शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

बळीराजा चेतना अभियानाला भ्रष्टाचाराचा डंख

By admin | Updated: September 18, 2016 01:22 IST

बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

१९ कोटींच्या वितरणात ७७ तक्रारी : नियुक्त संपर्क अधिकारी गावात पोहोचलेच नाहीरूपेश उत्तरवार  यवतमाळबळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. १९ कोटींच्या वितरणात गैरप्रकार झाल्याच्या ७७ तक्रारी आल्या आहेत. अभियानातील निधीबाबत पारदर्शक असण्यासाठी १०१ संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. मात्र, बहुतांश संपर्क अधिकाऱ्यांनी गावाला भेटीच दिल्या नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अभियानातून महसुली गावांमध्ये प्रत्येकी एक लाख रूपयांचा निधी वळता करण्यात आला. हा निधी गरजवंत शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना होत्या. त्याकरिता सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडीसेविका यांच्या संयुक्त बैठकीत मदत वाटपाचा निर्णय घ्यायचा होता. प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जवळच्या नातेवाईकाला मदत वितरित केली. त्याची यादी लावली नाही. ७७ तक्रारी पुढे आल्या आहेत. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मागविला आहे. या तक्रारीवर काय कारवाई झाली, याची माहिती मागविण्यात आली आहे. गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाल्यास गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी बळीराजा चेतना अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि प्रशासन लोकाभिमुख करणे यासाठी १०१ मंडळनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. याकरिता वर्ग १ आणि २ च्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. यात १६ तहसीलदार, १६ गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, खनिकर्म अधिकारी, नायब तहसीलदार, दुग्ध, नियोजन, औद्योगिक विकास महामंडळ, पुरवठा आणि विक्रीकर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या संपर्क अधिकाऱ्यांनी १३ जूनपासून महिन्यात दोन भेटी देण्याच्या सूचना होत्या. प्रत्यक्षात अनेक अधिकाऱ्यांनी भेटी दिल्याच नाही. यामुळे गावातील शेतकऱ्यांची नावे, तेथील प्रश्न आणि उपाययोजनांची माहितीच अधिकाऱ्यांना नाही. यामुळे महत्त्वाकांक्षी अभियानावर परिणाम झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कोणते पाऊल उचलतात, याकडे लक्ष लागले आहे.