शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रणाअभावी सेतूमध्ये मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:42 IST

दहावीचा निकाल जाहीर झाल्याने यावर्षीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे. यामुळे सेतू केंद्रातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेतू केंद्रातील गैरप्रकार टाळण्यासाठी तेथे नायब तहसीलदार किंवा समकक्ष दर्जाचा एखादा अधिकारी देण्याची नितांत आवश्यकता आहे.

ठळक मुद्देगैरप्रकार वाढले : वणीच्या सेतूमध्ये नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दहावीचा निकाल जाहीर झाल्याने यावर्षीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे. यामुळे सेतू केंद्रातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेतू केंद्रातील गैरप्रकार टाळण्यासाठी तेथे नायब तहसीलदार किंवा समकक्ष दर्जाचा एखादा अधिकारी देण्याची नितांत आवश्यकता आहे.सेतू केंद्र हे नागरिकांसाठी सुविधा केंद्र आहे. परंतु वणीच्या सेतू केंद्रात ग्राहकांना नाडवले जात आहे. केंद्रातील अनागोंदी कारभारावर कोणाचाही वचक नाही. त्यामुळे येथे काम करणारे संगणक आॅपरेटरच अधिकाऱ्यांच्या आवेशात वागतात. काही मुले दिवसभर केंद्राच्या बाहेर सावज टिपण्याच्या कार्यात गुंतलेले असतात. बाहेर सावज गवसले की त्याचे काम तो म्हणेल त्या कालावधीत करून देण्याची हमी दिली जाते. सेतू केंद्राचा सर्व कारभार आॅनलाईन असतानाही मागचे प्रमाणपत्र एक-एक डेस्क पार करीत पुढे जाते. ज्याचा कोणी वाली नसतो, त्यांची प्रमाणपत्रे दिलेल्या मुदतही तयार करून मिळत नाही.प्रत्येक आॅपरेटर जादा पैसे ओढण्याच्या मानसिकतेतच संगणकापुढे बसलेला असतो. प्रस्ताव घेणारा तो तपासणारा व प्रमाणपत्र देणारा या सर्वच स्तरावर गांधीजींच्या आशिर्वादानेच काम लवकर होते. जात प्रमाणपत्रासाठी शासनाने २४ नोव्हेंबर २०१७ ला राजपत्र भाग चार-ब प्रसिद्ध करून स्पष्ट केले की, अर्जदाराच्या रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र जोडले असल्यास तो महत्वाचा पुरावा मानून इतर पुराव्याची मागणी न करता सक्षम प्राधिकाºयाने जातीचे प्रमाणपत्र निर्गमीत करावे. असे असतानाही वणीच्या सेतूमध्ये कोतवाली बुकाची नक्कल व तेथीलच रहिवासी दाखला याची मागणी केली जाते. शासनाच्या राजपत्रात संबंधित अधिकारी व सेतू केंद्रापर्यंत पोहोचले नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.