शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

बाळासाहेबांना जनसमस्यांची जाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

बाळासाहेब मांगुळकर यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या आशीर्वादामुळे राजकीय कारकिर्द सुरू झाली. माजी खासदार विजय दर्डा, कीर्ती गांधी, किशोर दर्डा यांचे सहकार्य या कार्यकाळात लाभल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देकीर्ती गांधी : शेतकरी विधवांचा सन्मान, शरीरसौष्ठव स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काँग्रेस पक्षाचा अग्रणी कार्यकर्ता म्हणून बाळासाहेब मांगुळकर यांनी भूमिका बजावली आहे. तीन दशकाहून अधिक काळ निस्वार्थ सेवा करणारा हा सेवाव्रती आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्यांची जाण त्यांना आहे, असे प्रतिपादन माजी आमदार कीर्ती गांधी यांनी केले.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या एकसष्टी कार्यक्रमात ते बोलत होते. बाळासाहेब फॅन्स क्लबच्यावतीने येथील मेडिकल चौकात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकरी विधवांचा साडीचोळी आणि ब्लँकेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मंचावर जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल ठाकरे, प्रताप पारसकर, मुकेश देशभ्रतार, मिलिंद रामटेके आदी उपस्थित होते.किशोर दर्डा म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत होऊन बाळासाहेब मांगुळकर यांनी लोकांच्या मनात जागा निर्माण केली. हा पराभवानंतरही मिळालेला खरा विजय आहे. त्यांनी छोटा, मोठा असा भेदभाव न करता सर्वांची कामे केली. यामुळे त्यांचे आजही प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान आहे. काम करण्याची धडाडी, पाठपुरावा हे बाळासाहेबांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामुळे भारी या गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे, असे ते म्हणाले.राहूल ठाकरे म्हणाले, बाळासाहेब मांगुळकर यांचा मोठा जनसंपर्क आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी विविध विकास कामे केली. लोकांच्या समस्या त्यांनी गांभीर्याने घेत निकाली काढल्या. अशा या नेत्याने मोठी उंची गाठावी, असे मत नोंदविले.यावेळी बाळासाहेब मांगुळकर यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या आशीर्वादामुळे राजकीय कारकिर्द सुरू झाली. माजी खासदार विजय दर्डा, कीर्ती गांधी, किशोर दर्डा यांचे सहकार्य या कार्यकाळात लाभल्याचे त्यांनी सांगितले. बाबुजींचे विचार सदैव प्रेरणादायी राहिले असे ते म्हणाले.यावेळी गावखेड्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नगरसेवकांनी बाळासाहेबांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी केले. आभार मिलिंद रामटेके यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Girish Gandhiगिरीश गांधी