शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

बळीराजा जलसंजीवनीत अधरपूसला भोपळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७३८ कोटी रुपये घोषित केले. मात्र या पॅकेजमध्ये महागाव तालुक्यातील अधरपूस प्रकल्पाला भोपळा मिळाला आहे.

ठळक मुद्देसापत्न वागणूक : दहा वर्षांपासून दुरुस्तीची मागणी, सिंचनाचे स्वप्न अद्यापही अपूर्णच

संजय भगत।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७३८ कोटी रुपये घोषित केले. मात्र या पॅकेजमध्ये महागाव तालुक्यातील अधरपूस प्रकल्पाला भोपळा मिळाला आहे. विशेष म्हणजे गत दहा वर्षांपासून प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली जात आहे.बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे मुख्यमंत्र्यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेचे उद्घाटन केले. जिल्ह्यातील लहान-मोठ्या १५ सिंचन प्रकल्पांसाठी पॅकेज घोषित केले. या घोषणेमुळे महागाव तालुक्यातील २० हजार शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु शासनाने घोषित केलेल्या १५ प्रकल्पात महागाव तालुक्यातील अधर पूस प्रकल्पाचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे शेतकºयांचा भ्रमनिरास झाला. आता हे अपयश कोणाचे, शासकीय अधिकाऱ्यांचे की लोकप्रतिनिधींचे यावर चर्चा होत आहे.अधर पूस प्रकल्पाची सिंचन क्षमता दहा हजार हेक्टर आहे. परंतु प्रकल्प निर्मितीपासून आतापर्यंत कधीच पूर्णक्षमतेने सिंचन झाले नाही. प्रत्येक वर्षी सिंचनात वाढ होण्याऐवजी ती कमीच होत आहे. सध्या केवळ दोन हजार हेक्टरवर सिंचन येऊन ठेपले आहे. गेल्या ३० वर्षात कधीच देखभाल दुरुस्तीसाठी पैसा आला नाही. प्रकल्पाच्या संपूर्ण लघुवितरिका मातीने बुजल्या आहेत. त्यामध्ये झुडूपे वाढली आहे. ५० किलोमीटर अंतरावरील ८० टक्के नाल्यावरील सिमेंट पाईप फुटले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रचंड अपव्यय सुरू आहे. सर्व गेट तुटले आहे. सवना, वेणी आणि पोहंडूळ या शाखेला २० किमी अंतरात मुख्य कालव्यासह त्यावरील दहा लघु वितरिका आणि तेवढ्याच उपवितरिका देखभाल दुरुस्तीसाठी दिलेल्या आहे. अशा या प्रकल्पासाठी बळीराजा जलसंजीवनी योजनेतून निधी मिळेल, अशी आशा होती. परंतु सापत्न वागणुकीचा फटका या प्रकल्पाला पर्यायाने शेतकऱ्यांना बसत आहे.कर्मचाऱ्यांचा तुटवडाएका शाखेला २२ कर्मचाºयांची गरज असताना दोन कर्मचारी येथील ५० किलोमीटरचा कारभार पाहतात. यावरूनच येथील प्रकल्पाच्या कामाचा अंदाज बांधता येतो. सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून २० वर्षापूर्वी २० कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. तो तीन वर्षापूर्वी त्रुट्या काढत काढत पाच कोटींवर आला. २० वर्षात एकाही अभियंत्याला त्रुट्यांची पूर्तता करता आली नाही. लाखो शेतकºयांच्या जिव्हाळ्याचा हा प्रकल्प कायम उपेक्षित आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही.