शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अर्जुना घाटात भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून

By admin | Updated: August 24, 2015 00:02 IST

चुलत भावाशी झालेल्या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात देऊन परतणाऱ्या तरुणावर पत्नीसमोरच चाकूचे वार करून निर्घृण खून केल्याची घटना अर्जुना घाटात रविवारी भरदुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

पत्नीसमोर घडला थरार : पोलिसात तक्रार दिल्याचा वचपा यवतमाळ/हिवरी : चुलत भावाशी झालेल्या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात देऊन परतणाऱ्या तरुणावर पत्नीसमोरच चाकूचे वार करून निर्घृण खून केल्याची घटना अर्जुना घाटात रविवारी भरदुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. मारेकऱ्यांनी पोटावर आणि मांडीवर चाकूने १० ते १२ वार करून खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला वाचविण्यासाठी पत्नीने मदतीची याचना केल्यानंतरही तासभर कुणीही धावून आले नाही. अजित विनायक चव्हाण (३५) रा. माळम्हसोला असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री गावातील स्वस्त धान्य दुकानदार असलेला चुलत भाऊ राजेश बद्रू चव्हाण याच्यासोबत धान्य दरावरून अजितचा वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी अजित आपली पत्नी ललिता चव्हाणला सोबत घेऊन रविवारी दुपारी १२ वाजता यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात आला. या ठिकाणी तक्रार देऊन आपल्या दुचाकीने पती-पत्नी गावाकडे निघाले होते. अर्जुना घाटातील पहिल्या वळणावरील गतिरोधकावर त्यांची दुचाकी पोहोचली. त्यावेळी वेग कमी होताच दबा धरुन बसलेल्या तिघांनी दुचाकीला धक्का देऊन दोघांनाही खाली पाडले. काही कळायच्या आत अजितवर चाकूने वार केले. सोबत असलेल्या पत्नीलाही मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अजितला पाहून पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केली. सुमारे तासभर कुणीही मदतीसाठी धावून आले नाही. त्यानंतर या घटनेची माहिती कुणी तरी ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलीस घटनास्थळावर पोहोचले तेव्हा अजित निपचित आढळून आला. त्याला शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी ललिता चव्हाणच्या तक्रारीवरून आरोपी राजेश बद्रू चव्हाण, विशाल ऊर्फ चिकू राजेश चव्हाण, प्रवीण पोटे, सचिन सुत्रावे सर्व रा. माळम्हसोला यांच्या विरोधात पोलिसांनी कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विशाल व त्याच्या दोन साथीदारांनी रस्त्यात अडवून थेट हल्ला केला. या कटात राजेशने मदत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. (कार्यालय प्रतिनिधी) अजितवर होती पाळत गावात झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात गेलेल्या अजित चव्हाणवर आरोपींनी पाळत ठेवली होती. तो कुठे जातो याची माहिती मिळवून मारेकरी अर्जुना घाटातील गतिरोधकासमोरील झुडूपामध्ये दबा धरुन बसले होते. त्याच्या प्रत्येक हालचालीची इत्थंभूत माहिती मारेकऱ्यांंना दिली जात होती. त्यामुळे या घटनेतील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेनेही तपास करीत असून आरोपींच्या अटकेनंतर या घटनेचे रहस्य आणखी उलगडणार आहे.