शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

बळीराजा चेतना अभियानाला भ्रष्टाचाराचा डंख

By admin | Updated: September 18, 2016 01:22 IST

बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

१९ कोटींच्या वितरणात ७७ तक्रारी : नियुक्त संपर्क अधिकारी गावात पोहोचलेच नाहीरूपेश उत्तरवार  यवतमाळबळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. १९ कोटींच्या वितरणात गैरप्रकार झाल्याच्या ७७ तक्रारी आल्या आहेत. अभियानातील निधीबाबत पारदर्शक असण्यासाठी १०१ संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. मात्र, बहुतांश संपर्क अधिकाऱ्यांनी गावाला भेटीच दिल्या नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अभियानातून महसुली गावांमध्ये प्रत्येकी एक लाख रूपयांचा निधी वळता करण्यात आला. हा निधी गरजवंत शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना होत्या. त्याकरिता सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडीसेविका यांच्या संयुक्त बैठकीत मदत वाटपाचा निर्णय घ्यायचा होता. प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जवळच्या नातेवाईकाला मदत वितरित केली. त्याची यादी लावली नाही. ७७ तक्रारी पुढे आल्या आहेत. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मागविला आहे. या तक्रारीवर काय कारवाई झाली, याची माहिती मागविण्यात आली आहे. गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाल्यास गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी बळीराजा चेतना अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि प्रशासन लोकाभिमुख करणे यासाठी १०१ मंडळनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. याकरिता वर्ग १ आणि २ च्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. यात १६ तहसीलदार, १६ गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, खनिकर्म अधिकारी, नायब तहसीलदार, दुग्ध, नियोजन, औद्योगिक विकास महामंडळ, पुरवठा आणि विक्रीकर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या संपर्क अधिकाऱ्यांनी १३ जूनपासून महिन्यात दोन भेटी देण्याच्या सूचना होत्या. प्रत्यक्षात अनेक अधिकाऱ्यांनी भेटी दिल्याच नाही. यामुळे गावातील शेतकऱ्यांची नावे, तेथील प्रश्न आणि उपाययोजनांची माहितीच अधिकाऱ्यांना नाही. यामुळे महत्त्वाकांक्षी अभियानावर परिणाम झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कोणते पाऊल उचलतात, याकडे लक्ष लागले आहे.