शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

पांढरकवडात दुधाची आवक अर्ध्यावर

By admin | Updated: May 7, 2017 00:59 IST

जंगलातील चारा कमी झाल्यामुळे वैरणासाठी जनावरांची भटकंती सुरु झाली आहे़ पाण्याच्या कमतरतेमुळे गाई-म्हशींच्या दुधाचे प्रमाणही कमी झाले आहे़

१७ हजार लिटर दुधाची आवश्यकता : पाणी व वैरणाच्या कमतरतेमुळे जनावरांची भटकंती लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : जंगलातील चारा कमी झाल्यामुळे वैरणासाठी जनावरांची भटकंती सुरु झाली आहे़ पाण्याच्या कमतरतेमुळे गाई-म्हशींच्या दुधाचे प्रमाणही कमी झाले आहे़ यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायावर भीषण संकट निर्माण झाले आहे़ एकट्या पांढरकवडा शहरासाठी किमान १७ हजार लिटर दुधाची गरज असताना केवळ १० ते साडेदहा हजार लिटर दुधाची आवक होत असल्याने नागरिकांना पॉकेटच्या दुधावर गरज भागवावी लागत आहे. तालुक्यात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे गायी व म्हशी या दुधाळ जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात शेती व्यवसायाशी जनावरांचा जवळचा समंध आहे़ मे महिन्याची सध्या जेमतेम सुरूवात झाली असूनसुध्दा गुरांना वैरण मिळेनासे झाले आहे़ त्यामुळे गुरांना जंगलामध्ये चाऱ्याकरीता सर्वदूर फिरावे लागत आहे़ या जनावरांमध्ये गाई-म्हशी यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे़ दुधाचा व्यवसाय या प्राण्यांवरच अवलंबून आहे़ परंतु या प्राण्यांचा वैरण आणि पाणी टंचाईमुळे अक्षरश: कोंडमारा होत असल्यामुळे दुग्ध व्यवसायालासुध्दा याचा फार मोठा फटका बसत आहे़ तालुक्यातील मांगुर्डा, मुची या परिसरात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु यावर्षी कधी नव्हे एवढी चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आतापर्यंत चारा व पाण्याची टंचाई एवढी मोठी टंचाई कधीच निर्माण झाली नसल्याची माहिती मांगुर्डा मुची येथील श्यामराव गवळी यांनी दिली. पावसाचे कमी प्रमाण व पाण्याची पातळी खाली जात असल्यामुळे जंगलातील हिरवा चारा दिसेनासा झाला आहे़ जनावरांना चराईसाठी जंगलात किंवा टेकड्यावर नेण्यात येते़ यासोबत शेतातील धुऱ्यावरसुध्दा त्यांना चराईसाठी सोडल्या जाते़ परंतु आता ओलिताची पिके कमी घेतल्या जात असल्यामुळे व विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे आता काही शेतकरीच पुर्णपणे ओलिताची पिके घेताना दिसतात़ याचाही परिणाम चारा कमी होण्यावर झाला आहे़ ओलिताची पिके कमी असल्याने ठराविक शोतातच हिरवा चारा पाहावयाला मिळत आहे़ ज्याच्या शेतात असा चारा आहे त्यांना स्वत:च्या जनावरांसाठीच हा चारा उपयोगी पडत आहे़ उन्हाळ्यात जंगलातील चाऱ्याला वाढत्या तापमानामुळे आगी लागत असल्याने वैरण नष्ट होते़ आगीच्या वनव्यात वैरण नष्ट होत आहे.