शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेत जेवण उघड्यावर

By admin | Updated: September 29, 2014 23:13 IST

येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भोजन कक्षाअभावी उघड्यावरच जेवण करावे लागत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे.

रमेश झिंगरे - बोटोणीयेथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भोजन कक्षाअभावी उघड्यावरच जेवण करावे लागत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे.आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांकरिता आश्रमशाळा सुरू केल्या आहेत़ या सर्व शाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येतात. पांढरकवडा प्रकल्पाअंतर्गत एकूण ३२ शासकीय आश्रमशाळा, तर २८ अनुदानित आश्रमशाळा आहे़ पांढरकवडा प्रकल्पाअंतर्गत एकूण १८ शासकीय वसतिगृहे आहेत. बोटोणी येथेही शासकीय आश्रमशाळा आहे. त्यात विद्यार्थी निवासी राहतात. त्यांना भोजन व शैक्षणिक सुविधा मोफत देण्यात येतात.पांढरकवडा प्रकल्पांतर्गत बोटोणी येथे सन १९७२ पासून आदिवासी विद्यार्थ्यांकरिता आश्रशाळा सुरू आहे. या आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंतचे ३८१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ त्यापैकी १५८ विद्यार्थी व १३५ विद्यार्थिनी वसतिगृहातच राहतात. मात्र या सर्व विद्यार्थ्यांना उघड्यावरच जेवण करावे लागत आहे. पावसाळ्यात तर चक्क चिखल असताना तेथेच उघड्यावर जेवण करावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता बळावली आहे. या आश्रमशाळेत सर्व विद्यार्थ्यांना पंगतीत बसवून जेवण वाढले जाते़ पंगतीत जेवण घेऊन विद्यार्थी नंतर आपल्या सोयीनुसार लगतच्या झाडाखाली अथवा वर्गात जाऊन जेवण करतात़ मात्र या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांकरिता शुद्ध पाण्याची सोय नाही. जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही. अध्यापन कार्य व भोजन कक्षाची व्यवस्था चक्क वर्गातच असल्याने त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो.शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता अनेक योजना राबविते़ मात्र बेपर्वा अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या योजना प्रत्यक्षात अंमलात येत नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातही अनेकदा कर्मचारीच बळीचा बकरा ठरतात. अदिकारी मात्र नामानिराळेच राहतात. आठ दिवसांपूर्वी एका खासगी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्याचे खापर त्या आश्रमशाळेच्या अधीक्षकावर फुटले होते. तशीच परिस्थिती कोणत्याही आश्रमशाळेत निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे येथील आश्रमशाळेत सर्वच विद्यार्थी निवासी राहतात. अनेक विद्यार्थी एकाच खोलीत असतात. त्यामुळे त्यांना संसर्गजन्य आजार होण्याचीही शक्यता अधिक असते. या आश्रमशाळेत अध्यापन कार्यासाठी वर्गखोल्या, भोजन कक्ष, निवासस्थान यासाठी अपुऱ्या वास्तू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेवणही उघड्यावरच करावे लागत आहे. कर्मचाऱ्यांनाही गावात भाड्याने खोल्या घेऊन वास्तव्य करावे लागत आहे. काही कर्मचाऱ्यांना नाईलाजाने बाहेर गावावरून येणे-जाणे करावे लागत आहे. परिणामी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे नव्याने वास्तू बांधाव्या, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे़