शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कृषिपंप वीज जोडणीचा अनुशेष अखेर संपला

By admin | Updated: April 4, 2016 05:28 IST

सिंचन वाढण्यात मुख्य अडसर ठरलेला कृषिपंप वीज जोडणीचा प्रश्न आता निकाली निघाला असून वर्षभरात तब्बल १० हजार

रुपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ सिंचन वाढण्यात मुख्य अडसर ठरलेला कृषिपंप वीज जोडणीचा प्रश्न आता निकाली निघाला असून वर्षभरात तब्बल १० हजार कृषिपंपांना वीज जोडणी केल्याचा दावा वीज वितरण कंपनीने केला आहे. यामुळे सिंचनाच्या सुविधेत वाढ होणार असली तरी पुरेशी वीज मिळेल याची कोणतीही खात्री शेतकऱ्यांना नाही.यवतमाळ जिल्ह्यात गत काही वर्षांपासून कृषी पंपाच्या वीज जोडणीचा अनुशेष कायम होता. या प्रश्नावर शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलने केली. मात्र उपयोग होत नव्हता. साधारणत: तीन वर्षाचा बॅगलॉग कायम होता. शेवटी यवतमाळच्या सभेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज वितरण कंपनीला अल्टीमेटम देत ३१ मार्चपर्यंत वीज जोडण्या पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वीज वितरण कंपनी खडबळून जागी झाली. उद्दिष्टाची पूर्ती करण्यासाठी कंत्राटदार कंपनी आड येत होती. अशा कंत्राटदारांना वीज वितरणने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले. नवीन कंत्राटदारांकडे काम सोपविण्यात आले. त्यामुळे वीज वितरणच्या कामाची गती वाढली. परिणामी वर्षभरात १० हजार ५२ वीज जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. नवीन ९ हजार ९१३ अर्ज प्राप्त झाले आहे. आता त्यांचा प्रश्न वीज वितरण कंपनीपुढे निर्माण झाला आहे. धडक सिंचन विहिरींमुळे कृषिपंपासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जुन्या अर्जांची पेन्डन्सी संपत नाही तोच नवीन अर्ज वीज वितरण कंपनीत येऊन धडकले आहे. कृषीपंपाच्या वीज जोडणीची प्रतीक्षा गत तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना होती. शेतात मुबलक पाणी असले तरी विजेअभावी ओलित करणे कठीण झाले होते. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांघिक प्रयत्नातून अशक्यप्राय उद्दिष्ट शक्य केले. या उद्दिष्टपूर्तीमुळे शेतकऱ्यांना ओलित करणे शक्य होणार आहे. - विजय भटकरअधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी