शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हल्लाबोल आंदोलन

By admin | Updated: August 16, 2014 23:43 IST

विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुबार पेरणीची मदत, २०१३ च्या यादीनुसार सर्व गरिबांना बीपीएलचे कार्ड, आदिवासींना खावटी आणि सर्व गरिबांना घरकूल व अंत्योदय योजना लागू करावी

‘गाव तेथे उपोषण’ : शेतकऱ्यांचा एकमुखी ठरावपांढरकवडा : विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुबार पेरणीची मदत, २०१३ च्या यादीनुसार सर्व गरिबांना बीपीएलचे कार्ड, आदिवासींना खावटी आणि सर्व गरिबांना घरकूल व अंत्योदय योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी स्वातंत्र्य दिनी येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी बांधव सहभागी झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी यांनी केले. दुपारी १ वाजता येथील शिवाजी पुतळ्याजवळून केळापूर, घाटंजी, आर्णी, वणी, मारेगाव, राळेगाव, झरी आदी तालुक्यातून आलेले शेतकरी, शेतमजूर, आदिवासी महिला-पुरुष तहसील कार्यालयात धडकले. याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. येत्या २० दिवसात सरकारने मागण्या मान्य न केल्यास ‘गाव तेथे उपोषणा’चा ठराव यावेळी घेण्यात आला.सभेला संबोधित करताना किशोर तिवारी म्हणाले, आमचा लढा शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासींच्या सुखासाठी आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला आहे. विविध प्रश्नांनी भीषण रूप धारण केले असताना या सर्व प्रश्नांकडे महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे. अशा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि हक्काच्या मागणीसाठी शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी रस्त्यावर उतरले आहे. आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. म्हणून आमचे आंदोलन, आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहील. राजकारणी लोकांनाही आता धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.सभेप्रसंगी अनिल तिवारी, मोहन मामीडवार, मोरेश्वर वातीले, मुबारक तंवर, ताराबाई पाटील आदींनीही मार्गदर्शन केले. सभेनंतर जिल्ह्यातून आलेल्या शेतकरी, शेतमजुरांचे निवेदन घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी संदीप महाजन यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. सरकारने कोरडवाहू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मोहन जाधव, अंकित नैताम, मनोज मेश्राम, सुरेश बोलेनवार, प्रीतम ठाकूर, भीमराव नैताम, नंदकिशोर जयस्वाल, शेखर जोशी आदींनी पुढाकार घेतला. (शहर प्रतिनिधी)