शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

बळीराजा चेतना अभियानाला भ्रष्टाचाराचा डंख

By admin | Updated: September 18, 2016 01:22 IST

बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

१९ कोटींच्या वितरणात ७७ तक्रारी : नियुक्त संपर्क अधिकारी गावात पोहोचलेच नाहीरूपेश उत्तरवार  यवतमाळबळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. १९ कोटींच्या वितरणात गैरप्रकार झाल्याच्या ७७ तक्रारी आल्या आहेत. अभियानातील निधीबाबत पारदर्शक असण्यासाठी १०१ संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. मात्र, बहुतांश संपर्क अधिकाऱ्यांनी गावाला भेटीच दिल्या नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अभियानातून महसुली गावांमध्ये प्रत्येकी एक लाख रूपयांचा निधी वळता करण्यात आला. हा निधी गरजवंत शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना होत्या. त्याकरिता सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडीसेविका यांच्या संयुक्त बैठकीत मदत वाटपाचा निर्णय घ्यायचा होता. प्रत्यक्षात अनेक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जवळच्या नातेवाईकाला मदत वितरित केली. त्याची यादी लावली नाही. ७७ तक्रारी पुढे आल्या आहेत. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मागविला आहे. या तक्रारीवर काय कारवाई झाली, याची माहिती मागविण्यात आली आहे. गैरप्रकार झाल्याचे सिद्ध झाल्यास गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी बळीराजा चेतना अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि प्रशासन लोकाभिमुख करणे यासाठी १०१ मंडळनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. याकरिता वर्ग १ आणि २ च्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. यात १६ तहसीलदार, १६ गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, खनिकर्म अधिकारी, नायब तहसीलदार, दुग्ध, नियोजन, औद्योगिक विकास महामंडळ, पुरवठा आणि विक्रीकर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या संपर्क अधिकाऱ्यांनी १३ जूनपासून महिन्यात दोन भेटी देण्याच्या सूचना होत्या. प्रत्यक्षात अनेक अधिकाऱ्यांनी भेटी दिल्याच नाही. यामुळे गावातील शेतकऱ्यांची नावे, तेथील प्रश्न आणि उपाययोजनांची माहितीच अधिकाऱ्यांना नाही. यामुळे महत्त्वाकांक्षी अभियानावर परिणाम झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कोणते पाऊल उचलतात, याकडे लक्ष लागले आहे.