शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात मनमानी

By admin | Updated: November 16, 2014 22:54 IST

येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात गेल्या काही दिवसात मनमानी कारभार सुरू आहे. नियमांचा बागुलबुवा करत हकनाक वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. नियमानुसार असलेल्या

यवतमाळ : येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात गेल्या काही दिवसात मनमानी कारभार सुरू आहे. नियमांचा बागुलबुवा करत हकनाक वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. नियमानुसार असलेल्या प्रकरणातही सातत्याने त्रुट्या काढून आलेल्या व्यक्तीला त्रस्त करण्याचा एककल्ली कार्यक्रम येथील अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. साध्या साध्या गोष्टीसाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी येथे खर्ची घालावा लागत आहे. शल्य चिकित्सक कार्यालयात सामान्य नागरिकापेक्षा सर्वाधिक शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनाच येरझारा माराव्या लागतात. आरोग्यविषयक तक्रारी असल्यास किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रासलेली असल्यास दीर्घ काळाच्या रजेसाठी या कार्यालयातून प्रमाणपत्र घेणे क्रमप्राप्त ठरते. अनेकांना अडचणीच्या क्षणासाठी शासनाकडून वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके दिली जातात. या देयकांना मंजुरी देण्याचा अधिकारही जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास आहे. मानसिकदृष्ट्या खचलेल्या आणि आरोग्यविषयक समस्यांनी पिचलेल्या व्यक्तीला येथे हमखास नाडवले जाते. अनावश्यक कारण पुढे करून जाणिवपूर्वक अधिकारात नसलेले आक्षेप या वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलांवर घेतले जातात. त्यामुळे आर्थिक अडचणीच्या काळातही शासनाच्या या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नाही. सामान्य नागरिकांनाही येथे असाच अनुभव आहे. बरेचदा शाळकरी विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज भासते. अशा विद्यार्थ्यांना एचआयव्हीसारख्या २५ ते ३० चाचण्या करण्यास भाग पाडले जाते. यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याकरिता एक ते दीड महिन्याचा कालावधी लागत आहे. यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणात अडवणूक झाली नव्हती. पूर्वीही आर्थिक देवाणघेवाणीचा व्यवहार येथे चालत होता. मात्र समोरच्या व्यक्तीची गरज ओळखून संवेदनशीलतेने काम हातावेगळे केले जात होते. आता साध्या साध्या प्रमाणपत्रासाठी एक ते दीड महिना कालावधी लागत असल्याने एक प्रकारे अडवणुकीचेच काम सुरू असल्याचा आरोप होत आहे. बरेचदा शासनाच्या निकषांना केराची टोपली दाखवून संबंधित नागरिकाला अथवा कर्मचाऱ्याला त्याच्या लाभापासून वंचित ठेवले जाते. या बाबत तक्रार घेवून गेलेल्या कर्मचाऱ्यांनी उलटकरणी लाच देण्याचा प्रयत्न करत असल्याची पोलिसात तक्रार देणार, अशी धमकी दिली जाते. या अजब प्रकारामुळे सर्वच जण त्रासलेले आहे. भेटीसाठी आलेल्या व्यक्तीलाही उशिरापर्यंत ताटकळत ठेवण्यात येते. येथील महिला कर्मचाऱ्यांना साडेपाच नंतरही कार्यालयीन कामकाजात व्यस्त ठेवले जाते. अशा अनेक प्रकारचे आरोप केले जात आहे. गेल्या काही दिवसात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय हे अनेकांसाठी खऱ्या अर्थाने शल्य देणारे ठरले आहे. येथील कुठलेही काम नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ अनेकांवर आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)