शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

प्रतिकुलतेवर मात करणारी आर्णीची ‘प्रतिभा’

By admin | Updated: March 8, 2017 00:13 IST

परिस्थिती हलाखीची, कौटुंबिक कलह, समाजाची सदा वक्रदृष्टी...सामान्य महिलेने खचून जावे इतकी अपरिमीत प्रतिकुलता.

राजेश कुशवाह  आर्णी परिस्थिती हलाखीची, कौटुंबिक कलह, समाजाची सदा वक्रदृष्टी...सामान्य महिलेने खचून जावे इतकी अपरिमीत प्रतिकुलता. पण तिने सर्व अडथळ््यांवर मात करीत एकाचवेळी नृत्य, चित्रपट अभिनय, साहित्य लेखन आणि पत्रकारितेसारख्या विविध क्षेत्रात पाय रोवले. एवढेच नव्हे तर आता नव्या पिढीला शिक्षण देण्याचा चंग बांधला आहे. प्रतिभा गेडाम यांच्या रूपाने महिला दिनी नव्या ‘प्रतिभे’चा हा परिचय. पुरूषप्रधान संस्कृतिमध्ये महिला चुल आणि मूल एवढ्याच परिघात मर्यादित होती. येथील प्रतिभाताई गेडाम यांनी या परिघाला भेदण्याचे ठरविले. मात्र परिस्थिती आड येऊ लागली. पण प्रतिभेला आव्हान मिळाले की प्रतिभावंत त्यातूनच संधी निर्माण करतो. प्रतिभातार्इंनी तेच केले. प्रतिभातार्इंचे बालपण आर्णी, उमरखेड, वणी, पांढरकवडा आदी शहरांमध्ये गेले. बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. मात्र त्यांच्या स्थूल शरिरामुळे कुणीही संधी देत नव्हते. वणी येथे याच कारणावरून शाळेच्या कार्यक्रमात शिक्षकांनी त्यांना संधी नाकारली. तो अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. आता स्वत:च नृत्याचे धडे गिरवायचे, असा निश्चय त्यांनी केला. रेडिओवरील गाणे ऐकत-ऐकत त्यांनी सराव केला. नृत्यात निपूण झाल्या. दरम्यान पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. १९७८ मध्ये त्यांनी ‘झाले मी तुझ्यापरी’ हे चार अंकी नाटक स्वत: लिहिले. त्याचा पहिला प्रयोग ज्ञानमंदिराच्या ओट्यावर झाला. यावेळी स्व. नेवारे गुरूजींनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. ही कौतुकाची थाप मिळताच प्रतिभातार्इंनी अखंड वाटचाल सुरू केली. आतापर्यंत त्यांनी ४५० नाटकांमध्ये आणि चार चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. आत्मदाह, धीटबाई धिटुकली, नवरा देशी बायको परदेशी व पिंकी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अनोख्या ठरल्या आहेत. एखाद्याचे नशीब, नवा संसार, सरपंच, खुनी पाटील बेईमान, मेंढर, पाटलाची पोरं जरा जपून आदी नाटकांचे प्रयोग विदर्भ-मराठवाड्यातील मोठ्या शहरात खूप गाजले. अभिनयासोबतच त्यांना साहित्यिक दृष्टी आहे. सामाजिक विषयांवर कथा, कविता, नाटक लिहिण्याचा त्यांना छंदच जडला. पत्रकारितेच्या क्षेत्रात नाव कमाविलेले त्यांचे पती चारुदत्त माधव बागुल यांनी प्रतिभातार्इंच्या कलागुणांची कदर केली. विदर्भाचा रॉबीनहुड श्यामादादा कोलाम यांची मुलाखत या दाम्पत्याने घेऊन प्रकाशित केली होती. आयुष्यात त्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. खास करून बाळासाहेब शिंदे, वऱ्हाडकर, नेवारे यांनी प्रोत्साहन दिले. गजल सम्राट सुधाकर कदम यांनी तर ‘डबक्यातून बाहेर पड, तरच जगाची खरी माहिती होईल’ असे सांगत प्रोत्साहन दिले. दोन मुले, एक मुलगी यांना घडवित प्रतिभातार्इंनी कलेला आकार दिला. त्यांची मुलगी प्रणया आईच्या कलेचा वारसा घेत दोन विषयात पदव्युत्तर पदवीधर झाली. एक मुलगा मंत्रालयात तर दुसरा शिक्षण घेत आहे.