शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

पंतप्रधान पीक विम्याचे अर्ज आज पोहोचणार

By admin | Updated: July 26, 2016 00:04 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज सोमवारी पोहोचतील, अशी हमी रिलायन्स कंपनीतर्फे जिल्हा प्रशासनाला दिली होती.

८० हजार अर्ज : उरले केवळ चार दिवस यवतमाळ : पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज सोमवारी पोहोचतील, अशी हमी रिलायन्स कंपनीतर्फे जिल्हा प्रशासनाला दिली होती. प्रत्यक्षात दिवसभर बँकांमध्ये अर्ज पोहोचले नाही. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यावर सारवासारव करीत, रात्री उशिरा अर्ज येतील आणि मंगळवारी ८० हजार अर्जाचे वितरण होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात अर्ज भरण्यासाठी चार दिवस उरले आहेत. मागणीच्या तुलनेत अर्ज अपुरे असल्याची तक्रार बँक व्यवस्थापकांनी कंपनीच्या प्रतिनिधीकडे केली होती. चारच दिवस उरलेले असतानाही जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज पोहोचले नाही. यामुळे पीक विमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. कंपनी सोमवारी अर्ज पाठवेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात सोमवारी अर्ज पोहोचले नाही. याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींनी सोमवारी उशिरा रात्रीपर्यंत अर्ज पोहोचतील, असे कृषी विभागाला सांगितले. मात्र अशी स्थिती मंगळवारी उद्भवू नये म्हणून बँका पाठपुरावा करीत आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा शाखेत पंतप्रधान पीक विमा योजनेचे ८० हजार अर्ज पोहोचणार आहेत. या ठिकाणावरून जिल्ह्यातील विविध बँकांना हे अर्ज पाठविले जाणार आहे. या ठिकाणी अर्ज कधी पोहोचतील यावर समोरील प्रवास अवलंबून राहणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना अर्ज मिळणार आहेत. जिल्ह्यातील बँकांना ३३ हजार अर्ज उपलब्ध झाले आहेत. ८० हजार अर्ज येणार आहेत. पूर्वी पोहोचलेले अर्ज आणि नव्याने येणारे अर्ज याची गोळाबेरीज एक लाख १३ हजारांच्या घरात जाते. यानंतरही दोन लाख ८७ हजार शेतकऱ्यांसाठी लागणारे अर्ज कुठून आणि कधी येतील, असा प्रश्न आहे. चार दिवसात ही कसरत कंपनी कशी करणार आणि या गोंधळात शेतकऱ्यांना पीक विमा काढता येणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. (शहर वार्ताहर)अंतिम क्षणाला प्रश्न सुटेल का?जिल्ह्याला पावणे चार लाख अर्जाची प्रतीक्षा असताना अंतिम टप्प्यात ८० हजार अर्ज वळते केले आहे. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा काढता येईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कुठल्या उपाययोजना होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विमा उतरविताना ओळखपत्र सक्तीचेपीक विमा उतरविताना शेतकऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे विमा काढताना यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांना अर्जासोबत ओळखपत्रही जोडावे लागणार आहे.