शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आॅगस्ट महिन्यातही नदी-नाले कोरडेच

By admin | Updated: August 8, 2014 00:14 IST

आॅगस्ट महिन्यात दुथडी भरुन वाहणारे नदी-नाले यंदा अद्यापही कोरडे आहे. पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या पेरणीला तर फटका बसलाच सोबतच जवळपास ८० गावांना पाणीटंचाईची झळही बसत आहे.

महागाव : आॅगस्ट महिन्यात दुथडी भरुन वाहणारे नदी-नाले यंदा अद्यापही कोरडे आहे. पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या पेरणीला तर फटका बसलाच सोबतच जवळपास ८० गावांना पाणीटंचाईची झळही बसत आहे. किरकोळ दुरुस्तीअभावी ३०० वर हातपंप बंद असून प्रशासन मात्र लक्ष द्यायला तयार नाही.गतवर्षी महागाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. आॅगस्ट महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद महागाव तालुक्यात झाली. मात्र यावर्षी महागाव तालुक्यात अद्यापही पुरेसा पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची वेळ आली. महागाव शहरातून वाहणाऱ्या पूस नदीचे पात्र अद्यापही कोरडे आहे. पूस नदी दुथडी भरुन वाहली की तालुक्यातील पाण्याची वाढते. मात्र यावर्षी पात्र कोरडे आहे. परिणामी भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. विहिरी, हातपंपांना अद्यापही पुरेसे पाणी नाही. यासोबतच तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा, शीप यासह लहान मोठे नालेही कोरडे आहे. तालुक्यातील ११६ गावांपैकी ८० गावात पाणीटंचाईची झळ बसत आहे. पंचायत समितीने कृती आराखडा तयार केला होता. जिल्हा प्रशासनाने मंजुरीही दिली होती. परंतु आराखड्यातील कामांना प्रारंभच झाला नाही. त्यामुळे ५०० पैकी ३०० हातपंप किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहे. तसेच नळ योजनांचे बिल न भरल्याने अनेक गावातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)