शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

अरुणावती प्रकल्प ठरला पांढराहत्ती

By admin | Updated: August 27, 2016 00:56 IST

जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्पाचा मान मिळालेला येथील अरुणावती प्रकल्प सिंचनाच्या बाबतीत अधोगतीकडे जात आहे.

३२५ कोटी खर्च : वितरण व्यवस्थेसाठी आणखी हवे एक कोटी प्रकाश सातघरे  दिग्रस जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्पाचा मान मिळालेला येथील अरुणावती प्रकल्प सिंचनाच्या बाबतीत अधोगतीकडे जात आहे. सव्वातीनशे कोटी रुपये खर्च करूनही हा प्रकल्प कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. अद्यापही वितरण व्यवस्थेचे पूर्ण जाळे तयार झाले नसून वितरण व्यवस्थेसाठी आणखी एक कोटी रुपयांची आवश्यकता आहे. गोदावरी खोऱ्यातील पैनगंगेची उपनदी असलेल्या अरुणावती नदीवर ३७ वर्षापूर्वी धरणाला मान्यता मिळाली. तालुक्यातील सावंगा बु. या गावाजवळ १९७८ साली प्रकल्पाला मान्यता मिळाली. चिरकुटासह तब्बल ११ गावांचे १३ ठिकाणी पुनर्वसन करून पाटबंधारे विभागाने हा प्रकल्प शेवटास नेला. या धरणाच्या जलोत्सारनीस एकूण लांबी चार ८६० मीटर आहे. जलोत्सारनीची लांबी १६२ मीटर आहे. या प्रकल्पाला १२ बाय आठ मीटरचे ११ वक्राकार दरवाजे असून उजव्या तीरावर सिंचन विमोचक तर डाव्या तिरावर विमोचक व जलविद्युत विमोचक आहेत. प्रकल्पाचा डावा मुख्य कालवा ५५.८० किमी लांबीचा असून उजवा कालवा ४६.२० किमीचा आहे. या प्रकल्पातून दिग्रस तालुक्यासह आर्णी, घाटंजी तालुक्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाखाली आणण्याचे उद्दीष्ट होते. ६ डिसेंबर १९१८ रोजी या प्रकल्पाला मान्यता मिळाली. तेव्हा या प्रकल्पाची किंमत केवळ १९ कोटी १३ लाख रुपये एवढी होती. मात्र २००८ च्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार ती तब्बल ३३१.१८ कोटीवर पोहोचली. कालांतराने दरवर्षी या प्रकल्पासाठी शासनाने निधी दिल्याने मार्च २०१५ मध्ये ३२० कोटी रुपये झाली. एकीकडे प्रकल्पाचे व्यवस्थापन, सांडवा, कालवे व वितरण प्रणालीचे काम १०० टक्के झाल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात सिंचनाचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळतो, हे कुणीही सांगत नाही. तब्बल १८ हजार लाभार्थी शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. परंतु हा प्रकल्प आता केवळ पांढरा हत्ती झाला आहे. केवळ मासेमारांसाठी हा प्रकल्प तर तयार केला नाही ना, असे बोलले जात आहे.