शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

‘अर्ज द्या, कर्ज घ्या’चा फलक दुसऱ्याच दिवशी काढला

By admin | Updated: June 26, 2016 02:32 IST

सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या मिळण्यासाठी ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ मोहीम जिल्ह्यात हाती घेण्यात आली.

राष्ट्रीयकृत बँकांची अनास्था : रविवारी बँकांच्या मोहिमेचा अखेरचा टप्पा, शेतकरी सापडला आर्थिक संकटातयवतमाळ : सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या मिळण्यासाठी ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ मोहीम जिल्ह्यात हाती घेण्यात आली. राष्ट्रीयकृत बँकांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. यामुळे पहिल्या टप्प्यात केवळ चार हजार शेतक री पुढे आले. तर २६ जूनला मोहिमेचा शेवटचा टप्पा आहे. आता बँकांनी गांभीर्य दाखविले तरच उर्वरित शेतकऱ्यांचे अर्ज येणार आहे. त्यावरच कर्ज वितरणाची टक्केवारी अवलंबून राहणार आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाचे जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. यातून ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ योजना हाती घेण्यात आली. त्याला राष्ट्रीयकृत बँकांनी होकार दिला. मात्र गावापर्यंत योजनीची प्रसिद्धी केली नाही. परिणामी पहिल्या टप्प्यात केवळ चार हजार शेतकरी पुढे आले. दोन लाख २० हजार शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचलाच नाही. रविवारी २६ जूनला मोहिमेचा अंतिम टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात ज्या उणिवा राहिल्या, त्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण केल्या किंवा नाही याबाबत अर्जाच्या संख्येवरून उत्तर मिळेल. विशेष म्हणजे, या संपूर्ण योजनेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. यामुळे या योजनेची अंमलबजावणी महत्त्वाची मानली जात आहे. प्रतिसाद न देणाऱ्या बँकावर शासन कुठले पाऊल उचलणार यावरच कर्ज वाटपाचे गणित ठरणार आहे. (शहर वार्ताहर)दाखल झालेले अर्ज१९ जून रोजी राष्ट्रीयकृत बँकांकडे चार हजार १०३ अर्ज आले. यामध्ये ५८ हजार नीवन सभासदांपैकी एक हजार ४९९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. नव्याने कर्ज मागणीसाठी अर्ज करणारे एक हजार ४१३ शेतकरी तर एक हजार १९१ शेतकऱ्यांचे पुनर्गठणाचे अर्ज आहेत.फलक काढले१९ जूनला कर्ज वितरणाचे फलक लावणाऱ्या बँकांनी २० जूनला फलक चक्क काढून घेतले. यामुळे काही बँका कर्ज वितरणाबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होते. रविवारी शेतकरी व बँकांची परीक्षाच राहणार आहे. जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.