शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

अवधूतची अकाली एक्झीट चटका लावून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 21:53 IST

पाणी फाऊंडेशच्या वॉटर कप स्पर्धेत अगदी सुरुवातीपासून श्रमदानात पुढाकार घेणाऱ्या अवधूत भगवान वैद्य (२५) या नरसापूर येथील युवकाची एक्झीट सर्वांना चटका लाऊन गेली. त्याचे रविवारी सकाळी आकस्मित निधन झाले.

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या श्रमदानात पुढाकार : आकस्मिक निधनाने नरसापूरवर शोककळा

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पाणी फाऊंडेशच्या वॉटर कप स्पर्धेत अगदी सुरुवातीपासून श्रमदानात पुढाकार घेणाऱ्या अवधूत भगवान वैद्य (२५) या नरसापूर येथील युवकाची एक्झीट सर्वांना चटका लाऊन गेली. त्याचे रविवारी सकाळी आकस्मित निधन झाले.नरसापूर येथे पाणी फाऊंडेशनचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गावातील हजारो हात गाव पाणीदार करण्यासाठी झटत आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात युवक घाम गाळत आहे. स्पर्धेतील श्रमदानात अवधूत वैद्य हा युवकही मागे नव्हता. अगदी सुरुवातीपासून आणि तेवढ्याच मनापासून त्याने गावातील युवकांना एकत्र केले. पाण्याचे महत्व पटवून दिले.अवधूतने श्रमदानाचे महत्व पटवून देत दुष्काळावर मात करण्याचा संकल्प केला. त्यामुळे इतर युवकांमध्येही विश्वास जागृत झाला. एक-एक करत शेकडो युवक या चळवळीत सहभागी झाले. श्रमदानाच्या कामात सर्वांनी झोकुन दिले. गावकºयांसोबत मागील एक महिन्यापासून अखंडीतपणे अवधूत हा गावातील दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या प्रयत्नाला गावकऱ्यांनीही तेवढीच साथ दिली. परंतु अवधूतच मात्र सर्वांची साथ सोडून कायमचा निघून गेल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अवधूतचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग गावकऱ्यांनी बांधला आहे. दुष्काळावर मात करणे हीच खरी अवधूतसाठी श्रध्दाजंली ठरेल, सांगत पुन्हा नव्याने जोमाने गावकरी कामाला लागले आहे.डफडी वाजवून जनजागृतीअवधूत हा डफडी वाजवून सर्वांना श्रमदानास निघण्यासाठी प्रवृत्त करायचा. रोज सकाळ-संध्याकाळ त्याचा हा उपक्रम सुरु असायचा. यामध्ये युवकही त्यांना मोलाची साथ देत होते. एकंदरीत तो अतिशय उत्साहाने डफडी वाजवून जनजागृती करायचा. त्यामुळे आता डफडी कोण वाजविणार या प्रश्नासोबतच अवधूतची जागा कोण भरुन काढणार, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.