शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाबांना आम्हा तीन बहिणीच्या लग्नाची काळजी होती

By admin | Updated: February 7, 2015 01:43 IST

बाबा गेले. त्यांच्या जाण्याने प्रश्न सुटले नाही तर वाढणार आहे. आमची बाबाला काहीच मागणी नव्हती. परिस्थितीशी दोन हात करायला आम्ही बहिणी ....

महागाव : बाबा गेले. त्यांच्या जाण्याने प्रश्न सुटले नाही तर वाढणार आहे. आमची बाबाला काहीच मागणी नव्हती. परिस्थितीशी दोन हात करायला आम्ही बहिणी आणि आई तशाही शिकलोच होतो. गेल्या आठ दिवसांपासून बाबांच्या डोक्यात काही तरी वेगळा विचार सुरू असावा. मात्र ते कधी चेहऱ्यावर येऊच देत नव्हते. एवढे मात्र खरी की आम्हा तीन बहिणीच्या लग्नाची काळजी बाबाला लागली असावी आणि त्यातूनच त्यांनी या जगाचा निरोप घेतला असावा, असे डोळ्यात अश्रू आणून त्या तिघी बहिणी सांगत होत्या. महागाव तालुक्यातील भांब येथील शेतकरी आनंदराव साहेबराव पंडागळे (४५) यांनी बुधवारी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. पाच एकरात केवळ तीन क्ंिवटल कापूस झाल्याने आपल्या उपवर तीन मुलींचे विवाह कसे करावे या विवंचनेत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. नापिकी आणि कर्जबाजारीपणाने स्वत:चे सरण रचून या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. प्रस्तूत प्रतिनिधीने पंडागळे कुटुंबाची भेट घेतली असता त्यांच्या तीनही मुली डोळ्यात अश्रू आणून वडील जाण्याचे दु:ख सांगत होते. नेहा (१८), गायत्री (१५) आणि पूजा (१३) या मुलीसह पत्नी सुलोचना यांच्या समोर भविष्याच्या काळजीचे काळे ढग निर्माण झाले आहे. मोठी मुलगी नेहा म्हणाली, बाबांना एका पाठोपाठ एक लग्नाला येत असलेल्या आम्ही तीन बहिणी दिसत होतो. त्यामुळे शेतीवर जास्त भर देऊन त्यांनी अधिकचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कष्ट आम्ही अगदी जवळून पाहिले. कापसाच्या उत्पादनातून मुलीचे हात पिवळे करता येईल, असा त्यांचा विचार होता. मात्र कापसाने दगा दिला. निसर्ग साथ देत नाही. लग्नाचे दिवससुद्धा जवळ आले. काय कराव बाबांना सूचत नव्हते. यातच त्यांनी टोकाची भूमिका घेतली. संसारातून कायमची मुक्ती मिळविली. मात्र आम्ही तीन बहिणी आणि आई आता बाबाला पोरक्या झालो. नेहा हे सांगत असताना आई सुलोचनाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. ती म्हणाली, आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहायचे आत्महत्या हा काय पर्याय झाला का असे ती माऊली म्हणत होती. नेहा, गायत्री आणि पूजा या तिघीही बहिणी टेंभीच्या शाळेत शिकत आहे. वडिलांनी आत्मदहन केले त्यावेळी तिघीही बहिणी शाळेत होत्या. तर सुलोचनाबाई शेतात गेल्या होत्या. आनंदरावने घरातच दार बंद करून अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. बाबांच्या आठवणींनी या तीन बहिणी आणि आईला बोलताही येत नाही. आनंदराववर फुलसावंगी सेंट्रल बँकेचे ५० हजार तर खासगी सावकाराचे कर्ज आहे. शेतीच्या भरोश्यावर कर्ज कसे फेडायचे आणि मुलीचे शिक्षण आणि लग्न कसे करायचे या प्रश्नाचे उत्तर सापडत नसल्याने या जगाचा निरोप घेतला. (शहर प्रतिनिधी)