शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आॅगस्टपर्यंत प्रलंबित कामे मार्गी लावा

By admin | Updated: July 3, 2015 00:23 IST

आॅगस्टपर्यंत सर्व प्रलंबित कामे मार्गी लावा अशा सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबी : दारव्हा येथे आढावा बैठकदारव्हा : आॅगस्टपर्यंत सर्व प्रलंबित कामे मार्गी लावा अशा सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दारव्हा येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या.विविध विभागाच्या विकासकामांचा आढावा घेण्याकरिता येथील बचत भवनात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पद्भार स्वीकारल्यानंतर त्यांची दारव्हा उपविभागाला पहिलीच भेट होती. त्यांच्या कामाचा धडाका पाहता बैठकीत नेमक काय होणार, याची सर्वांना धास्ती होती. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांच्या मनातील भीती दूर करत मला कुणाचे नुकसान करायचे नाही, तुमच्याकडून काम करून घ्यायचे आहे, असे सुरुवातीला सांगून टाकले. त्यामुळे आजची आढावा बैठक शांततेत पार पडली.बैठकीत तहसील, पंचायत समिती, कृषी विभागाच्या योजनांची प्रगती व कामांचा आढावा घेण्यात आला. त्या-त्या विभाग प्रमुखांनी या बाबत माहिती दिली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कामांबाबत कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. लोकांची प्रामाणिकपणे कामे करा, त्यांच्यापर्यंत पोहचा. गावाला भेट देण्याच्या तारखा व आपला मोबाईल क्रमांक बोर्डावर लिहा, काम करताना काही अडचणी येत असेल तर आपल्याला कळवा, असे सांगितले. प्रलंबित कामांबद्दल बोलताना सर्व प्रलंबित कामे आॅगस्टपर्यंत पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.बैठकीला उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, तहसीलदार प्रकाश राऊत, ठाणेदार मानकर, गटविकास अधिकारी घुगे, तालुका कृषी अधिकारी अंगाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन कामांची तपासणी केली. त्यानंतर अनेक लोकांकडून निवेदने स्वीकारली. (तालुका प्रतिनिधी)