शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नियंत्रणाअभावी सेतूमध्ये मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:42 IST

दहावीचा निकाल जाहीर झाल्याने यावर्षीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे. यामुळे सेतू केंद्रातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेतू केंद्रातील गैरप्रकार टाळण्यासाठी तेथे नायब तहसीलदार किंवा समकक्ष दर्जाचा एखादा अधिकारी देण्याची नितांत आवश्यकता आहे.

ठळक मुद्देगैरप्रकार वाढले : वणीच्या सेतूमध्ये नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दहावीचा निकाल जाहीर झाल्याने यावर्षीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे. यामुळे सेतू केंद्रातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेतू केंद्रातील गैरप्रकार टाळण्यासाठी तेथे नायब तहसीलदार किंवा समकक्ष दर्जाचा एखादा अधिकारी देण्याची नितांत आवश्यकता आहे.सेतू केंद्र हे नागरिकांसाठी सुविधा केंद्र आहे. परंतु वणीच्या सेतू केंद्रात ग्राहकांना नाडवले जात आहे. केंद्रातील अनागोंदी कारभारावर कोणाचाही वचक नाही. त्यामुळे येथे काम करणारे संगणक आॅपरेटरच अधिकाऱ्यांच्या आवेशात वागतात. काही मुले दिवसभर केंद्राच्या बाहेर सावज टिपण्याच्या कार्यात गुंतलेले असतात. बाहेर सावज गवसले की त्याचे काम तो म्हणेल त्या कालावधीत करून देण्याची हमी दिली जाते. सेतू केंद्राचा सर्व कारभार आॅनलाईन असतानाही मागचे प्रमाणपत्र एक-एक डेस्क पार करीत पुढे जाते. ज्याचा कोणी वाली नसतो, त्यांची प्रमाणपत्रे दिलेल्या मुदतही तयार करून मिळत नाही.प्रत्येक आॅपरेटर जादा पैसे ओढण्याच्या मानसिकतेतच संगणकापुढे बसलेला असतो. प्रस्ताव घेणारा तो तपासणारा व प्रमाणपत्र देणारा या सर्वच स्तरावर गांधीजींच्या आशिर्वादानेच काम लवकर होते. जात प्रमाणपत्रासाठी शासनाने २४ नोव्हेंबर २०१७ ला राजपत्र भाग चार-ब प्रसिद्ध करून स्पष्ट केले की, अर्जदाराच्या रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र जोडले असल्यास तो महत्वाचा पुरावा मानून इतर पुराव्याची मागणी न करता सक्षम प्राधिकाºयाने जातीचे प्रमाणपत्र निर्गमीत करावे. असे असतानाही वणीच्या सेतूमध्ये कोतवाली बुकाची नक्कल व तेथीलच रहिवासी दाखला याची मागणी केली जाते. शासनाच्या राजपत्रात संबंधित अधिकारी व सेतू केंद्रापर्यंत पोहोचले नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.