शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

आर्णीची पाणीपुरवठा योजना ४१ कोटींवर

By admin | Updated: August 18, 2014 23:49 IST

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आर्णी येथील नागरिकांच्या जीवनावश्यक व जिव्हाळ्याची पाणी पुरवठा योजना अखेरीस मार्गी लागली असून, आता ही योजना ४१.८१ कोटींवर पोहोचल्याची

हरीओम बघेल - आर्णीगेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आर्णी येथील नागरिकांच्या जीवनावश्यक व जिव्हाळ्याची पाणी पुरवठा योजना अखेरीस मार्गी लागली असून, आता ही योजना ४१.८१ कोटींवर पोहोचल्याची माहिती पत्र परिषदेत देण्यात आली. आर्णी ही ग्रामपंचायत असताना राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आर्णी ग्रामपंचायतला कायम स्वरूपी पाणीपुरवठा योजना १८ कोटींची मंजूर झाली होती. यानंतर यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली होण्यापूर्वीच ग्रामपंचायतचे रुपांतर १६ आॅगस्ट २०११ रोजी नगर परिषदेत झाले. त्यानंतर शासनाने नगर परिषदेसाठी असलेल्या सूजल, निर्मल अभियानांतर्गत आर्णी नगर परिषद पाणीपुरवठा योजनेकरिता प्रस्ताव मागितला. नगर परिषदेने जीवन प्राधिकरणाकडून सर्वेक्षण, आराखडा व अंदाजपत्रक बनवून त्वरित सादर केले. यानंतर या योजनेसाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे सदर योजना ४१.८१ कोटींची मंजूर झाली. या निधीला तांत्रिक मान्यतासुद्धा मिळाली आहे. २७ किलोमीटर लोखंडी पाईपव्दारा अरूणावती धरणातून आर्णी शहरातील पाण्याच्या टाकीत पाणी आणल्या जाईल. यासाठी जुन्या अस्तित्वात असलेल्या २.७५ व १.५ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांसोबतच दोन पाच लाख व साडे चार लाख लिटर क्षमतेच्या टक्यांची निर्मिती करण्यात येईल. शहरांतर्गत ७० किलोमीटर वितरण व्यवस्था राहील. १०० ते २०० मिलीमीटरची पाईप लाईन जाणार आहे. या योजनेसाठी नगर परिषदेने निविदा प्रक्रियेसाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या योजनेसंदर्भात कामात अडचणी येणार नाही. व ई-निविदा पद्धतीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने हे काम करता येईल. या योजनेसाठी असलेल्या निधीच्या एकूण रकमेच्या ९० टक्के वाटा राज्य शासनाचा असून, १० टक्के रक्कम नगर परिषदेला खर्च करावी लागणार आहे. ही रक्कम नगर परिषद पाणीकर, गृहकर, विकास शुल्क व तेराव्या वित्त आयोग निधीतून भरणार आहेत. या योजनेचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार असून, ही योजना सुरू होण्याची १८ महिन्यांचा कालावधी लागेल. योजना पूर्ण झाल्यानंतर १२ महिने ती संबंधित कंत्राटदाराला चालवून दाखवावी लागेल. या कालावधीत काय अडचणी येतात याचाही विचार होईल. या अडचणी दूर झाल्यानंतर ही योजना नगर परिषदेला हस्तांतरण करून घेऊ यामुळे आर्णीकरांना शुद्ध पाणी मिळू शकेल अशी माहिती पत्र परिषदेत देण्यात आली. या योजनेमुळे आर्णी शहराचा शुद्ध पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष आरीज बेग, उपाध्यक्ष निता ठाकरे व पाणीपुरवठा सभापती निता ठाकरे यांची उपस्थिती होती.