शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

जुनोनीचा अतुल बनला विक्रीकर निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:34 IST

प्रतिकूल परिस्थितीवर कठोर परिश्रमाने मात करून तालुक्यातील जुनोनी या आडवळणावरच्या गावातील अतुल प्रभाकर वानखडे याने स्पर्धा परीक्षेचे लक्ष भेदून विक्रीकर निरीक्षक म्हणून शासकीय सेवेत नोकरी मिळविली आहे.

ठळक मुद्देप्रतिकूल परिस्थितीवर मात : दुसऱ्याच प्रयत्नात मिळविले यश

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : प्रतिकूल परिस्थितीवर कठोर परिश्रमाने मात करून तालुक्यातील जुनोनी या आडवळणावरच्या गावातील अतुल प्रभाकर वानखडे याने स्पर्धा परीक्षेचे लक्ष भेदून विक्रीकर निरीक्षक म्हणून शासकीय सेवेत नोकरी मिळविली आहे.अतुल अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे वडील प्रभाकर वानखडे हे रात्रंदिवस राबून मुलाच्या शैक्षणिक भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करीत होते. प्रचंड आर्थिक मर्यादा असल्याने अतुल पुढे अनेक अडचणी होत्या. पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण त्याने जुनोना येथील शाळेत तर पाचवी ते दहावी पर्यंत पारवेकर विद्यालय आणि ११ ते १२ वी घाटंजीच्या एसपीएम विद्यालयातून उत्तीर्ण केले. पुढील पदवीचे शिक्षण अभियांत्रिकीतून करण्याची इच्छा असतांनाही केवळ आर्थिक स्थिती नसल्याने अतुलने डीटीएड् केले. सोबतच मुक्त विद्यापीठाने बी.ए.ची पदवी घेतली. सीईटीची तयारी करण्यासाठी यवतमाळला आल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेला प्राधान्य दिले. यात त्याला प्रफुल्ल भोयर, आशिष रिंगोले, विवेक वाईकर, विवेक चुनारकर यांचे सहकार्य मिळाले. त्याने पहिल्याच प्रयत्नात एसटीआय २०१५ ची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर आईची प्रकृती बिघडल्याने त्याला आपल्या प्रयत्न थांबवून आईच्या प्रकृतीसाठी वेळ द्यावा लागला. यात तीन ते चार महिन्याचा वेळ गेला. शेवटच्या टप्प्यात अंतिम परीक्षेची तयारी केली. यात १ गुणाने त्याची संधी हुकली. त्यानंतर एमपीएससीची जाहीरात निघाली नाही. याकालावधीत त्याने पुन्हा जोमाने अभ्यास सुरु केला. २९ जानेवारी २०१७ लाख पुन्हा पूर्व परीक्षा दिली. व ३ जूनच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला. याचा निकाल १४ डिसेंबरला लागला. खुल्या प्रवर्गातून अतुलची विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. अतुलचे हे यश पाहण्यापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले याची खंत त्याच्या मनात कायम आहे. अतुलने यशाचे श्रेय आई व काकूला दिले. शिवाय स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रफुल्ल भोयर, महेश पाटील, अभिजीत राठोड यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षा अनिश्चिततेच क्षेत्र आहे. चिकाटी व कठोर परिश्रमात सातत्य या आधारावर यश नक्की मिळत असल्याचा विश्वास अतुलने व्यक्त केला.