शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

बळीराजा अभियानाची चिरफाड

By admin | Updated: June 18, 2016 02:01 IST

शेतकरी पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. बँकांमध्ये शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटना पुढे येत आहे.

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : शिक्षण विभागावर विशेष सभेचा ठराव ंयवतमाळ : शेतकरी पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. बँकांमध्ये शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटना पुढे येत आहे. जिल्ह्यात एकीकडे शेतकरी पीक कर्जासाठी त्रस्त असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून प्रशासन कोट्यवधींची उधळपट्टी करीत आहे, अशा शब्दात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी बळीराजा चेतना अभियानाची चिरफाड केली. या अभियानावर होणाऱ्या खर्चाचे विवरणही यावेळी सदस्यांनी मागितले.यवतमाळ जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. सभेला जिल्हा परिषद ुउपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांच्यासह सर्व विषय समित्यांंचे सभापती, विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते. या सभेत बळीराजा चेतना अभियानासह शिक्षण, समाज कल्याण, रोहयो, आरोग्य, पंचायत आदी विषयांवर जोरदार चर्चा झाली. शिवसेना आणि काँग्रेस सदस्यात बळीराजा चेतना अभियानावरून काही काळ खडाजंगीही झाली. बळीराजा चेतना अभियानांतर्गत किती निधी प्राप्त झाला, त्याच्या खर्चाचे विवरण सदस्यांनी सभेत मागितले. आतापर्यंत १५ कोटी रुपये मिळाले असून पाच कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. ग्राम समित्यांकडे दिलेला एक लाखांचा बहुतांश निधी अर्खित आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम समितीला अर्ध शासकीय पत्र दिले आहे. अभियानातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या कृषी तज्ज्ञांवर १९ लाख ९९ हजार खर्च झाला. माहिती खात्याला जनजागृतीसाठी ५० लाख रुपये देण्यात आले. प्रति तालुका पाच लाख या प्रमाणे तहसीलदारांना ८० लाख रुपये देण्यात आले. तालुक्यात चेतना अभियान कक्ष निर्मितीसाठी १६ लाख रुपये खर्च झाले. स्थानिक संस्था आणि भजनी मंडळावर २० लाख रुपये खर्च झाला. जिल्हा स्तरावरच्या कक्ष कंत्राटी कर्मचारी मानधन आणि साहित्य खरेदीवर ६३ लाख रुपये खर्च करण्यात आला. जनजागृतीसाठी एक कोटी १६ लाख रुपये होते. त्यापैकी एक कोटी तीन लाख खर्च झाल्याची माहिती देण्यात आली.शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांंना ३५ लाख रुपये देण्यात आले. १ हजार ४५७ शाळांमध्ये जनजागृतीवर ८० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सभागृहात सांगितले. यावरून काँग्रेस सदस्य संतप्त झाले. शेतकरी पीक कर्जासाठी वणवण भटकत आहे. आधी त्यांचा प्रश्न मिटवा, नंतर त्यांचे मनोधैर्य वाढवा, असे सदस्य म्हणत होते. जनजागृती करण्यात आलेल्या गावात शेतकरी आत्महत्या झाली का असा प्रश्न देवानंद पवार यांनी उपस्थित केला. त्यावेळी अधिकारी निरुत्तर झाले. माहिती उपलब्ध नसल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. इतक्या मोठ्या प्रमाणावर चेतना अभियानात खर्च करीत असताना शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा असा सवालही उपस्थित करण्यात आला. सभेच्या सुरूवातच दारव्हा तालुक्यातील सिंदी येथील पादंण रस्त्याच्या मुद्दाने झाली. रोहयोतून पांदण रस्ते घेता येत नसल्याची माहिती बीडीओंनी सभागृहात दिली. यावर आक्षेप घेत सदस्य अमोल राठोड यांनी शासन निर्णयाची प्रतच सीईओंच्या पुढे सादर केली. त्यानंतर उपस्थित इतर बिडीओंनाही विचारणा करण्यात आली. पादंण रस्ते घेता येत असल्याचे उत्तर त्यांनी दिले. या प्रकरणात चौकशी करून दोषी बीडीओंवर करवाईची मागणी केली. समाज कल्याण विभागाने खरेदी केले पाईप, टिनपत्रे अतिशय निकृष्ट असल्याचे सदस्यांनी सांगितले. या साहित्याची गुणवत्ता तपासण्यासाठी चौकशी नेमण्यात आली आहे. याचा अहवाल प्राप्त होताच दोषीवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)