शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

‘अर्ज द्या, कर्ज घ्या’चा फलक दुसऱ्याच दिवशी काढला

By admin | Updated: June 26, 2016 02:32 IST

सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या मिळण्यासाठी ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ मोहीम जिल्ह्यात हाती घेण्यात आली.

राष्ट्रीयकृत बँकांची अनास्था : रविवारी बँकांच्या मोहिमेचा अखेरचा टप्पा, शेतकरी सापडला आर्थिक संकटातयवतमाळ : सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या मिळण्यासाठी ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ मोहीम जिल्ह्यात हाती घेण्यात आली. राष्ट्रीयकृत बँकांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. यामुळे पहिल्या टप्प्यात केवळ चार हजार शेतक री पुढे आले. तर २६ जूनला मोहिमेचा शेवटचा टप्पा आहे. आता बँकांनी गांभीर्य दाखविले तरच उर्वरित शेतकऱ्यांचे अर्ज येणार आहे. त्यावरच कर्ज वितरणाची टक्केवारी अवलंबून राहणार आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाचे जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. यातून ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ योजना हाती घेण्यात आली. त्याला राष्ट्रीयकृत बँकांनी होकार दिला. मात्र गावापर्यंत योजनीची प्रसिद्धी केली नाही. परिणामी पहिल्या टप्प्यात केवळ चार हजार शेतकरी पुढे आले. दोन लाख २० हजार शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचलाच नाही. रविवारी २६ जूनला मोहिमेचा अंतिम टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात ज्या उणिवा राहिल्या, त्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण केल्या किंवा नाही याबाबत अर्जाच्या संख्येवरून उत्तर मिळेल. विशेष म्हणजे, या संपूर्ण योजनेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत. यामुळे या योजनेची अंमलबजावणी महत्त्वाची मानली जात आहे. प्रतिसाद न देणाऱ्या बँकावर शासन कुठले पाऊल उचलणार यावरच कर्ज वाटपाचे गणित ठरणार आहे. (शहर वार्ताहर)दाखल झालेले अर्ज१९ जून रोजी राष्ट्रीयकृत बँकांकडे चार हजार १०३ अर्ज आले. यामध्ये ५८ हजार नीवन सभासदांपैकी एक हजार ४९९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. नव्याने कर्ज मागणीसाठी अर्ज करणारे एक हजार ४१३ शेतकरी तर एक हजार १९१ शेतकऱ्यांचे पुनर्गठणाचे अर्ज आहेत.फलक काढले१९ जूनला कर्ज वितरणाचे फलक लावणाऱ्या बँकांनी २० जूनला फलक चक्क काढून घेतले. यामुळे काही बँका कर्ज वितरणाबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होते. रविवारी शेतकरी व बँकांची परीक्षाच राहणार आहे. जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.