शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
4
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
5
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
6
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
7
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
9
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
10
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
11
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
12
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
13
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
14
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
15
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
16
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
17
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
18
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
19
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
20
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!

खून करून अपघाताचा देखावा

By admin | Updated: March 6, 2015 02:16 IST

वणी-शिरपूर मार्गावरील निलगीरी वनालगत मंदरजवळील एका पुलाजवळ गेल्या २३ फेब्रुवारीला प्रशांत चिंतामण रणदीवे (३१) रा.उकणी, या युवकाचा मृतदेह आढळून आला होता.

वणी : वणी-शिरपूर मार्गावरील निलगीरी वनालगत मंदरजवळील एका पुलाजवळ गेल्या २३ फेब्रुवारीला प्रशांत चिंतामण रणदीवे (३१) रा.उकणी, या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याप्रकरणी प्रथम अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासाअंती तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली.प्रशांत चिंतामण रणदीवे हा युवक २२ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजतापासून उकणी येथून आपल्या एम.एच.२९-डब्ल्यू.१८३८ क्रमांकाच्या दुचाकीने बाहेर गेला होता. तो दुसऱ्या दिवशी २३ फेब्रुवारीला वणीवरून शिरपूरकडे जाणाऱ्या मार्गावरील निलगीरी वनाजवळील एका नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाजवळ तो दुचाकीसह पडून असल्याचे आढळले होते. घटनेची माहिती कळताच ठाणेदार अस्लम खान ताफ्यासह तेथे पोहोचले होते. स्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. मृतकाच्या डोक्यावर आणि पोटावर जखमा आढळून आल्या होत्या. प्रशांतचा मृतदेह रूग्णालयात आणल्यानंतर तेथे नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती. काहींनी पोलीस ठाण्याकडे धाव घेत हा घातपात असल्याचा दावा केला होता. मात्र प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्यावेळी अपघाताची नोंद केली होती. तथापि मृतक प्रशांतच्या डोक्याला व पोटाला गंभीर मार असल्याने पोलीस खुनाच्या दिशेनेही तपास करीत होते. या दरम्यान मृतकाच्या वडिलांनी तक्रार करून हा घातपाच असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. काल बुधवारी गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यांनी पोलीस अधीक्षकांशी बोलून याप्रकरणी कारवाई करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर लगेच रात्री यवतमाळ येथील गुन्हे अन्वेषण पथकाने निळापूर येथील अनिल गोविंदा बोढाले नामक युवकाला ताब्यात घेतले. त्यानंतर वणी पोलिसांनी गुरूवारी पूजा अनिल बोढाले (२७), विनोद मिलमीले (३२) रा.विरकुंड, वामन गोपाल पाचभाई (४५) रा.शेलू या चौघांना गुरूवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. यातील अनिल बोढाले हा यापूर्वी भाजपा युवा मोर्चाचा निळापूर शाखा अध्यक्ष होता, अशी माहिती आहे. तथापि अनिल सध्या कोणत्याही पदावर नसल्याचे सांगण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)पोलिसांची वर्चस्वासाठी लढाईया प्रकरणाचा तपास येथील ठाणेदार अस्लम खान यांच्याकडे होता. त्यांनी डीबी पथकातील साजीद व इतर सदस्यांसह या प्रकरणातील कॉल डिटेल्स प्राप्त केले. त्यावरून ते आरोपींपर्यत पोहोचण्याच्या बेतात होते. याबाबत काही वरिष्ठांना माहितीही देण्यात आली. दरम्यान गृह राज्यमंत्र्यांचा दौरा आला. त्यात बुधवारी येथील पोलीस व्यस्त होते. नेमकी हिच संधी साधून गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पुजलवार, पतंगे, गजानन डोंगरे, यादव, साठवणे, जागृत आदींनी आपली मोहीम फत्ते केली अन् अनिल बोढाले याला ताब्यात घेतले. यावरून पोलिसांमध्येच वर्चस्वाची लढाई रंगली. गुन्हा कोणी उघडकीस आणला, आरोपी कोणी ताब्यात घेतला, यावरून त्यांच्यातच चांगली ‘तू-तू,मै-मै’ झाली. अखेर अनिलला वणी पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक रात्रीच यवतमाळला परत गेले. ‘लोकमत’चा अंदाज ठरला खराप्रशांतच्या मृत्युप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी २३ फेब्रुवारीला गर्दी केली होती. मात्र तेव्हा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त होताच, याप्रकरणी पुढील निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले होते. ‘लोकमत’ने तेव्हाच अपघाताचा गुन्हा नोंद होऊनही पोलीस खुनाच्या दिशेनेही तपास करीत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. आता ते वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. पोलिसांनी आरोपींना गाफील ठेवण्यासाठीच ही खेळी केली. त्यामुळे आरोपी निश्चिंत होते. अशी घडली घटनाया घटनेतील मृतक प्रशांतचे दोन वर्षांपासून पूजाशी प्रेमसंबंध होते. गेले काही दिवस मृतकाचे पूजाला सतत भ्रमणध्वनी येत होते. त्याला कंटाळून तिने याबाबत कुटुंबियांना अवगत केले होते. नंतर संगनमत करून या चौघांनी मृतक प्रशांतला २३ फेब्रुवारीला सायंकाळी निळापूर येथे घरी बोलविले. तेथे रात्री १0 वाजताच्या सुमारास प्रशांतला तिघांनी पकडून ठेवले. एकाने त्याच्या डोक्यावर वार केले. त्यात प्रशांत ठार झाला. नंतर त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून यापैकी दोघांनी दुचाकीवर मधात ठेवून घुग्गुस मार्गावरील निलगिरी वनाजळील एका निर्माणाधीन पुलाजवळ टाकून तेथे अपघाताचा देखावा निर्माण केला. घरी परत आल्यानंतर त्यांनी चादर व रक्ताने माखलेले कपडे, तसेच मृतकाचा मोबाईल निळापूर येथील शेतात जाळून अपुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.