शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

अरुणावती प्रकल्प ठरला पांढराहत्ती

By admin | Updated: August 27, 2016 00:56 IST

जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्पाचा मान मिळालेला येथील अरुणावती प्रकल्प सिंचनाच्या बाबतीत अधोगतीकडे जात आहे.

३२५ कोटी खर्च : वितरण व्यवस्थेसाठी आणखी हवे एक कोटी प्रकाश सातघरे  दिग्रस जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्पाचा मान मिळालेला येथील अरुणावती प्रकल्प सिंचनाच्या बाबतीत अधोगतीकडे जात आहे. सव्वातीनशे कोटी रुपये खर्च करूनही हा प्रकल्प कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. अद्यापही वितरण व्यवस्थेचे पूर्ण जाळे तयार झाले नसून वितरण व्यवस्थेसाठी आणखी एक कोटी रुपयांची आवश्यकता आहे. गोदावरी खोऱ्यातील पैनगंगेची उपनदी असलेल्या अरुणावती नदीवर ३७ वर्षापूर्वी धरणाला मान्यता मिळाली. तालुक्यातील सावंगा बु. या गावाजवळ १९७८ साली प्रकल्पाला मान्यता मिळाली. चिरकुटासह तब्बल ११ गावांचे १३ ठिकाणी पुनर्वसन करून पाटबंधारे विभागाने हा प्रकल्प शेवटास नेला. या धरणाच्या जलोत्सारनीस एकूण लांबी चार ८६० मीटर आहे. जलोत्सारनीची लांबी १६२ मीटर आहे. या प्रकल्पाला १२ बाय आठ मीटरचे ११ वक्राकार दरवाजे असून उजव्या तीरावर सिंचन विमोचक तर डाव्या तिरावर विमोचक व जलविद्युत विमोचक आहेत. प्रकल्पाचा डावा मुख्य कालवा ५५.८० किमी लांबीचा असून उजवा कालवा ४६.२० किमीचा आहे. या प्रकल्पातून दिग्रस तालुक्यासह आर्णी, घाटंजी तालुक्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाखाली आणण्याचे उद्दीष्ट होते. ६ डिसेंबर १९१८ रोजी या प्रकल्पाला मान्यता मिळाली. तेव्हा या प्रकल्पाची किंमत केवळ १९ कोटी १३ लाख रुपये एवढी होती. मात्र २००८ च्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार ती तब्बल ३३१.१८ कोटीवर पोहोचली. कालांतराने दरवर्षी या प्रकल्पासाठी शासनाने निधी दिल्याने मार्च २०१५ मध्ये ३२० कोटी रुपये झाली. एकीकडे प्रकल्पाचे व्यवस्थापन, सांडवा, कालवे व वितरण प्रणालीचे काम १०० टक्के झाल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात सिंचनाचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळतो, हे कुणीही सांगत नाही. तब्बल १८ हजार लाभार्थी शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. परंतु हा प्रकल्प आता केवळ पांढरा हत्ती झाला आहे. केवळ मासेमारांसाठी हा प्रकल्प तर तयार केला नाही ना, असे बोलले जात आहे.