शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

मराठी साहित्य संमेलनात अवलिया कलावंत पेरतोय माणुसकीची बिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:58 PM

सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिध्द नाट्य कलावंताला यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुठलेही निमंत्रण नाही. असे असले तरी, त्याने याठिकाणी हजेरी लावून गाडगेबाबांच्या वेशात शेतकऱ्यांच्या व्यथेसह अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे.

ठळक मुद्देस्वयंस्फूर्त सहभाग : गाडगेबाबांची मानवता हेच मोठे साहित्य

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिध्द नाट्य कलावंताला यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुठलेही निमंत्रण नाही. असे असले तरी, त्याने याठिकाणी हजेरी लावून गाडगेबाबांच्या वेशात शेतकऱ्यांच्या व्यथेसह अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे. एवढेच नव्हे तर महिलांची महती कथन करून ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ हा संदेश तो देत आहे. संत गाडगेबाबांच्या रुपाने मानवतेचा संदेश देऊन माणुसकीची बिजे पेरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांची ही पोटतिडक कोणाच्याही नजरेतून सुटत नाही. या अवलिया कलावंताचे नाव आहे फुलचंद नागटिळक़ खैराळा ता.मांढा जि. सोलापूर हे त्याचे गाव.फुलचंद यांनी ‘नटसम्राट’ हा एकपात्री प्रयोग चार हजार ६२२ वेळा सादर केला आहे. ‘मायभूमी’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे. ‘मला भेटलेली माणसे’ या त्यांच्या व्यक्तीरेखेला मोठी पसंती मिळाली आहे. जीवन जगताना त्यांना मिळालेल्या अनुभवाचे गाठोडे ते येथील साहित्य संमेलनात लोकांपुढे सोडत आहे. येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक कारणांनी गाजत आहे. असे असले तरी, फुलचंद हा एक नाट्यकलावंत माणुसकीचा संदेश देऊन लोकांसोबतच साहित्यिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविताना दिसतो. आम्ही साहित्य लिहितो, बोलतो, साहित्य खातो-पितो पण आचरणात आणणारे किती लोक आहे, असा त्यांचा सडेतोड सवाल अनेकांना निरुतर करतो आहे. मराठीची अस्मिता राखण्याचं काम कोण्या एकाचे नाही तर मराठीचा जागर सर्वांनी एकत्र येऊन केला पाहिजे. नजर, वाचा, मन आणि कर्म शुध्द असणे महत्वाचे आहे. कुठल्याही स्वार्थ हेतूने केलेले कार्य तडीस जात नाही. जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. पण त्यांच्या प्रश्नाकडे सर्वांनी दुर्लक्ष चालविले आहे. परिणामी तो आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो आहे, हे सर्वांचे अपयश आहे. अनेक साहित्यिक आयत्या ‘मटेरियल’वर लिहून टिमकी मिरविण्यात धन्यता मानत आहे. खरं तर प्रसंग जगून प्रत्यक्षात येणारे साहित्य हेच खरे साहित्य असते. यात किती जण यशस्वी होतात, हा त्यांचा प्रश्न आहे. तसे पाहिले तर त्यांच्या प्रश्नातील ताकद कोणीही नाकारु शकत नाही. आज देशात अनेक मानवीय मुलभूत प्रश्न असताना इतर विषयांवरच अधिक चर्चा होते. याविषयी फुलचंद यांना जी चिंता आहे, तीच सर्वांचीच असेल. येणाºया तीन दिवसात हा अवलिया ‘परिवर्तन’ करण्याची मीमांसा बाळगून आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ