शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

पांढरकवडात दुधाची आवक अर्ध्यावर

By admin | Updated: May 7, 2017 00:59 IST

जंगलातील चारा कमी झाल्यामुळे वैरणासाठी जनावरांची भटकंती सुरु झाली आहे़ पाण्याच्या कमतरतेमुळे गाई-म्हशींच्या दुधाचे प्रमाणही कमी झाले आहे़

१७ हजार लिटर दुधाची आवश्यकता : पाणी व वैरणाच्या कमतरतेमुळे जनावरांची भटकंती लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : जंगलातील चारा कमी झाल्यामुळे वैरणासाठी जनावरांची भटकंती सुरु झाली आहे़ पाण्याच्या कमतरतेमुळे गाई-म्हशींच्या दुधाचे प्रमाणही कमी झाले आहे़ यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायावर भीषण संकट निर्माण झाले आहे़ एकट्या पांढरकवडा शहरासाठी किमान १७ हजार लिटर दुधाची गरज असताना केवळ १० ते साडेदहा हजार लिटर दुधाची आवक होत असल्याने नागरिकांना पॉकेटच्या दुधावर गरज भागवावी लागत आहे. तालुक्यात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे गायी व म्हशी या दुधाळ जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात शेती व्यवसायाशी जनावरांचा जवळचा समंध आहे़ मे महिन्याची सध्या जेमतेम सुरूवात झाली असूनसुध्दा गुरांना वैरण मिळेनासे झाले आहे़ त्यामुळे गुरांना जंगलामध्ये चाऱ्याकरीता सर्वदूर फिरावे लागत आहे़ या जनावरांमध्ये गाई-म्हशी यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे़ दुधाचा व्यवसाय या प्राण्यांवरच अवलंबून आहे़ परंतु या प्राण्यांचा वैरण आणि पाणी टंचाईमुळे अक्षरश: कोंडमारा होत असल्यामुळे दुग्ध व्यवसायालासुध्दा याचा फार मोठा फटका बसत आहे़ तालुक्यातील मांगुर्डा, मुची या परिसरात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु यावर्षी कधी नव्हे एवढी चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आतापर्यंत चारा व पाण्याची टंचाई एवढी मोठी टंचाई कधीच निर्माण झाली नसल्याची माहिती मांगुर्डा मुची येथील श्यामराव गवळी यांनी दिली. पावसाचे कमी प्रमाण व पाण्याची पातळी खाली जात असल्यामुळे जंगलातील हिरवा चारा दिसेनासा झाला आहे़ जनावरांना चराईसाठी जंगलात किंवा टेकड्यावर नेण्यात येते़ यासोबत शेतातील धुऱ्यावरसुध्दा त्यांना चराईसाठी सोडल्या जाते़ परंतु आता ओलिताची पिके कमी घेतल्या जात असल्यामुळे व विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे आता काही शेतकरीच पुर्णपणे ओलिताची पिके घेताना दिसतात़ याचाही परिणाम चारा कमी होण्यावर झाला आहे़ ओलिताची पिके कमी असल्याने ठराविक शोतातच हिरवा चारा पाहावयाला मिळत आहे़ ज्याच्या शेतात असा चारा आहे त्यांना स्वत:च्या जनावरांसाठीच हा चारा उपयोगी पडत आहे़ उन्हाळ्यात जंगलातील चाऱ्याला वाढत्या तापमानामुळे आगी लागत असल्याने वैरण नष्ट होते़ आगीच्या वनव्यात वैरण नष्ट होत आहे.