शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

पंतप्रधान पीक विम्याचे अर्ज आज पोहोचणार

By admin | Updated: July 26, 2016 00:04 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज सोमवारी पोहोचतील, अशी हमी रिलायन्स कंपनीतर्फे जिल्हा प्रशासनाला दिली होती.

८० हजार अर्ज : उरले केवळ चार दिवस यवतमाळ : पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज सोमवारी पोहोचतील, अशी हमी रिलायन्स कंपनीतर्फे जिल्हा प्रशासनाला दिली होती. प्रत्यक्षात दिवसभर बँकांमध्ये अर्ज पोहोचले नाही. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यावर सारवासारव करीत, रात्री उशिरा अर्ज येतील आणि मंगळवारी ८० हजार अर्जाचे वितरण होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात अर्ज भरण्यासाठी चार दिवस उरले आहेत. मागणीच्या तुलनेत अर्ज अपुरे असल्याची तक्रार बँक व्यवस्थापकांनी कंपनीच्या प्रतिनिधीकडे केली होती. चारच दिवस उरलेले असतानाही जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज पोहोचले नाही. यामुळे पीक विमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. कंपनी सोमवारी अर्ज पाठवेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात सोमवारी अर्ज पोहोचले नाही. याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींनी सोमवारी उशिरा रात्रीपर्यंत अर्ज पोहोचतील, असे कृषी विभागाला सांगितले. मात्र अशी स्थिती मंगळवारी उद्भवू नये म्हणून बँका पाठपुरावा करीत आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा शाखेत पंतप्रधान पीक विमा योजनेचे ८० हजार अर्ज पोहोचणार आहेत. या ठिकाणावरून जिल्ह्यातील विविध बँकांना हे अर्ज पाठविले जाणार आहे. या ठिकाणी अर्ज कधी पोहोचतील यावर समोरील प्रवास अवलंबून राहणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना अर्ज मिळणार आहेत. जिल्ह्यातील बँकांना ३३ हजार अर्ज उपलब्ध झाले आहेत. ८० हजार अर्ज येणार आहेत. पूर्वी पोहोचलेले अर्ज आणि नव्याने येणारे अर्ज याची गोळाबेरीज एक लाख १३ हजारांच्या घरात जाते. यानंतरही दोन लाख ८७ हजार शेतकऱ्यांसाठी लागणारे अर्ज कुठून आणि कधी येतील, असा प्रश्न आहे. चार दिवसात ही कसरत कंपनी कशी करणार आणि या गोंधळात शेतकऱ्यांना पीक विमा काढता येणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. (शहर वार्ताहर)अंतिम क्षणाला प्रश्न सुटेल का?जिल्ह्याला पावणे चार लाख अर्जाची प्रतीक्षा असताना अंतिम टप्प्यात ८० हजार अर्ज वळते केले आहे. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा काढता येईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कुठल्या उपाययोजना होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विमा उतरविताना ओळखपत्र सक्तीचेपीक विमा उतरविताना शेतकऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे विमा काढताना यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांना अर्जासोबत ओळखपत्रही जोडावे लागणार आहे.