शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

मराठी साहित्य संमेलनात अवलिया कलावंत पेरतोय माणुसकीची बिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:58 IST

सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिध्द नाट्य कलावंताला यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुठलेही निमंत्रण नाही. असे असले तरी, त्याने याठिकाणी हजेरी लावून गाडगेबाबांच्या वेशात शेतकऱ्यांच्या व्यथेसह अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे.

ठळक मुद्देस्वयंस्फूर्त सहभाग : गाडगेबाबांची मानवता हेच मोठे साहित्य

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : सोलापूर जिल्ह्यातील एका प्रसिध्द नाट्य कलावंताला यवतमाळातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कुठलेही निमंत्रण नाही. असे असले तरी, त्याने याठिकाणी हजेरी लावून गाडगेबाबांच्या वेशात शेतकऱ्यांच्या व्यथेसह अनेक ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न चालविला आहे. एवढेच नव्हे तर महिलांची महती कथन करून ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ हा संदेश तो देत आहे. संत गाडगेबाबांच्या रुपाने मानवतेचा संदेश देऊन माणुसकीची बिजे पेरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांची ही पोटतिडक कोणाच्याही नजरेतून सुटत नाही. या अवलिया कलावंताचे नाव आहे फुलचंद नागटिळक़ खैराळा ता.मांढा जि. सोलापूर हे त्याचे गाव.फुलचंद यांनी ‘नटसम्राट’ हा एकपात्री प्रयोग चार हजार ६२२ वेळा सादर केला आहे. ‘मायभूमी’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे. ‘मला भेटलेली माणसे’ या त्यांच्या व्यक्तीरेखेला मोठी पसंती मिळाली आहे. जीवन जगताना त्यांना मिळालेल्या अनुभवाचे गाठोडे ते येथील साहित्य संमेलनात लोकांपुढे सोडत आहे. येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक कारणांनी गाजत आहे. असे असले तरी, फुलचंद हा एक नाट्यकलावंत माणुसकीचा संदेश देऊन लोकांसोबतच साहित्यिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविताना दिसतो. आम्ही साहित्य लिहितो, बोलतो, साहित्य खातो-पितो पण आचरणात आणणारे किती लोक आहे, असा त्यांचा सडेतोड सवाल अनेकांना निरुतर करतो आहे. मराठीची अस्मिता राखण्याचं काम कोण्या एकाचे नाही तर मराठीचा जागर सर्वांनी एकत्र येऊन केला पाहिजे. नजर, वाचा, मन आणि कर्म शुध्द असणे महत्वाचे आहे. कुठल्याही स्वार्थ हेतूने केलेले कार्य तडीस जात नाही. जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. पण त्यांच्या प्रश्नाकडे सर्वांनी दुर्लक्ष चालविले आहे. परिणामी तो आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो आहे, हे सर्वांचे अपयश आहे. अनेक साहित्यिक आयत्या ‘मटेरियल’वर लिहून टिमकी मिरविण्यात धन्यता मानत आहे. खरं तर प्रसंग जगून प्रत्यक्षात येणारे साहित्य हेच खरे साहित्य असते. यात किती जण यशस्वी होतात, हा त्यांचा प्रश्न आहे. तसे पाहिले तर त्यांच्या प्रश्नातील ताकद कोणीही नाकारु शकत नाही. आज देशात अनेक मानवीय मुलभूत प्रश्न असताना इतर विषयांवरच अधिक चर्चा होते. याविषयी फुलचंद यांना जी चिंता आहे, तीच सर्वांचीच असेल. येणाºया तीन दिवसात हा अवलिया ‘परिवर्तन’ करण्याची मीमांसा बाळगून आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ