी प्राधिकरणाला पत्र पाठवून सशर्त निवडणूक घेण्यास ग्रीन सिग्नल दिला होता. मात्र ही निवडणूक घेत असताना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याची अट जिल्हाधिकाºयांनी घातली होती. याच पत्रात जिल्हा उपनिबंधकांचा हवाला देण्यात आला आहे. त्यात उपनिबंधकांनी सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकीला मौखिक स्थगनादेश दिल्याचे म्हटले आहे. वास्तविक ही बाब जिल्हाधिकाºयांनी उपनिबंधकांना लेखी स्वरूपात मागितली होती. तेव्हा आपल्याला हे सरकारी वकिलांनी सांगितल्याचे उपनिबंधकांनी म्हटले.उपनिबंधकांच्या या वक्तव्याची खातरजमा करण्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाने अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांना याबाबत लेखी मागितले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक स्थगितीबाबत असा कोणताही आदेश जारी केला नसल्याचे सहनिबंधकांनी कळविल्याची माहिती आहे. एकूणच प्रशासनाकडून जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान घेण्यास सशर्त ग्रीन सिग्नल मिळाला आहे. निवडणूक नेमकी केव्हा घ्यायची याबाबत प्राधिकरण विचार करीत आहे. केंद्र सरकार ३१ जुलैनंतर लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता नाही. हा लॉकडाऊन न वाढल्यास ऑगस्टमध्ये निवडणूक घेतली जाऊ शकते. लॉकडाऊन वाढल्यास सप्टेंबर उजाडू शकतो. कारण सहकारातील सर्व निवडणुकांना राज्य शासनाने सहा महिने मुदतवाढ दिली होती. ही मुदत सप्टेंबरमध्ये संपणार आहे. पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये निवडणूक घेतली जाण्याची दाट शक्यता जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात वर्तविली जात आहे.तर सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणारसप्टेंबरनंतरही जिल्हा बँक संचालक पदासाठी मतदान घेतले न गेल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी संचालक तथा उमेदवारांनी केली आहे. न्यायालयाने तीन महिन्याची मुदत दिली होती. मात्र पाच महिने होऊनही मतदान घेतले गेले नाही, असा मुद्दा उपस्थित करून न्यायालयाच्या अवमानाकडे लक्ष वेधले जाणार आहे. बँकेचे जे विद्यमान संचालक आहेत, परंतु निवडणूक रिंगणात नाहीत, त्यांची नाराजी होऊ नये म्हणून सध्या न्यायालयात जाणे टाळले जात असल्याचे सांगितले जाते. गेल्या १३ वर्षांपासून बँकेवर संचालक असलेल्या या काही (सध्या रिंगणात नसलेल्या) मंडळींना मुदतवाढीची ही स्थिती पुढेही कायम रहावी अशी सुप्त इच्छा आहे.निवडणुकीबाबत आत्ताच काही सांगता येत नाही. सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावरील निर्णयानंतरच पुढे काही करता येईल.- यशवंत गिरी, सचिव,महाराष्ट्र राज्य सहकार प्राधिकरण.

टॅग्स :bankबँक