शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

सेनेचे पालकमंत्री पद सुरक्षित

By admin | Updated: July 22, 2016 01:59 IST

यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला हवे असले तरी युतीच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील

युतीचा फॉर्म्युला : शिवसेनेच्या दहा मंत्र्यांकडे १२ जिल्हे यवतमाळ : यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला हवे असले तरी युतीच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील हा जिल्हा सुरक्षित असल्याचा दावा सेनेच्या एका उच्च पदस्थ नेत्याने केला आहे. सुमारे दीड वर्ष संजय राठोड यांच्या रुपाने जिल्ह्यात राज्य सरकारचे एकमेव मंत्री होते. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या मदन येरावार यांना संधी दिली गेली. ना. येरावार मंत्री होताच भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला मिळावे म्हणून जोरदार मागणी लावून धरली आहे. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे असल्याचे सांगून भाजपाने पालकमंत्री पदावर दावा सांगितला आहे. शिवसेनेला वाशिम, नांदेड या लगतच्या जिल्ह्यात पाठवावे, असा सल्लाही भाजपाच्या गोटातून दिला जात आहे. पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी भाजपाने विविध स्तरावरुन मोर्चेबांधणी चालविली असली तरी शिवसेनेचे नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड मात्र बिनधास्त आहे. कारण त्यांचा युतीच्या फॉर्म्युल्यावर विश्वास असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते. राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री पदे, खाते वाटप याचा फॉर्म्युला ठरला. त्याच वेळी शिवसेनेकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद असावे आणि भाजपाकडे कोणते याचाही फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. या फॉर्म्युल्यामध्ये बदल न करण्याचेही धोरण त्यावेळी ठरविले गेल्याचे सांगितले जाते. युती सरकार स्थापनेच्यावेळी भाजपा-सेनेमध्ये ठरलेल्या या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील यवतमाळचे पालकमंत्री पद भविष्यातही शाबूत राहणार असल्याचे मानले जाते. त्यामुळेच संजय राठोड निश्चिंत दिसत आहे. हा फॉर्म्युला असूनही भाजपाने पाच आमदार संख्येचे कारण पुढे करून यवतमाळ शिवसेनेकडून काढून घ्यावा, यासाठी प्रयत्न चालविल्याने शिवसेनेच्या गोटात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालकमंत्री पदाच्या आडोश्याने आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुका, विधान परिषद निवडणुका जिंकण्याचा, त्यासाठी जिल्हाभर पक्षबांधणी करण्याचा भाजपाचा मनसुबा आहे. (जिल्हा प्रतिनिधी) दोन मंत्र्यांकडे दुहेरी जिल्हे या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या दहा मंत्र्यांकडे १२ जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळ, नांदेड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद, भंडारा, मुंबई शहर, रत्नागिरी, ठाणे, सातारा आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. दिवाकर रावते आणि डॉ. दीपक सावंत या दोन मंत्र्यांकडे अनुक्रमे नांदेड व परभणी आणि भंडारा-उस्मानाबाद या जिल्ह्यांची दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारात दोन राज्यमंत्री वाढल्याने त्यांच्याकडे उपरोक्त दुहेरीपैकी एका-एका जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.