शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

वृक्ष लागवड जनचळवळ करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 9:26 PM

वृक्ष लागवड मोहिमेला जन चळवळ करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहे. या चळवळीला प्रत्येकाचा हातभार लागला , तर निसर्गाचे सौंदर्य परत येण्यास वेळ लागणार नाही. याकरिता वृक्ष लागवड गरजेची आहे. याबाबत यवतमाळचे विभागीय वन अधिकारी भाऊराव राठोड यांच्याशी साधलेला संवाद.

ठळक मुद्देभविष्यात जिल्हा होणार हिरवागार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वृक्ष लागवड मोहिमेला जन चळवळ करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहे. या चळवळीला प्रत्येकाचा हातभार लागला , तर निसर्गाचे सौंदर्य परत येण्यास वेळ लागणार नाही. याकरिता वृक्ष लागवड गरजेची आहे. याबाबत यवतमाळचे विभागीय वन अधिकारी भाऊराव राठोड यांच्याशी साधलेला संवाद.त्याच त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वृक्ष लावले जातात काय?वृक्ष लागवड करण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत पूर्णत: पारदर्शकता आणली आहे. विशेष म्हणजे वृक्ष लागवड करणारे सर्व स्पॉट आॅनलाईन आहेत. यात कुणाला शंका वाटली, तर ते त्या संकेतस्थळावर जाऊन पाहणी करू शकतात. प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटही देऊ शकतात. यामुळे त्याच जागी पुन्हा वृक्ष लागवड होण्याचा प्रकार थांबला आहे.वृक्ष लागवडीत गैरप्रकार झाला तर?वृक्ष लागवडीत गैरप्रकार घडू नये म्हणून पारदर्शकता आणली. स्मार्टफोनचा वापर करून एका विशिष्ट सॉफ्टवेअरने संकेतस्थळ जोडले. ज्या ठिकाणी वृक्षांची लागवड झाली, त्याचा अक्षांश आणि रेखांश या ठिकाणी दिसतो. एक अक्षांश आणि रेखांश पुन्हा ओव्हरलॅप होत नाही. तेच ठिकाण दाखविले तर हे ओव्हरलॅप दृष्टीस पडेल. अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई व महाराष्ट्र शिस्त नियमानुसार कारवाई होणार आहे.जंगल का वाढत नाही?वृक्षारोपणाचे काम गत तीन-चार वर्षांपासून सुरू झाले. नवीन जंगल तयार होत आहे. प्रत्यक्षस्थळी भेट दिल्यास नवीन जंगल आपल्या दृष्टीस पडतील. सध्या झाडे लहान आहेत. ती मोठी झाल्यानंतर येत्या काळात जंगल वाढलेले दिसतील. यवतमाळ जिल्हा आधीच वनसंपदेने नटलेला आहे. वनांच्या सौंदर्यात भविष्यात भर पडेल. यवतमाळ जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे. मात्र बेसुमार वृक्षतोड झाल्याने जंगलाच्या सौंदर्याला बाधा पोहोचली. तथा भविष्यात जंगलामध्ये मोठी वाढ होणार आहे.जिल्ह्यातील १४२ नर्सरीमधून यावर्षी रोपटी आणली जाईल. या नर्सरीत एक कोटी १४ लाख ३७ हजार रोपटी तयार आहे. यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद विभागातील यंत्रणा वृक्ष लागवड करण्यासाठी तयार आहे. खड्डे खोदले जात आहे. त्यात पुढे रोपटी लावली जातील.यंदा दीड कोटी झाडे लावणारवृक्ष लागवड करताना अनेक बारकावे टिपण्यात आले आहे. कमी पाण्यात जगणारे आणि अधिक काळ टिकणारे वृक्ष लावण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार विविध नर्सरीमध्ये रोपटी तयार करण्यात आली आहे. कडूनिंबासारख्या रोपट्यांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात यावर्षी एक कोटी ३७ लाग रोपटी लावण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये वनविभागाला ६४ लाख ४७ हजार रोपटी लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींसह विविध संघटना आणि शासकीय विभागांचे सहकार्य मिळणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग