शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्य संमेलनात अवलिया कलावंत पेरतोय माणुसकीची बिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:58 IST

सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिध्द नाट्य कलावंताला यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुठलेही निमंत्रण नाही. असे असले तरी, त्याने याठिकाणी हजेरी लावून गाडगेबाबांच्या वेशात शेतकऱ्यांच्या व्यथेसह अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे.

ठळक मुद्देस्वयंस्फूर्त सहभाग : गाडगेबाबांची मानवता हेच मोठे साहित्य

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिध्द नाट्य कलावंताला यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुठलेही निमंत्रण नाही. असे असले तरी, त्याने याठिकाणी हजेरी लावून गाडगेबाबांच्या वेशात शेतकऱ्यांच्या व्यथेसह अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे. एवढेच नव्हे तर महिलांची महती कथन करून ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ हा संदेश तो देत आहे. संत गाडगेबाबांच्या रुपाने मानवतेचा संदेश देऊन माणुसकीची बिजे पेरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांची ही पोटतिडक कोणाच्याही नजरेतून सुटत नाही. या अवलिया कलावंताचे नाव आहे फुलचंद नागटिळक़ खैराळा ता.मांढा जि. सोलापूर हे त्याचे गाव.फुलचंद यांनी ‘नटसम्राट’ हा एकपात्री प्रयोग चार हजार ६२२ वेळा सादर केला आहे. ‘मायभूमी’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे. ‘मला भेटलेली माणसे’ या त्यांच्या व्यक्तीरेखेला मोठी पसंती मिळाली आहे. जीवन जगताना त्यांना मिळालेल्या अनुभवाचे गाठोडे ते येथील साहित्य संमेलनात लोकांपुढे सोडत आहे. येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक कारणांनी गाजत आहे. असे असले तरी, फुलचंद हा एक नाट्यकलावंत माणुसकीचा संदेश देऊन लोकांसोबतच साहित्यिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविताना दिसतो. आम्ही साहित्य लिहितो, बोलतो, साहित्य खातो-पितो पण आचरणात आणणारे किती लोक आहे, असा त्यांचा सडेतोड सवाल अनेकांना निरुतर करतो आहे. मराठीची अस्मिता राखण्याचं काम कोण्या एकाचे नाही तर मराठीचा जागर सर्वांनी एकत्र येऊन केला पाहिजे. नजर, वाचा, मन आणि कर्म शुध्द असणे महत्वाचे आहे. कुठल्याही स्वार्थ हेतूने केलेले कार्य तडीस जात नाही. जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. पण त्यांच्या प्रश्नाकडे सर्वांनी दुर्लक्ष चालविले आहे. परिणामी तो आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो आहे, हे सर्वांचे अपयश आहे. अनेक साहित्यिक आयत्या ‘मटेरियल’वर लिहून टिमकी मिरविण्यात धन्यता मानत आहे. खरं तर प्रसंग जगून प्रत्यक्षात येणारे साहित्य हेच खरे साहित्य असते. यात किती जण यशस्वी होतात, हा त्यांचा प्रश्न आहे. तसे पाहिले तर त्यांच्या प्रश्नातील ताकद कोणीही नाकारु शकत नाही. आज देशात अनेक मानवीय मुलभूत प्रश्न असताना इतर विषयांवरच अधिक चर्चा होते. याविषयी फुलचंद यांना जी चिंता आहे, तीच सर्वांचीच असेल. येणाºया तीन दिवसात हा अवलिया ‘परिवर्तन’ करण्याची मीमांसा बाळगून आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ