शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी शहर झाले गुटखा तस्करीचे मुख्य केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:00 IST

येथील डोंगा ले-आऊट गुटख्याचा अड्डा बनले असून येथूनच सर्वत्र गुटखा पोहोचविला जात आहे.

ठळक मुद्देसर्वांचेच दुर्लक्ष : डोंगा ले-आउटमध्ये अड्डा, अन्न व औषध प्रशासन मूग गिळून

राजेश कुशवाह ।ऑनलाईन लोकमतआर्णी : येथील डोंगा ले-आऊट गुटख्याचा अड्डा बनले असून येथूनच सर्वत्र गुटखा पोहोचविला जात आहे.तालुक्यातील ग्रामीण भागासह जिल्ह्यातील इतरही भागात या डोंगा ले-आउटमधून गुटखा पोहोचविला जातो. गेल्या कित्येक महिन्यांपासून ही गुटखा तस्करी सुरू आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यात बिनदिक्कतपणे गुठगा पोहोचविला जात आहे. त्यासाठी दोन वाहनांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणे आर्णी तालुक्यातील एक गुटखा व्यावसायीक उमरखेडमध्ये तळ ठोकून आहे. तेथील पोलिसांसोबत त्याचे ‘अर्थपूर्ण’ संबंध गुटखा तस्करीला चांगलाच जोर आला आहे.आर्णी पोलीस व यवतमाळ येथील वरिष्ठांनीही गुटखा तस्करी करणाºयांना खुली सूट दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गुटखा तस्करी राजरोसपणे सुरू आहे. अनेक बालक गुटख्याला बळी पडत आहे. पोलिसांना मात्र दर महिन्याला आर्थिक रसद मिळत असल्याने ज्या मार्गाने गुटखा भरलेली वाहने जातात, तिकडे कुणी फिरकत नाही. संबंधित सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना दरमहा ठरावीक मलिदा मिळत असल्याने ते या तस्करीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र सामान्यांची आरोग्य धोक्यात सापडले आहे.कारवाईस कुणीच धजावत नाहीकोणत्याही विभागाचे अधिकारी गुटखा तस्करांवर कारवाई करण्यास धजावत नाही. गुटख्याला बंदी असूनही खुलेआम तस्करी होत असताना अधिकारी, कर्मचारी मूग गिळून आहे. कारंजा, अमरावती हे गुटख्याचे मुख्य केंद्र असून तेथूनच प्रत्येक तालुक्यात गुटखा पोहोचविला जातो. आर्णीतील डोंगा ले-आऊट आता जिल्ह्यातील मुख्य केंद्र बनले आहे. दररोज सायंकाळी येथून लाखो रूपयांचा गुटख्याची तस्करी केली जात आहे. मात्र ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे कुणीही कारवाईस धजावत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.