शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा अभियानाची चिरफाड

By admin | Updated: June 18, 2016 02:01 IST

शेतकरी पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. बँकांमध्ये शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटना पुढे येत आहे.

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : शिक्षण विभागावर विशेष सभेचा ठराव ंयवतमाळ : शेतकरी पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. बँकांमध्ये शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटना पुढे येत आहे. जिल्ह्यात एकीकडे शेतकरी पीक कर्जासाठी त्रस्त असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून प्रशासन कोट्यवधींची उधळपट्टी करीत आहे, अशा शब्दात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी बळीराजा चेतना अभियानाची चिरफाड केली. या अभियानावर होणाऱ्या खर्चाचे विवरणही यावेळी सदस्यांनी मागितले.यवतमाळ जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. सभेला जिल्हा परिषद ुउपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांच्यासह सर्व विषय समित्यांंचे सभापती, विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते. या सभेत बळीराजा चेतना अभियानासह शिक्षण, समाज कल्याण, रोहयो, आरोग्य, पंचायत आदी विषयांवर जोरदार चर्चा झाली. शिवसेना आणि काँग्रेस सदस्यात बळीराजा चेतना अभियानावरून काही काळ खडाजंगीही झाली. बळीराजा चेतना अभियानांतर्गत किती निधी प्राप्त झाला, त्याच्या खर्चाचे विवरण सदस्यांनी सभेत मागितले. आतापर्यंत १५ कोटी रुपये मिळाले असून पाच कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. ग्राम समित्यांकडे दिलेला एक लाखांचा बहुतांश निधी अर्खित आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम समितीला अर्ध शासकीय पत्र दिले आहे. अभियानातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या कृषी तज्ज्ञांवर १९ लाख ९९ हजार खर्च झाला. माहिती खात्याला जनजागृतीसाठी ५० लाख रुपये देण्यात आले. प्रति तालुका पाच लाख या प्रमाणे तहसीलदारांना ८० लाख रुपये देण्यात आले. तालुक्यात चेतना अभियान कक्ष निर्मितीसाठी १६ लाख रुपये खर्च झाले. स्थानिक संस्था आणि भजनी मंडळावर २० लाख रुपये खर्च झाला. जिल्हा स्तरावरच्या कक्ष कंत्राटी कर्मचारी मानधन आणि साहित्य खरेदीवर ६३ लाख रुपये खर्च करण्यात आला. जनजागृतीसाठी एक कोटी १६ लाख रुपये होते. त्यापैकी एक कोटी तीन लाख खर्च झाल्याची माहिती देण्यात आली.शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांंना ३५ लाख रुपये देण्यात आले. १ हजार ४५७ शाळांमध्ये जनजागृतीवर ८० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सभागृहात सांगितले. यावरून काँग्रेस सदस्य संतप्त झाले. शेतकरी पीक कर्जासाठी वणवण भटकत आहे. आधी त्यांचा प्रश्न मिटवा, नंतर त्यांचे मनोधैर्य वाढवा, असे सदस्य म्हणत होते. जनजागृती करण्यात आलेल्या गावात शेतकरी आत्महत्या झाली का असा प्रश्न देवानंद पवार यांनी उपस्थित केला. त्यावेळी अधिकारी निरुत्तर झाले. माहिती उपलब्ध नसल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. इतक्या मोठ्या प्रमाणावर चेतना अभियानात खर्च करीत असताना शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा असा सवालही उपस्थित करण्यात आला. सभेच्या सुरूवातच दारव्हा तालुक्यातील सिंदी येथील पादंण रस्त्याच्या मुद्दाने झाली. रोहयोतून पांदण रस्ते घेता येत नसल्याची माहिती बीडीओंनी सभागृहात दिली. यावर आक्षेप घेत सदस्य अमोल राठोड यांनी शासन निर्णयाची प्रतच सीईओंच्या पुढे सादर केली. त्यानंतर उपस्थित इतर बिडीओंनाही विचारणा करण्यात आली. पादंण रस्ते घेता येत असल्याचे उत्तर त्यांनी दिले. या प्रकरणात चौकशी करून दोषी बीडीओंवर करवाईची मागणी केली. समाज कल्याण विभागाने खरेदी केले पाईप, टिनपत्रे अतिशय निकृष्ट असल्याचे सदस्यांनी सांगितले. या साहित्याची गुणवत्ता तपासण्यासाठी चौकशी नेमण्यात आली आहे. याचा अहवाल प्राप्त होताच दोषीवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)