शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

घातपाती कारवायांवर एटीएसचा ‘वॉच’

By admin | Updated: May 21, 2015 00:15 IST

दहशतवादासारख्या देश विघातक कृत्यांना खतपाणी घालणाऱ्या समाजद्रोही घटकांवर एटीएसचा (दहशतवाद विरोधी पथक) कायम....

दोन कोटींची अद्ययावत उपकरणे : स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली एटीएस कार्यरत रूपेश उत्तरवार यवतमाळ दहशतवादासारख्या देश विघातक कृत्यांना खतपाणी घालणाऱ्या समाजद्रोही घटकांवर एटीएसचा (दहशतवाद विरोधी पथक) कायम वॉच आहे. गोपनीयरीत्या काम करणाऱ्या या पथकाच्या नजरेतून अशा कारवाया सुटणाऱ्या नाहीत. अशा घातक प्रवृत्ती एटीएसच्या नजरेत असून त्यांच्या संपूर्ण हालचालीही टिपल्या जात आहेत. योग्य वेळ येताच या प्रवृत्तीच्या मुसक्या आवळण्यासाठी एटीएस सज्ज झाली आहे. एटीएस हे नाव पूर्वी केवळ दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्येच ऐकायला मिळत होते. परंतु देशविघातक कारवायांचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याने शासनाला प्रत्येक जिल्ह्यात हे पथक स्थापन करण्याची गरज वाटली. त्यातूनच प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एटीएस कार्यरत झाले. यवतमाळात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली एटीएस कार्यरत आहे. एटीएसचा जनतेशी थेट कुठेही संबंध नाही. त्याचे कार्यालय कुठे आहे, तेथे कोण अधिकारी-कर्मचारी काम करतोय याची अनेक पोलिसांनाही माहिती नाही. मात्र या एटीएसचा सर्वत्र वॉच आहे. यवतमाळात थेट दहशतवादाचा संबंध नसला तरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्याला एखादवेळी खतपाणी घालण्याचा प्रकार घडण्याची भीतीही नाकारता येत नाही. म्हणूनच अशा काही संशयास्पद वाटणाऱ्या प्रवृत्तींवर एटीएसचा २४ तास वॉच आहे. या प्रवृत्तीची प्रत्येक हालचाल टिपली जात आहे. एटीएसला आणखी मजबूत करण्यासाठी शासनाने यवतमाळात सुमारे दोन कोटी रुपयांची अद्यावत उपकरणे पुरविली आहे. त्याचा मोठा फायदा एटीएसला घातपाती घटकांना शोधताना होतो आहे. एटीएसच्या दिमतीला बॉम्ब शोध व नाशक पथक तसेच डॉग स्कॉड आहे. १०० मीटर अंतरावरून स्फोटकाची माहिती मिळविता येईल असे उपकरण एटीएसकडे आहे. कुठे बॉम्ब आढळल्यास त्याला निष्क्रीय करण्याचे तंत्रही या पथकाला अवगत आहे. यवतमाळचे एटीएस पथक थेट मुंबईपर्यंतच्या एटीएसच्या साखळीत बांधले गेले असल्याने राज्यातील कोणत्याही दहशतवादी कृत्य व हालचालींनी या पथकाला लगेच अलर्ट मिळतो. एटीएस पथक जिल्हा पोलीस दलातील मोठी उपलब्धी मानली जात आहे.