शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

बळीराजा जलसंजीवनीत अधरपूसला भोपळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७३८ कोटी रुपये घोषित केले. मात्र या पॅकेजमध्ये महागाव तालुक्यातील अधरपूस प्रकल्पाला भोपळा मिळाला आहे.

ठळक मुद्देसापत्न वागणूक : दहा वर्षांपासून दुरुस्तीची मागणी, सिंचनाचे स्वप्न अद्यापही अपूर्णच

संजय भगत।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७३८ कोटी रुपये घोषित केले. मात्र या पॅकेजमध्ये महागाव तालुक्यातील अधरपूस प्रकल्पाला भोपळा मिळाला आहे. विशेष म्हणजे गत दहा वर्षांपासून प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली जात आहे.बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे मुख्यमंत्र्यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेचे उद्घाटन केले. जिल्ह्यातील लहान-मोठ्या १५ सिंचन प्रकल्पांसाठी पॅकेज घोषित केले. या घोषणेमुळे महागाव तालुक्यातील २० हजार शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु शासनाने घोषित केलेल्या १५ प्रकल्पात महागाव तालुक्यातील अधर पूस प्रकल्पाचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे शेतकºयांचा भ्रमनिरास झाला. आता हे अपयश कोणाचे, शासकीय अधिकाऱ्यांचे की लोकप्रतिनिधींचे यावर चर्चा होत आहे.अधर पूस प्रकल्पाची सिंचन क्षमता दहा हजार हेक्टर आहे. परंतु प्रकल्प निर्मितीपासून आतापर्यंत कधीच पूर्णक्षमतेने सिंचन झाले नाही. प्रत्येक वर्षी सिंचनात वाढ होण्याऐवजी ती कमीच होत आहे. सध्या केवळ दोन हजार हेक्टरवर सिंचन येऊन ठेपले आहे. गेल्या ३० वर्षात कधीच देखभाल दुरुस्तीसाठी पैसा आला नाही. प्रकल्पाच्या संपूर्ण लघुवितरिका मातीने बुजल्या आहेत. त्यामध्ये झुडूपे वाढली आहे. ५० किलोमीटर अंतरावरील ८० टक्के नाल्यावरील सिमेंट पाईप फुटले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रचंड अपव्यय सुरू आहे. सर्व गेट तुटले आहे. सवना, वेणी आणि पोहंडूळ या शाखेला २० किमी अंतरात मुख्य कालव्यासह त्यावरील दहा लघु वितरिका आणि तेवढ्याच उपवितरिका देखभाल दुरुस्तीसाठी दिलेल्या आहे. अशा या प्रकल्पासाठी बळीराजा जलसंजीवनी योजनेतून निधी मिळेल, अशी आशा होती. परंतु सापत्न वागणुकीचा फटका या प्रकल्पाला पर्यायाने शेतकऱ्यांना बसत आहे.कर्मचाऱ्यांचा तुटवडाएका शाखेला २२ कर्मचाºयांची गरज असताना दोन कर्मचारी येथील ५० किलोमीटरचा कारभार पाहतात. यावरूनच येथील प्रकल्पाच्या कामाचा अंदाज बांधता येतो. सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून २० वर्षापूर्वी २० कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. तो तीन वर्षापूर्वी त्रुट्या काढत काढत पाच कोटींवर आला. २० वर्षात एकाही अभियंत्याला त्रुट्यांची पूर्तता करता आली नाही. लाखो शेतकºयांच्या जिव्हाळ्याचा हा प्रकल्प कायम उपेक्षित आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही.