शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘थर्टी फर्स्ट’चा गोंधळ टाळून शेतीविषयी जागविले भान

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

जिल्ह्यात शेतीचे प्रश्न कितीही गहण बनले, शेतकऱ्यांचे जगणे कितीही मुश्कील बनले, तरीही नववर्षाच्या नावावर

यवतमाळ : जिल्ह्यात शेतीचे प्रश्न कितीही गहण बनले, शेतकऱ्यांचे जगणे कितीही मुश्कील बनले, तरीही नववर्षाच्या नावावर ‘थर्टी फर्स्ट’ला पैशाची उधळपट्टी दरवर्षीच होत आली. यंदा मात्र गरिबांच्या जखमांवर मीठ चोळणारा हा प्रकार टाळण्यासाठी लोकजागृती मंचने अनोखा उपक्रम शहरात राबविला. ज्यावेळी ‘थर्टी फर्स्ट’च्या बहाण्याने नागरिक दारूमध्ये धुंद होतात, नेमक्या त्याचवेळी जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा कार्यक्रम अनेकांच्या संवेदना जागवून गेला. यावर्षी जिल्ह्यात प्रचंड दुष्काळाची स्थिती आहे. नापिकीमुळे तब्बल ३८४ शेतकऱ्यांनी वर्षभरात मृत्यू कवटाळला. कित्येकांनी तर केवळ सणाच्या दिवशी आपल्या मुलांना नवे कपडे घेऊन देऊ शकत नाही, या आगतिकतेपायी आत्महत्या केली. नेर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने थेट पालकमंत्र्यांनाच आपल्या जीवनाची करुण कहानी सांगणारी चिठ्ठी लिहून जीव दिला. उमरखेड तालुक्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने झाडाला गळफास लावला. ऐनवेळी त्याची अर्धांगिनी पोहोचल्याने त्या शेतकऱ्याला मरणापासून परावृत्त करता आले. पण शेतकऱ्यांचे जीव गरिबीपायी जात असताना जिल्ह्यातील श्रीमंत आणि पांढरपेशा वर्गाने शेतीच्या समस्येपासून फारकत घेता कामा नये, अशी भूमिका घेवूनच लोकजागृती मंचने ऐन ‘थर्टी फर्स्ट’च्या औचित्यावरच शेतकऱ्यांचे दु:ख जगजाहीर करण्याचा कार्यक्रम आखला. येथील तिरंगा चौकात ३१ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता हा सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला भूदान चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, डॉ.रमाकांत कोलते, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.महेंद्र ठाकरे, नरेश उन्हाळे गुरुजी, डॉ.आलोक गुप्ता, न.मा. जोशी, नागेश गोरख, विजया धोटे, साहेबराव खडसे, डॉ.छाया महाले, वर्षा निकम, शब्बीर बेग, अन्सारी चाचा, साहेबराव पवार उपस्थित होते. लोकजागृती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार आणि घाटंजी पंचायत समितीचे सभापती शैलेश इंगोले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वी झाला. सूत्रसंचालन हेमंतकुमार कांबळे यांनी केले. विजय दुरुतकर व त्यांच्या संचाने शेतकऱ्यांची उमेद जागविणारी गीते सादर केली. या मैफलीचे सूत्रसंचालन रूपेश कावलकर यांनी केले. शहरात ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषासाठी धावपळ सुरू असतानाच या कार्यक्रमाने अनेकांची बहकलेली पावले तिरंगा चौकात खिळवून ठेवली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे घोषित झाले आणि जिल्ह्यातील दुष्काळावरही शिक्कामोर्तब झाले. (स्थानिक प्रतिनिधी)दारू टाळण्यासाठी दुधाचे वाटप४‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने अनेक तरुण दारूच्या आहारी जातात. पैशाची ही उधळपट्टी गरिबांच्या जखमा ताज्या करीत असते. ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकजागृती मंचने कार्यक्रमस्थळी दुधाचे वाटप केले. केसरयुक्त गरम दुधाच्या कढया कार्यक्रमाच्या ठिकाणी लावून तरुणांना मोफत दूध वाटप करण्यात आले. दारू ढोसण्याऐवजी दूध प्राशन करून नवी पिढी बलदंड व्हावी, असा संदेश यातून देण्यात आला.