शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सेनेचे पालकमंत्री पद सुरक्षित

By admin | Updated: July 22, 2016 01:59 IST

यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला हवे असले तरी युतीच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील

युतीचा फॉर्म्युला : शिवसेनेच्या दहा मंत्र्यांकडे १२ जिल्हे यवतमाळ : यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला हवे असले तरी युतीच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील हा जिल्हा सुरक्षित असल्याचा दावा सेनेच्या एका उच्च पदस्थ नेत्याने केला आहे. सुमारे दीड वर्ष संजय राठोड यांच्या रुपाने जिल्ह्यात राज्य सरकारचे एकमेव मंत्री होते. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या मदन येरावार यांना संधी दिली गेली. ना. येरावार मंत्री होताच भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी यवतमाळचे पालकमंत्री पद भाजपाला मिळावे म्हणून जोरदार मागणी लावून धरली आहे. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे असल्याचे सांगून भाजपाने पालकमंत्री पदावर दावा सांगितला आहे. शिवसेनेला वाशिम, नांदेड या लगतच्या जिल्ह्यात पाठवावे, असा सल्लाही भाजपाच्या गोटातून दिला जात आहे. पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी भाजपाने विविध स्तरावरुन मोर्चेबांधणी चालविली असली तरी शिवसेनेचे नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड मात्र बिनधास्त आहे. कारण त्यांचा युतीच्या फॉर्म्युल्यावर विश्वास असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते. राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री पदे, खाते वाटप याचा फॉर्म्युला ठरला. त्याच वेळी शिवसेनेकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद असावे आणि भाजपाकडे कोणते याचाही फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. या फॉर्म्युल्यामध्ये बदल न करण्याचेही धोरण त्यावेळी ठरविले गेल्याचे सांगितले जाते. युती सरकार स्थापनेच्यावेळी भाजपा-सेनेमध्ये ठरलेल्या या फॉर्म्युल्यामुळे शिवसेनेकडील यवतमाळचे पालकमंत्री पद भविष्यातही शाबूत राहणार असल्याचे मानले जाते. त्यामुळेच संजय राठोड निश्चिंत दिसत आहे. हा फॉर्म्युला असूनही भाजपाने पाच आमदार संख्येचे कारण पुढे करून यवतमाळ शिवसेनेकडून काढून घ्यावा, यासाठी प्रयत्न चालविल्याने शिवसेनेच्या गोटात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालकमंत्री पदाच्या आडोश्याने आगामी जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणुका, विधान परिषद निवडणुका जिंकण्याचा, त्यासाठी जिल्हाभर पक्षबांधणी करण्याचा भाजपाचा मनसुबा आहे. (जिल्हा प्रतिनिधी) दोन मंत्र्यांकडे दुहेरी जिल्हे या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या दहा मंत्र्यांकडे १२ जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळ, नांदेड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद, भंडारा, मुंबई शहर, रत्नागिरी, ठाणे, सातारा आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. दिवाकर रावते आणि डॉ. दीपक सावंत या दोन मंत्र्यांकडे अनुक्रमे नांदेड व परभणी आणि भंडारा-उस्मानाबाद या जिल्ह्यांची दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारात दोन राज्यमंत्री वाढल्याने त्यांच्याकडे उपरोक्त दुहेरीपैकी एका-एका जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.