शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

जुनोनीचा अतुल बनला विक्रीकर निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:34 IST

प्रतिकूल परिस्थितीवर कठोर परिश्रमाने मात करून तालुक्यातील जुनोनी या आडवळणावरच्या गावातील अतुल प्रभाकर वानखडे याने स्पर्धा परीक्षेचे लक्ष भेदून विक्रीकर निरीक्षक म्हणून शासकीय सेवेत नोकरी मिळविली आहे.

ठळक मुद्देप्रतिकूल परिस्थितीवर मात : दुसऱ्याच प्रयत्नात मिळविले यश

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : प्रतिकूल परिस्थितीवर कठोर परिश्रमाने मात करून तालुक्यातील जुनोनी या आडवळणावरच्या गावातील अतुल प्रभाकर वानखडे याने स्पर्धा परीक्षेचे लक्ष भेदून विक्रीकर निरीक्षक म्हणून शासकीय सेवेत नोकरी मिळविली आहे.अतुल अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे वडील प्रभाकर वानखडे हे रात्रंदिवस राबून मुलाच्या शैक्षणिक भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करीत होते. प्रचंड आर्थिक मर्यादा असल्याने अतुल पुढे अनेक अडचणी होत्या. पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण त्याने जुनोना येथील शाळेत तर पाचवी ते दहावी पर्यंत पारवेकर विद्यालय आणि ११ ते १२ वी घाटंजीच्या एसपीएम विद्यालयातून उत्तीर्ण केले. पुढील पदवीचे शिक्षण अभियांत्रिकीतून करण्याची इच्छा असतांनाही केवळ आर्थिक स्थिती नसल्याने अतुलने डीटीएड् केले. सोबतच मुक्त विद्यापीठाने बी.ए.ची पदवी घेतली. सीईटीची तयारी करण्यासाठी यवतमाळला आल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेला प्राधान्य दिले. यात त्याला प्रफुल्ल भोयर, आशिष रिंगोले, विवेक वाईकर, विवेक चुनारकर यांचे सहकार्य मिळाले. त्याने पहिल्याच प्रयत्नात एसटीआय २०१५ ची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर आईची प्रकृती बिघडल्याने त्याला आपल्या प्रयत्न थांबवून आईच्या प्रकृतीसाठी वेळ द्यावा लागला. यात तीन ते चार महिन्याचा वेळ गेला. शेवटच्या टप्प्यात अंतिम परीक्षेची तयारी केली. यात १ गुणाने त्याची संधी हुकली. त्यानंतर एमपीएससीची जाहीरात निघाली नाही. याकालावधीत त्याने पुन्हा जोमाने अभ्यास सुरु केला. २९ जानेवारी २०१७ लाख पुन्हा पूर्व परीक्षा दिली. व ३ जूनच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला. याचा निकाल १४ डिसेंबरला लागला. खुल्या प्रवर्गातून अतुलची विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. अतुलचे हे यश पाहण्यापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले याची खंत त्याच्या मनात कायम आहे. अतुलने यशाचे श्रेय आई व काकूला दिले. शिवाय स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रफुल्ल भोयर, महेश पाटील, अभिजीत राठोड यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षा अनिश्चिततेच क्षेत्र आहे. चिकाटी व कठोर परिश्रमात सातत्य या आधारावर यश नक्की मिळत असल्याचा विश्वास अतुलने व्यक्त केला.