शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘अर्ज द्या, कर्ज घ्या’चा फलक दुसऱ्याच दिवशी काढला

By admin | Updated: June 26, 2016 02:32 IST

सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या मिळण्यासाठी ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ मोहीम जिल्ह्यात हाती घेण्यात आली.

राष्ट्रीयकृत बँकांची अनास्था : रविवारी बँकांच्या मोहिमेचा अखेरचा टप्पा, शेतकरी सापडला आर्थिक संकटातयवतमाळ : सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या मिळण्यासाठी ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ मोहीम जिल्ह्यात हाती घेण्यात आली. राष्ट्रीयकृत बँकांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. यामुळे पहिल्या टप्प्यात केवळ चार हजार शेतक री पुढे आले. तर २६ जूनला मोहिमेचा शेवटचा टप्पा आहे. आता बँकांनी गांभीर्य दाखविले तरच उर्वरित शेतकऱ्यांचे अर्ज येणार आहे. त्यावरच कर्ज वितरणाची टक्केवारी अवलंबून राहणार आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाचे जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. यातून ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ योजना हाती घेण्यात आली. त्याला राष्ट्रीयकृत बँकांनी होकार दिला. मात्र गावापर्यंत योजनीची प्रसिद्धी केली नाही. परिणामी पहिल्या टप्प्यात केवळ चार हजार शेतकरी पुढे आले. दोन लाख २० हजार शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचलाच नाही. रविवारी २६ जूनला मोहिमेचा अंतिम टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात ज्या उणिवा राहिल्या, त्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण केल्या किंवा नाही याबाबत अर्जाच्या संख्येवरून उत्तर मिळेल. विशेष म्हणजे, या संपूर्ण योजनेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. यामुळे या योजनेची अंमलबजावणी महत्त्वाची मानली जात आहे. प्रतिसाद न देणाऱ्या बँकावर शासन कुठले पाऊल उचलणार यावरच कर्ज वाटपाचे गणित ठरणार आहे. (शहर वार्ताहर)दाखल झालेले अर्ज१९ जून रोजी राष्ट्रीयकृत बँकांकडे चार हजार १०३ अर्ज आले. यामध्ये ५८ हजार नीवन सभासदांपैकी एक हजार ४९९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. नव्याने कर्ज मागणीसाठी अर्ज करणारे एक हजार ४१३ शेतकरी तर एक हजार १९१ शेतकऱ्यांचे पुनर्गठणाचे अर्ज आहेत.फलक काढले१९ जूनला कर्ज वितरणाचे फलक लावणाऱ्या बँकांनी २० जूनला फलक चक्क काढून घेतले. यामुळे काही बँका कर्ज वितरणाबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होते. रविवारी शेतकरी व बँकांची परीक्षाच राहणार आहे. जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.