शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

देश समाजवादी होण्यातच बाबासाहेबांना श्रद्धांजली

By admin | Updated: April 10, 2016 02:54 IST

ज्या देशातील धर्मग्रंथांनी शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना पापयोनी म्हटले, ज्या देशातील ७८ टक्के लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवले,

रावसाहेब कसबे : आंबेडकरी चळवळ, राजकारण, राष्ट्रवाद विषयांवर ‘लोकमत’शी दिलखुलास बातचितकाशीनाथ लाहोरे यवतमाळज्या देशातील धर्मग्रंथांनी शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना पापयोनी म्हटले, ज्या देशातील ७८ टक्के लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवले, ज्या देशातील स्त्रियांना पतीसोबत सती जाण्यास प्रोत्साहन दिले, असा भारत देश कधीही सहिष्णू नव्हता. स्त्री-पुरुषांमध्ये आणि जाती-जातीत भेद निर्माण करणारी मनुस्मृतीच राष्ट्र निर्माण होवू न देण्यात सर्वात मोठा अडथळा होती. स्त्रीने एखादा पुरुष बघितला की ती त्याला वश करून नवऱ्याशी द्रोह करणारच असा शाप मनुस्मृतीने स्त्रियांना दिला आहे. एकेकाळी अस्तित्वात असलेली ही संस्कृती पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा डाव येथे खेळला जात आहे, असे मत प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. ‘क्षण एक गौरवाचा’ या समता पर्वातील कार्यक्रमासाठी यवतमाळ येथे आले असताना ‘लोकमत’ला त्यांनी विशेष मुलाखत दिली. ते म्हणाले, रोहित वेमुला किंवा कन्हैया ही आत्मभान आलेली तरुणाई आहे. पुरोगामी तरुण आणि आंबेडकरी विचार यांच्या समन्वयातूनच जाती अंताचा विचार पक्का होवू शकतो. भारतात स्वातंत्र्यानंतर राष्ट्रवादाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, येथील जातीयवादी संघटनांचा त्याला विरोध सुरू असतो. भारताला राष्ट्र होवू न देण्यात जातीयवादी आणि धर्मवादी संघटना अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे, जे या देशाला राष्ट्र होवू देण्यास विरोध करतात तेच राष्ट्रवादाचा पुरस्कार करताना आढळतात. जे राष्ट्रवादाच्या निर्मितीत सामील आहेत त्यांनाच राष्ट्रद्रोही ठरविले जात आहे. जगात नेहमीच विवेकवादाचा विजय होवून अंधश्रद्धांचा पराभव झाला आहे. महात्मा फुलेंचा राष्ट्रवाद हा बहुजन समाजवादी राष्ट्रवाद होता, तर रामदासांचा राष्ट्रवाद हा हिंदू राष्ट्रवाद होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संदेश देताना रावसाहेब म्हणाले, भारत हा लोकशाही समाजवादी देश बनला पाहिजे, असे बाबासाहेबांचे भारत निर्माणाबाबतचे स्वप्न होते. ते वास्तवात आणण्याचा प्रयत्न करणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणार आहे.आंबेडकरी चळवळ सर्वच क्षेत्रात झिरपलेली आंबेडकरी चळवळ समजून घेण्यासाठी राजकीय पक्षांवरून मूल्यमापन करून चालणार नाही. ही चळवळ सर्व क्षेत्रात झिरपलेली आहे. आंबेडकरांच्या नावाने चालणारे पक्ष आणि चळवळी धंदेवाईक झाल्या आहेत. आंबेडकरी चळवळ ही नेहमीच परावलंबी राहिलेली आहे. नेत्यांनी तडजोडी करून समाजाची दिशाभूल केली. आंबेडकरी चळवळीला नीट दिशा देण्यात नेते मंडळी असफल ठरली आहे. यापुढे कुठल्याही जातीला पार्टी करून राजकारण करता येणार नाही. आंबेडकरी विचारांशी समविचारी असणाऱ्या पक्षांशी युती करूनच राजकीय पक्षांची स्थापना करावी लागेल आणि हे जातीचा अंत झाल्याशिवाय शक्य होणार नाही.