शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

पांढरकवडात दुधाची आवक अर्ध्यावर

By admin | Updated: May 7, 2017 00:59 IST

जंगलातील चारा कमी झाल्यामुळे वैरणासाठी जनावरांची भटकंती सुरु झाली आहे़ पाण्याच्या कमतरतेमुळे गाई-म्हशींच्या दुधाचे प्रमाणही कमी झाले आहे़

१७ हजार लिटर दुधाची आवश्यकता : पाणी व वैरणाच्या कमतरतेमुळे जनावरांची भटकंती लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : जंगलातील चारा कमी झाल्यामुळे वैरणासाठी जनावरांची भटकंती सुरु झाली आहे़ पाण्याच्या कमतरतेमुळे गाई-म्हशींच्या दुधाचे प्रमाणही कमी झाले आहे़ यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायावर भीषण संकट निर्माण झाले आहे़ एकट्या पांढरकवडा शहरासाठी किमान १७ हजार लिटर दुधाची गरज असताना केवळ १० ते साडेदहा हजार लिटर दुधाची आवक होत असल्याने नागरिकांना पॉकेटच्या दुधावर गरज भागवावी लागत आहे. तालुक्यात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे गायी व म्हशी या दुधाळ जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात शेती व्यवसायाशी जनावरांचा जवळचा समंध आहे़ मे महिन्याची सध्या जेमतेम सुरूवात झाली असूनसुध्दा गुरांना वैरण मिळेनासे झाले आहे़ त्यामुळे गुरांना जंगलामध्ये चाऱ्याकरीता सर्वदूर फिरावे लागत आहे़ या जनावरांमध्ये गाई-म्हशी यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे़ दुधाचा व्यवसाय या प्राण्यांवरच अवलंबून आहे़ परंतु या प्राण्यांचा वैरण आणि पाणी टंचाईमुळे अक्षरश: कोंडमारा होत असल्यामुळे दुग्ध व्यवसायालासुध्दा याचा फार मोठा फटका बसत आहे़ तालुक्यातील मांगुर्डा, मुची या परिसरात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु यावर्षी कधी नव्हे एवढी चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आतापर्यंत चारा व पाण्याची टंचाई एवढी मोठी टंचाई कधीच निर्माण झाली नसल्याची माहिती मांगुर्डा मुची येथील श्यामराव गवळी यांनी दिली. पावसाचे कमी प्रमाण व पाण्याची पातळी खाली जात असल्यामुळे जंगलातील हिरवा चारा दिसेनासा झाला आहे़ जनावरांना चराईसाठी जंगलात किंवा टेकड्यावर नेण्यात येते़ यासोबत शेतातील धुऱ्यावरसुध्दा त्यांना चराईसाठी सोडल्या जाते़ परंतु आता ओलिताची पिके कमी घेतल्या जात असल्यामुळे व विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे आता काही शेतकरीच पुर्णपणे ओलिताची पिके घेताना दिसतात़ याचाही परिणाम चारा कमी होण्यावर झाला आहे़ ओलिताची पिके कमी असल्याने ठराविक शोतातच हिरवा चारा पाहावयाला मिळत आहे़ ज्याच्या शेतात असा चारा आहे त्यांना स्वत:च्या जनावरांसाठीच हा चारा उपयोगी पडत आहे़ उन्हाळ्यात जंगलातील चाऱ्याला वाढत्या तापमानामुळे आगी लागत असल्याने वैरण नष्ट होते़ आगीच्या वनव्यात वैरण नष्ट होत आहे.