शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

दारव्हा पंचायत समितीवर सेना

By admin | Updated: February 25, 2017 01:04 IST

पंचायत समिती निवडणुकीत दहापैकी नऊ जागा जिंकत शिवसेनेने एकतर्फी विजय संपादन केला.

एकतर्फी विजय : दहा पैकी नऊ जागा जिंकल्या, नेतृत्वामुळे यश मुकेश इंगोले   दारव्हा पंचायत समिती निवडणुकीत दहापैकी नऊ जागा जिंकत शिवसेनेने एकतर्फी विजय संपादन केला. त्यामुळे मागील पंचवार्षिकमध्ये सत्ता गाजविल्यानंतर यावेळीसुद्धा जनतेनी कौल दिल्याने पंचायत समितीवर सेनेचाच भगवा फडकणार आहे. या निवडणुकीत अनेक गणामध्ये तुल्यबळ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे लढत खर तर काट्याची होईल, असे चित्र असताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची प्रचंड मेहनत आणि या भागातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास कायम असल्याने तालुक्यात जणू भगवी लाट निर्माण झाली व या लाटेत सेना उमेदवारांची लॉटरी लागली. लोही गणात राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केलेल्या सुनीता राऊत यांनी काँग्रेसचे अमोल चौधरी यांचा पराभव केला. भाजपा तिसऱ्या तर राष्ट्रवादी पाचव्या क्रमांकावर फेकल्या गेली. हा गण सर्वसाधारण असताना सेनेने भविष्याचा वेध घेत महिला उमेदवाराला संधी दिली. शेजारच्या चिखली गणात मात्र शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. सेना बंडखोर अपक्ष संतोष ठाकरे यांनी बाजी मारली. काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या तर भाजप पाचव्या स्थानावर राहिली. डोल्हारी गणात राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का बसला. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अमोल राठोड यांनी आपल्या पत्नीला रणांगणात उतरविले होते. परंतु या लाटेत त्यांचा टिकाव लागला नाही. सेनेच्या उषा चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला तर याच गटातील भांडेगाव गणात सेनेच्या सविता जाधव यांनी काँग्रेसच्या बेबीताई गोमासे यांना पराभूत केले. दोन्ही गणात भाजपा तिसऱ्या स्थानावर राहिली. वास्तविक या गट व गणात काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होती. तरीसुद्धा त्यांना सेनेचा विजयरथ रोखता आला नाही. बोरी गणात ओमप्रकाश लढ्ढा यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढली होती. परंतु या वाढलेल्या ताकदीवर मात करत शिवसेनेचे साहेबराव कराळे यांनी भाजपाचे महादेव माहुरे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी तिसऱ्या तर काँग्रेस चौथ्या स्थानावर राहिली. तळेगाव गणात काँग्रेस उमेदवार जातीय समीकरणात फिट बसत असतानाही विजयी होऊ शकला नाही. सेनेच्या सिंधू राठोड यांनी काँग्रेसच्या अश्विनी खोडे यांच्यावर मात केली. राष्ट्रवादीला तिसऱ्या तर भाजपाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. लाडखेडमध्ये शारदा दुधे तर वडगाव गणात शारदा मडावी या सेना उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुक्रमे माधुरी दुधे व वीणा कोर्टेकर याां पराभव केला. दोन्ही ठिकाणी भाजप तिसऱ्या तर लाडखेडमध्ये काँग्रेस पाचव्या व वडगावमध्ये चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेली. महागाव क गणात राष्ट्रवादीला विजयाची मोठी अपेक्षा होती. या गणाचे विद्यमान सदस्य प्रा.चरण पवार हे पक्षाला शून्य या आकड्यापासून वाचवू शकतात, असे बोलले जात होते. परंतु त्यांनासुद्धा सेना उमेदवार पंडित राठोड यांनी ४९ मतांनी का होईना मात्र पराभूत केले. तर सायखेड गणाची लढत सेना-भाजपामध्ये झाली. या लढतीत सेनेचे नामदेव जाधव यांनी भाजपाचे मधुसूदन लोहकरे यांना पराभूत केले. दोनही गणात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली. पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी दिग्गज उमेदवार दिले. सर्व ताकद पणाला लावली. पण तरीसुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व संपूर्ण राज्यात लाटेवर स्वार असणाऱ्या भाजपला देखील दारव्हा तालुक्यात भोपळाही फोडता आला नाही. शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवत शहराप्रमाणे ग्रामीण भागातही आपलाच दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले. अस्तित्वाच्या या लढाईसाठी राज्यमंत्री संजय राठोड यांनी मेहनत घेतली.