शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

युरियाचा कृत्रिम तुटवडा

By admin | Updated: August 27, 2014 23:52 IST

गेल्या दोन दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहे. उघाडीच्या काळात मरगळलेल्या पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. अशा स्थितीत युरियासारखे

हिवरी : गेल्या दोन दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहे. उघाडीच्या काळात मरगळलेल्या पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. अशा स्थितीत युरियासारखे खताचा वापर करून पिकाची खुंटलेली वाढ जोमाने करण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. अचानक एकाचवेळी युरियाची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. वाजवीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्ह्यातील कृषी विभाग मात्र डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. दुबार आणि तिबार पेरणीने जेरीस आलेल्या शेतकरी पावसाच्या दडीमुळे हतबल झाला होता. खरिपाचा हंगाम हातून जाणार अशी चिन्हे दिसत होती. सोयाबीनचे पीक शेतात असले तरी पावसाअभावी ते फुलणारच नाही याची खात्री झाली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने आणि ऐन वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीनचे पीक हाती येईल अशी आशा निर्माण झाली आहे. सोयाबीन फुलावर येण्याचा हा कालावधी असल्याने पिकाची खुंटलेली वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांकडून युरियाचा वापर केला जात आहे. कपाशी आणि सोयाबीन या दोन्ही पिकांना युरिया देण्यासाठी शेतकरी बाजारपेठेत आला आहे. ही संधी साधून कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना लुबाडल्या जात आहे. मागणीपेक्षा युरियाचा साठा कमी असल्याने भीषण टंचाई भासविण्याचा प्रयत्न होत आहे. कसेबसे पावसाने तग धरलेल्या पिकाला युरिया देऊन उभारी देण्याचा प्रयत्न होत असताना कृषी केंद्र चालक मात्र शेतकऱ्याला वेठीस धरत आहे. युनियाच्या एका बॅगसाठी ४०० रुपये मोजावे लागत आहे. बरेचदा तर टंचाई भासवण्यासाठी कारण नसताना शेतकऱ्यांना या दुकानातून त्या दुकानात येरझारा मारण्यास भाग पाडले जात आहे. या सर्व प्रकाराकडे राज्य कृषी विभाग आणि जिल्हा परिषद कृषी विभाग दुर्लक्ष करत आहे. अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कृषी विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)