शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

जिल्हा परिषदेच्या कुबड्यांवर आॅडिट

By admin | Updated: November 24, 2014 23:06 IST

ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी स्थानिक निधी लेखापरीक्षकांकडे असताना गेल्या कित्येक दशकापासून लेखापरीक्षण झाले नसल्याचे पुढे आले आहे. आता ग्रामपंचयतीचे

ग्रामपंचायत : विस्तार अधिकारी नियुक्त करणारसुरेंद्र राऊत - यवतमाळ ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी स्थानिक निधी लेखापरीक्षकांकडे असताना गेल्या कित्येक दशकापासून लेखापरीक्षण झाले नसल्याचे पुढे आले आहे. आता ग्रामपंचयतीचे लेखापरीक्षण वेळेत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कुबड्यांचा आधार घेतला जाणार आहे. त्यासाठी दोन विस्तार अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत.पंचायत राज व्यवस्थेत पायाभुत घटक असलेल्या ग्रामपंचायतींना ७३ व्या घटना दुरूस्तीने मोठ्याप्रमाणात निधी प्राप्त होतो. मुबंई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५७ नुसार ग्रामपंचायतीच्या निधीचे लेखापरीक्षण करण्याचा अधिकार कलम ३ (अ-२) नुसार संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षकांना आहेत. मात्र स्थानिक निधी लेखापरीक्षकांकडून वेळेत अनेक ग्रामपंचायतीने लेखापरीक्षण करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांच्या खर्चाचा ताळमेळ नाही. लेखापरीक्षणासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. लेखापरीक्षणाच्या सुधारीत कार्यपध्दतीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी लेखापरीक्षणाचा अनुभव असलेले दोन विस्तार अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यांना जिल्ह्यातील सहाय्यक संचालक आणि स्थानिक निधी लेखा यांच्याकडे वर्ग केले जाणार आहे. ग्रामपंचायतीचे रखडलेले लेखापरीक्षण अद्ययावत हाईपर्यंत किमान एक वर्षासाठी या अधिकाऱ्यांना लेखापरीक्षणाचीच जाबाबदारी पार पाडावी लागणार आहे. लेखापरीक्षणात सर्वात मोठी अडचण ही लेखे वेळेत उपलब्ध होत नाही.ग्रामसेवकांनी हे अभिलेखे वेळेत उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. आता गटविकास अधिकाऱ्यांना देखिल ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी यांच्या मासिक बैठकीत लेखापरीक्षणासाठी अभिलेख्यांचा आढावा घेणे बंधनकारक केले आहेत. अभिलेखे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकावर निधी लेखापरीक्षा अधिनियम २०११ च्या कलम आठ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे, असा आदेश ग्रामविकास विभागाचे उपसचिव वैभव राजेघाटगे यांनी दिला आहे. प्रत्यक्षात ग्रामपंचायत लेखापरीक्षणात सुधारणेसाठी जिल्हा परिषदेची मदत कितपत होते, हे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय अनेक ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतींचा प्रभारच हस्तांतरित केला नाही. काहींनी तर चक्क अभिलेखे गायब केले आहेत. अशा ग्रामसेवकांना वठणीवर आणण्याचे आव्हान ग्राम विकास विभागासमोर आहे. त्यानंतरच ग्रामपंचायत कारभारात खऱ्या अर्थाने पारदर्शकता येणार आहे.