शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

घरकुलाचे धनादेश काढण्यास टाळाटाळ

By admin | Updated: July 5, 2014 01:35 IST

शहरात एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकूल बांधण्यात येत आहे.

यवतमाळ : शहरात एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकूल बांधण्यात येत आहे. मात्र वेळेवर निधीच मिळत नसल्याने अनेकांच्या घराचे काम अर्ध्यावच रखडले आहे. यासाठी नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्षित धोरण कारणीभूत ठरत आहे. शासनाच्या निधीतून घरकूल मिळाल्याने अनेक गरीब लाभार्थ्यांनी झोपडी मोडून घराचे काम सुरू केले. योजना राबविताना सुरुवातीला नगरपरिषदेतील अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांच्याकडून सर्वतोपरी सहकार्याची भाषा केली जात होती. पहिला हप्ताही तितक्याच तत्परतेने देण्यात आला. वेळोवेळी पैसे मिळणार म्हणून अनेकांनी पदरमोड करून घराचे काम सुरू केले. प्रत्यक्षात बांधकामासाठी येणार खर्च आणि मिळणार निधी यात बरीच तफावत आहे. याही स्थितीत घरासाठी सर्व काही म्हणत अनेकांनी कर्जाऊ रक्कम घेऊन काम सुरू ठेवले. शेवटी आर्थिक मर्यादा आल्याने नगरपरिषद कार्यालयात लाभार्थ्यांना चकरा मारण्याची शिवाय पर्याय नाही. येथे मुख्याधिकारी कधीच उपलब्ध होत नाही. इतर कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन निघून जातात. मुख्याधिकाऱ्यांशी दुरध्वनीवर संपर्क केल्यानंतरही ते उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत व्यथा सांगायची कोणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्याधिकाऱ्यांची अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर पकड नसल्याने अनागोंदी कारभार सुरू आहे. येथील प्रभारी कार्यालय अधीक्षक आणि लेखापालाच्या मनमानीमुळे लाभार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. बरेचदा मुख्याधिकाऱ्यांनी धनादेशावर स्वाक्षरी केल्यानंतरही तो जमा करण्यासाठी संबंधितांकडून अकारण वेळ लावला जातो. येत्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी )