शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

देश समाजवादी होण्यातच बाबासाहेबांना श्रद्धांजली

By admin | Updated: April 10, 2016 02:54 IST

ज्या देशातील धर्मग्रंथांनी शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना पापयोनी म्हटले, ज्या देशातील ७८ टक्के लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवले,

रावसाहेब कसबे : आंबेडकरी चळवळ, राजकारण, राष्ट्रवाद विषयांवर ‘लोकमत’शी दिलखुलास बातचितकाशीनाथ लाहोरे यवतमाळज्या देशातील धर्मग्रंथांनी शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना पापयोनी म्हटले, ज्या देशातील ७८ टक्के लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवले, ज्या देशातील स्त्रियांना पतीसोबत सती जाण्यास प्रोत्साहन दिले, असा भारत देश कधीही सहिष्णू नव्हता. स्त्री-पुरुषांमध्ये आणि जाती-जातीत भेद निर्माण करणारी मनुस्मृतीच राष्ट्र निर्माण होवू न देण्यात सर्वात मोठा अडथळा होती. स्त्रीने एखादा पुरुष बघितला की ती त्याला वश करून नवऱ्याशी द्रोह करणारच असा शाप मनुस्मृतीने स्त्रियांना दिला आहे. एकेकाळी अस्तित्वात असलेली ही संस्कृती पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा डाव येथे खेळला जात आहे, असे मत प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. ‘क्षण एक गौरवाचा’ या समता पर्वातील कार्यक्रमासाठी यवतमाळ येथे आले असताना ‘लोकमत’ला त्यांनी विशेष मुलाखत दिली. ते म्हणाले, रोहित वेमुला किंवा कन्हैया ही आत्मभान आलेली तरुणाई आहे. पुरोगामी तरुण आणि आंबेडकरी विचार यांच्या समन्वयातूनच जाती अंताचा विचार पक्का होवू शकतो. भारतात स्वातंत्र्यानंतर राष्ट्रवादाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, येथील जातीयवादी संघटनांचा त्याला विरोध सुरू असतो. भारताला राष्ट्र होवू न देण्यात जातीयवादी आणि धर्मवादी संघटना अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे, जे या देशाला राष्ट्र होवू देण्यास विरोध करतात तेच राष्ट्रवादाचा पुरस्कार करताना आढळतात. जे राष्ट्रवादाच्या निर्मितीत सामील आहेत त्यांनाच राष्ट्रद्रोही ठरविले जात आहे. जगात नेहमीच विवेकवादाचा विजय होवून अंधश्रद्धांचा पराभव झाला आहे. महात्मा फुलेंचा राष्ट्रवाद हा बहुजन समाजवादी राष्ट्रवाद होता, तर रामदासांचा राष्ट्रवाद हा हिंदू राष्ट्रवाद होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संदेश देताना रावसाहेब म्हणाले, भारत हा लोकशाही समाजवादी देश बनला पाहिजे, असे बाबासाहेबांचे भारत निर्माणाबाबतचे स्वप्न होते. ते वास्तवात आणण्याचा प्रयत्न करणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणार आहे.आंबेडकरी चळवळ सर्वच क्षेत्रात झिरपलेली आंबेडकरी चळवळ समजून घेण्यासाठी राजकीय पक्षांवरून मूल्यमापन करून चालणार नाही. ही चळवळ सर्व क्षेत्रात झिरपलेली आहे. आंबेडकरांच्या नावाने चालणारे पक्ष आणि चळवळी धंदेवाईक झाल्या आहेत. आंबेडकरी चळवळ ही नेहमीच परावलंबी राहिलेली आहे. नेत्यांनी तडजोडी करून समाजाची दिशाभूल केली. आंबेडकरी चळवळीला नीट दिशा देण्यात नेते मंडळी असफल ठरली आहे. यापुढे कुठल्याही जातीला पार्टी करून राजकारण करता येणार नाही. आंबेडकरी विचारांशी समविचारी असणाऱ्या पक्षांशी युती करूनच राजकीय पक्षांची स्थापना करावी लागेल आणि हे जातीचा अंत झाल्याशिवाय शक्य होणार नाही.