शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान

By admin | Updated: February 17, 2017 02:26 IST

जिल्हा परिषदेचे ५५ गट व १६ पंचायत समित्यांच्या ११० गणांसाठी गुरूवारी एक हजार ७१२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले.

मारेगावात सर्वाधिक : बाभूळगाव तालुक्यात सर्वात कमी मतदान, २३ ला मतमोजणी यवतमाळ : जिल्हा परिषदेचे ५५ गट व १६ पंचायत समित्यांच्या ११० गणांसाठी गुरूवारी एक हजार ७१२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील ६५ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असून तुरळक प्रकार वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. आता आठवडाभराने २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या ५५, तर १६ पंचायत समितीच्या ११० जागांसाठी मतदान पार पडले. जिल्हा परिषदेसाठी ३१५, तर पंचायत समितीसाठी ५९६ उमेदवार रिंगणात होते. सुरूवातीला संथगतीने मतदान सुरू झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा या चार प्रमुख पक्षांशिवाय मनसे, बसपा, गोंगपा, एमआयएम आणि स्थानिक विकास आघाड्या व अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे. ही निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदारांनी ‘ईव्हीएम’च्या माध्यमातून गुरूवारी नेमका कुणाला कौल दिला, हे मतमोजणीअंतीच स्पष्ट होणार आहे.ग्रामीण भागात मतदानाचा जोरमतदानासाठी ग्रामीण भागात सकाळी व सायंकाळी चांगलीच गर्दी होती. मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा बघायला मिळाल्या. सायंकाळी ५ वाजता दिवसभराचे काम आटोपून आलेल्या मतदारांची मोठी गर्दी होती. ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रे गर्दीने फुलून गेले होते. काही ठिकाणी ५.३० वाजतानंतर मतदान सुरू होते. निर्धारित वेळेत मतदान केंद्राच्या गेटमध्ये पोहोचलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून अनेक केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. अनेक युवकांसह वृद्धांनीही मोठ्या उत्साहाने मतदान केले. महागाव तालुक्यातील कोनदरी येथे दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तर कलगाव येथे मशीनवर जोरजोरात हात मारणाऱ्या गजानन नवाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मतदार यादीत घोळमतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांमध्ये उत्साह असल्याने मतदान केंद्रांवर प्रचंड गर्दी होती. मात्र काही मतदारांची नावेच यादीत नसल्याने अनेकांना मतदान करता आले नाही. निवडणूक आयोगाने मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यावर आक्षेप, हरकती मागविल्या होत्या. मात्र आक्षेप, हरकती सादर करूनही अनेक ठिकाणी मतदार यादीतील चुका कायमच राहिल्याचे गुरूवारी उघड झाले. यादीत अनेकांचे नावच नव्हते. काहींचे छायाचित्र बदललेले होते. काहींचे आडनाव व नावही चुकीचे होते. यामुळे काही मतदान केंद्रांवर काही काळ तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. (लोकमत चमू)शपथपत्राने उमेदवारांची पोलखोलनिवडणूक रिंगणातील उमेदवारांचे शपथपत्र प्रत्येक मतदान केंद्राबाहेर लावण्यात आले होते. यामुळे उमेदवारांची पार्श्वभूमि मतदारांपुढे उघड झाली. प्रचार काळात या उमेदवारांनी लपविलेल्या काही बाबी आज उघड झाल्याने उमेदवारांना चांगलीच धडकी भरली आहे. यामुळे त्यांचे विजयाचे गणीत बिघडण्याचा धोका वाढला आहे. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे नाव, शिक्षण, वार्षिक उत्पन्न, एकूण संपत्ती व त्यांच्यावर दाखल गुन्हे, यासोबतच थकित कर्जाचाही तपशील देण्यात आला. हा संपूर्ण तपशील बघून मतदार अवाक झाले. त्याचा मतदानावर परिणाम होण्याच्या भितीने अनेक उमेदवारांना धडकी भरली आहे. मतदानापूर्वी उमेदवारांबाबत चर्चा करणारे मतदार मतदानाच्या दिवशी त्यांच्या संपत्तीची चर्चा करताना आढळले. आईच्या मृत्यूनंतरही बहीण-भावाने केले मतदानमहागाव : आईच्या मृत्यूचे आभाळभर दु:ख बाजूला सारुन बहीण-भावाने मतदान करून आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचा परिचय महागाव तालुक्यातील सवना येथे आला. भागीरथाबाई भुजंगराव देशमुख यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. आईच्या मृत्यूचे दु:ख असतानाही मुख्याध्यापक दिलीपराव देशमुख आणि मुलगी लीलाताई यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदनाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे दिलीपराव देशमुख हे निवडणुकीच्या कर्तव्यावर दगडथर येथे कार्यरत होते. आईचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला.