शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

धान्य महोत्सवाने जागविल्या शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षा

By admin | Updated: March 28, 2016 02:31 IST

शेतकऱ्यांना थेट मार्केट उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतुने धान्य महोत्सवाचे आयोजन येथील पोस्टल मैदानावर

यवतमाळ : शेतकऱ्यांना थेट मार्केट उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतुने धान्य महोत्सवाचे आयोजन येथील पोस्टल मैदानावर रविवारपासून तीन दिवशीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते व आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. उल्लेखनिय म्हणजे पहिल्याच दिवशी सहा लाख रुपयांच्या धान्यांची उलाढाल या महोत्सवात झाली. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने तीन दिवशीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ते २९ मार्चपर्यंत हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे. सेंद्रिय पद्धतीचा कृषीमाल ग्राहकांना फिरूनही उपलब्ध होत नाही. उपलब्ध झाला तरी त्याची खात्री नाही. यामुळे थेट शेतकऱ्यांना या महोत्सवात उतरविण्यात आले. आत्मा अंतर्गत कृषी विभागाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. सेंद्रिय तूर डाळ, गहू, हळद, हरभरा, मुगडाळ, उडिद दाळ, जवस, कांदा, ज्वारी यांसह डाळींब, पपई, चिंच, टमाटर, आलू, कोबी, मिरची, शेवगा यासारख्या विविध वस्तू धान्य महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गुळ, बेसण, सहद, लोणचे, जाम, पापड, सॉस, बेलाचा रस, सोया लाडू, अंडी यांसह अनेक वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. विक्रीसाठी आलेले धान्य खरेदी केल्यास त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहे. यामुळे यवतमाळकरांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधता येत असल्याने ग्राहकांची गर्दी महोत्सवाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही गर्दी पुढील दोन दिवसही अपेक्षित आहे. (शहर वार्ताहर) मशरूमची धूम४शेतकऱ्यांच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण असलेले उत्पादन म्हणून मशरूमकडे पाहले जाते. सहाशे रुपये किलो याचे दर आहेत. साधारणत: पुणे आणि मुंबईतच मशरुम विकत मिळतो. सहसा यवतमाळच्या बाजारात हा मशरुम उपलब्ध होत नाही. यामुळे मशरुमची शेती आणि मशरुमची गुणवत्ता पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. बाभूळगाव तालुक्यातील कोल्हीच्या शेतकरी पुत्राने ही शेती यशस्वीपणे केली आहे. गोंदीया जिल्ह्यातील शेतकरी कैलास राऊत यवतमाळात हजेरी लावली होती. त्यांनी जवस, बेलाचा रस, चिंचेचा सॉस विक्रीसाठी आणला होता. भविष्यात शेतकऱ्यांसाठी कायमस्वरुपी मार्केट४या धान्य महोत्सवासंदर्भात आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे आणि उपसंचालक दत्तात्र्यय काळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी भविष्यात कायमस्वरुपी मार्केट उपलब्ध व्हावे, म्हणून जिल्हा परिषदेशी करार करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. तीन उत्कृष्ट स्टॉलला बक्षिस दिले जाणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाचे शेतकरी वर्गातून स्वागत केले गेले.शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटी४दृष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी युती शासन ठामपणे उभे आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांने केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प सादर केला आहे. यातून २५ हजार कोटींची तरतूद शेतकऱ्यांसाठी केली आहे. विदर्भातील शेतकऱ्याला यातून दृष्काळी लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी न डगमगता शेती कसावी आणि सर्वच नागरिकांनी धान्य महोत्सवातून धान्याची खरेदी करावी, असे आवाहन या महोत्सवा दरम्यान आपल्या उद्घाटनपर भाषणातून पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. यावेळी आमदार मदन येरावार यांनी अस्मानी, सुलतानी संकटांशी सामना करताना शेतकऱ्यांनी पिकपद्धती बदलण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. यासोबतच वाढत्या लोकसंख्येला हवे असलेले धान्य मिळवून देण्यात शेतकऱ्यांचे मोठे योगदान असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी, सीईओ, कृषी अधिक्षक, एसपी आदींनी विचार व्यक्त केले.