शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

देश समाजवादी होण्यातच बाबासाहेबांना श्रद्धांजली

By admin | Updated: April 10, 2016 02:54 IST

ज्या देशातील धर्मग्रंथांनी शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना पापयोनी म्हटले, ज्या देशातील ७८ टक्के लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवले,

रावसाहेब कसबे : आंबेडकरी चळवळ, राजकारण, राष्ट्रवाद विषयांवर ‘लोकमत’शी दिलखुलास बातचितकाशीनाथ लाहोरे यवतमाळज्या देशातील धर्मग्रंथांनी शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना पापयोनी म्हटले, ज्या देशातील ७८ टक्के लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवले, ज्या देशातील स्त्रियांना पतीसोबत सती जाण्यास प्रोत्साहन दिले, असा भारत देश कधीही सहिष्णू नव्हता. स्त्री-पुरुषांमध्ये आणि जाती-जातीत भेद निर्माण करणारी मनुस्मृतीच राष्ट्र निर्माण होवू न देण्यात सर्वात मोठा अडथळा होती. स्त्रीने एखादा पुरुष बघितला की ती त्याला वश करून नवऱ्याशी द्रोह करणारच असा शाप मनुस्मृतीने स्त्रियांना दिला आहे. एकेकाळी अस्तित्वात असलेली ही संस्कृती पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा डाव येथे खेळला जात आहे, असे मत प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. ‘क्षण एक गौरवाचा’ या समता पर्वातील कार्यक्रमासाठी यवतमाळ येथे आले असताना ‘लोकमत’ला त्यांनी विशेष मुलाखत दिली. ते म्हणाले, रोहित वेमुला किंवा कन्हैया ही आत्मभान आलेली तरुणाई आहे. पुरोगामी तरुण आणि आंबेडकरी विचार यांच्या समन्वयातूनच जाती अंताचा विचार पक्का होवू शकतो. भारतात स्वातंत्र्यानंतर राष्ट्रवादाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, येथील जातीयवादी संघटनांचा त्याला विरोध सुरू असतो. भारताला राष्ट्र होवू न देण्यात जातीयवादी आणि धर्मवादी संघटना अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे, जे या देशाला राष्ट्र होवू देण्यास विरोध करतात तेच राष्ट्रवादाचा पुरस्कार करताना आढळतात. जे राष्ट्रवादाच्या निर्मितीत सामील आहेत त्यांनाच राष्ट्रद्रोही ठरविले जात आहे. जगात नेहमीच विवेकवादाचा विजय होवून अंधश्रद्धांचा पराभव झाला आहे. महात्मा फुलेंचा राष्ट्रवाद हा बहुजन समाजवादी राष्ट्रवाद होता, तर रामदासांचा राष्ट्रवाद हा हिंदू राष्ट्रवाद होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संदेश देताना रावसाहेब म्हणाले, भारत हा लोकशाही समाजवादी देश बनला पाहिजे, असे बाबासाहेबांचे भारत निर्माणाबाबतचे स्वप्न होते. ते वास्तवात आणण्याचा प्रयत्न करणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणार आहे.आंबेडकरी चळवळ सर्वच क्षेत्रात झिरपलेली आंबेडकरी चळवळ समजून घेण्यासाठी राजकीय पक्षांवरून मूल्यमापन करून चालणार नाही. ही चळवळ सर्व क्षेत्रात झिरपलेली आहे. आंबेडकरांच्या नावाने चालणारे पक्ष आणि चळवळी धंदेवाईक झाल्या आहेत. आंबेडकरी चळवळ ही नेहमीच परावलंबी राहिलेली आहे. नेत्यांनी तडजोडी करून समाजाची दिशाभूल केली. आंबेडकरी चळवळीला नीट दिशा देण्यात नेते मंडळी असफल ठरली आहे. यापुढे कुठल्याही जातीला पार्टी करून राजकारण करता येणार नाही. आंबेडकरी विचारांशी समविचारी असणाऱ्या पक्षांशी युती करूनच राजकीय पक्षांची स्थापना करावी लागेल आणि हे जातीचा अंत झाल्याशिवाय शक्य होणार नाही.