शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
5
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
6
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
7
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
8
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
9
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
10
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
11
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
12
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
13
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
14
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
15
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
16
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
17
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
18
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
19
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
20
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

बळीराजा चिंतेच्या सावटात

By admin | Updated: November 1, 2014 23:16 IST

कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेल्या आहे़ याहीवर्षी बळीराजा त्याच स्थितीतून जात आहे़ अपुऱ्या पावसाने खरीपात दगा दिला़ परतीचा पाऊस कोसळेल,

मारेगाव : कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेल्या आहे़ याहीवर्षी बळीराजा त्याच स्थितीतून जात आहे़ अपुऱ्या पावसाने खरीपात दगा दिला़ परतीचा पाऊस कोसळेल, ही आशाही फोल ठरल्याने रबी गेल्यातच जमा आहे़ त्यामुळे आता कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा आणि जनावरांच्या चाऱ्याचे काय करायचे, या चिंतेने शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे़हे वर्ष शेतकऱ्यांसाठी कंबरडे मोडणारे ठरले आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला तीन नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले़ सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडल्यावर शेतीचा हंगाम रूळावर येत असतानाच आॅक्टोबर ‘हिट’ने पिके डोळ्यासमोर वाळली़ ऐन सोयाबीन भरणीत पाणी नसल्याने सोयाबिनच्या शेंगांत दाणे भरलेच नाही़ कपाशीला बोंडे लागण्याच्या काळातच कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने आणि आॅक्टोबर तापल्याने कपाशीचे पीक हातचे गेले़यावर्षी कपाशी व सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात ५० टक्केपेक्षा जादा घट येत आहे़ त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, अशी अवस्था आहे़ अनेक शेतकऱ्यांनी तर शेतीला लावलेला खर्चही निघणे कठीण असल्याचे सांगितले. खरीप हंगाम हातचा गेल्याने रबीत तरी पीक घेऊन थोडीबहूत भरपाई काढू, या आशेवर असलेल्या बळीराजाला परतीच्या पावसाने धोका दिल्याने त्या आशाही मावळल्या आहे़ खरीपात पाऊस कमी पडल्यास, तो परतीत जोरदार बरसतो, असा वयोवृध्द शेतकऱ्यांचा अनुभव़ मात्र तो अंदाजही तालुक्यात खोटा ठरला़परतीचा तुरळक पाऊस पडल्याने जमिनी कोरड्या पडल्या आहेत़ पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे़ धरणे रिकामी होत आहेत. नाले कोरडे पडले आहे़ विहिरींनी तळ गाठलेला आहे़ त्यामुळे रबीची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़ (शहर प्रतिनिधी)