शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बाळासाहेबांना जनसमस्यांची जाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

बाळासाहेब मांगुळकर यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या आशीर्वादामुळे राजकीय कारकिर्द सुरू झाली. माजी खासदार विजय दर्डा, कीर्ती गांधी, किशोर दर्डा यांचे सहकार्य या कार्यकाळात लाभल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देकीर्ती गांधी : शेतकरी विधवांचा सन्मान, शरीरसौष्ठव स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काँग्रेस पक्षाचा अग्रणी कार्यकर्ता म्हणून बाळासाहेब मांगुळकर यांनी भूमिका बजावली आहे. तीन दशकाहून अधिक काळ निस्वार्थ सेवा करणारा हा सेवाव्रती आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्यांची जाण त्यांना आहे, असे प्रतिपादन माजी आमदार कीर्ती गांधी यांनी केले.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या एकसष्टी कार्यक्रमात ते बोलत होते. बाळासाहेब फॅन्स क्लबच्यावतीने येथील मेडिकल चौकात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकरी विधवांचा साडीचोळी आणि ब्लँकेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मंचावर जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल ठाकरे, प्रताप पारसकर, मुकेश देशभ्रतार, मिलिंद रामटेके आदी उपस्थित होते.किशोर दर्डा म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत होऊन बाळासाहेब मांगुळकर यांनी लोकांच्या मनात जागा निर्माण केली. हा पराभवानंतरही मिळालेला खरा विजय आहे. त्यांनी छोटा, मोठा असा भेदभाव न करता सर्वांची कामे केली. यामुळे त्यांचे आजही प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान आहे. काम करण्याची धडाडी, पाठपुरावा हे बाळासाहेबांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामुळे भारी या गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे, असे ते म्हणाले.राहूल ठाकरे म्हणाले, बाळासाहेब मांगुळकर यांचा मोठा जनसंपर्क आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी विविध विकास कामे केली. लोकांच्या समस्या त्यांनी गांभीर्याने घेत निकाली काढल्या. अशा या नेत्याने मोठी उंची गाठावी, असे मत नोंदविले.यावेळी बाळासाहेब मांगुळकर यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या आशीर्वादामुळे राजकीय कारकिर्द सुरू झाली. माजी खासदार विजय दर्डा, कीर्ती गांधी, किशोर दर्डा यांचे सहकार्य या कार्यकाळात लाभल्याचे त्यांनी सांगितले. बाबुजींचे विचार सदैव प्रेरणादायी राहिले असे ते म्हणाले.यावेळी गावखेड्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नगरसेवकांनी बाळासाहेबांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी केले. आभार मिलिंद रामटेके यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Girish Gandhiगिरीश गांधी