शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रणाअभावी सेतूमध्ये मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:42 IST

दहावीचा निकाल जाहीर झाल्याने यावर्षीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे. यामुळे सेतू केंद्रातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेतू केंद्रातील गैरप्रकार टाळण्यासाठी तेथे नायब तहसीलदार किंवा समकक्ष दर्जाचा एखादा अधिकारी देण्याची नितांत आवश्यकता आहे.

ठळक मुद्देगैरप्रकार वाढले : वणीच्या सेतूमध्ये नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दहावीचा निकाल जाहीर झाल्याने यावर्षीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे. यामुळे सेतू केंद्रातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेतू केंद्रातील गैरप्रकार टाळण्यासाठी तेथे नायब तहसीलदार किंवा समकक्ष दर्जाचा एखादा अधिकारी देण्याची नितांत आवश्यकता आहे.सेतू केंद्र हे नागरिकांसाठी सुविधा केंद्र आहे. परंतु वणीच्या सेतू केंद्रात ग्राहकांना नाडवले जात आहे. केंद्रातील अनागोंदी कारभारावर कोणाचाही वचक नाही. त्यामुळे येथे काम करणारे संगणक आॅपरेटरच अधिकाऱ्यांच्या आवेशात वागतात. काही मुले दिवसभर केंद्राच्या बाहेर सावज टिपण्याच्या कार्यात गुंतलेले असतात. बाहेर सावज गवसले की त्याचे काम तो म्हणेल त्या कालावधीत करून देण्याची हमी दिली जाते. सेतू केंद्राचा सर्व कारभार आॅनलाईन असतानाही मागचे प्रमाणपत्र एक-एक डेस्क पार करीत पुढे जाते. ज्याचा कोणी वाली नसतो, त्यांची प्रमाणपत्रे दिलेल्या मुदतही तयार करून मिळत नाही.प्रत्येक आॅपरेटर जादा पैसे ओढण्याच्या मानसिकतेतच संगणकापुढे बसलेला असतो. प्रस्ताव घेणारा तो तपासणारा व प्रमाणपत्र देणारा या सर्वच स्तरावर गांधीजींच्या आशिर्वादानेच काम लवकर होते. जात प्रमाणपत्रासाठी शासनाने २४ नोव्हेंबर २०१७ ला राजपत्र भाग चार-ब प्रसिद्ध करून स्पष्ट केले की, अर्जदाराच्या रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र जोडले असल्यास तो महत्वाचा पुरावा मानून इतर पुराव्याची मागणी न करता सक्षम प्राधिकाºयाने जातीचे प्रमाणपत्र निर्गमीत करावे. असे असतानाही वणीच्या सेतूमध्ये कोतवाली बुकाची नक्कल व तेथीलच रहिवासी दाखला याची मागणी केली जाते. शासनाच्या राजपत्रात संबंधित अधिकारी व सेतू केंद्रापर्यंत पोहोचले नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.