शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

आर्णी पालिका स्वच्छतेसाठी मनुष्यबळ वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:49 IST

सध्या शहरात उपलब्ध मनुष्यबळ आणि साधन सामग्रीमध्ये सफाई मोहीम राबविणे सुरू आहे. परंतु शहरात साथीचे आजार वाढल्याने आता ही ...

सध्या शहरात उपलब्ध मनुष्यबळ आणि साधन सामग्रीमध्ये सफाई मोहीम राबविणे सुरू आहे. परंतु शहरात साथीचे आजार वाढल्याने आता ही मोहीम अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी २३ सफाई कर्मचारी होते. आता त्यात १० कर्मचारी वाढविण्यात येणार आहे. उपलब्ध मनुष्यबळांपैकी काही कर्मचारी इतर ठिकाणी पाठवावे लागतात. त्यामुळे शहराच्या सफाई मोहिमेवर त्याचा विपरित परिणाम होत आहे.

कचरा संकलनासाठी घंटागाड्या आहेत. मात्र, त्यावर अधिकृत चालकांचीही गरज आहे. चालक नसल्याने सफाई कर्मचारी घंटागाडी चालवित असल्याचे दिसून येत आहे. पाच कर्मचारी या कामात गुंतले आहे. काही कर्मचारी पाणीपुरवठा पाईप लाईनचे लिकेज काढण्यात, तर काही स्मशानभूमीमधील नोंदी घेण्यात गुंतून पडले आहे. यामुळे शहरातील स्वच्छतेसाठी मनुष्य बळ कमी पडत आहे. त्यामुळे आता स्वच्छता मोहिमेला वेग देण्याच्या दृष्टीने मनुष्यबळ वाढविले जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी महेश पाटील यांनी दिली.