शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

सतत ग्रंथांच्या सहवासात राहण्याचे आवाहन

By admin | Updated: February 21, 2016 02:08 IST

सध्याच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांनी सतत ग्रांथाच्या सहवासात राहावे, असे आवाहन जयसिंग गोहोकार यांनी केले.

जयसिंग गोहोकार : ‘बार्टी’तर्फे आदर्शला पुस्तकांची भेटवणी : सध्याच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांनी सतत ग्रांथाच्या सहवासात राहावे, असे आवाहन जयसिंग गोहोकार यांनी केले. ते बुधवारी येथील आदर्श विद्यालयात ‘बार्टी’तर्फे ग्रंथ भेट कार्यक्रमात बोलत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन केवळ ज्ञानार्जनाला वाहून घेतले होते. त्यांचे ग्रंथ वाचन, लेखन व विचार आजही नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यांच्या देश व समाजाच्या विकासाला गती देणारे व दिशा देणारे ग्रंथ प्रेम व लेखनाचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक समितीचे सचिव तथा कार्यकारी अध्यक्ष जयसिंग गोहोकार यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले, माझ्याकडच्या मौल्यवान वस्तू चोरांनी चोरून नेल्यानंतर मला विशेष काही वाटणार नाही. मात्र माझी पुस्तके, ग्रंथ कोणी चोरून नेत असतील, तर मी प्रमाणपणाने लढून चोरांना पळवून लावून माझ्या ग्रंथांचे रक्षण करीन, असे बाबासाहेब एकदा म्हणाले होते. यावरून त्यांचे निखळ ग्रंथ व पुस्तक प्रेम दिसून येते. मात्र अलिकडे व्हॉट्सअ‍ॅप, इंटरनेट, फेसबुक व दूरचित्रवाहिण्यामुळे वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वाचन संसकृती टिकवून ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या ज्ञानार्जनाचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे आदर्श विद्यालयाला ग्रंथ भेट देण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने डॉ. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २०१५-१६ हे वर्ष ‘समता वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेऊन समता वर्षाचा प्रारंभ करण्यात आला. समता निर्माण करण्यासाठी संत व समाजसुधारकांच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन यावेळी झरी तालुक्याचे समता दूत सूरज चौधरी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव म.वि. वल्लपकर, नगराध्यक्ष करूणा कांबळे, प्रभारी मुख्याध्यापक अल्ताफ कुरेशी, जयंत साठे उपस्थित होते. संचालन वैजनाथ खडसे, प्रास्ताविक किशोर शंकावार, तर आभार किरण जाधव यांनी मानले. पिदूरकर, खुजे, बारमासे, गिरी, कांबळे, वल्लपकर, वऱ्हाटे, वरारकर आदींनी सहकार्य केले. (कार्यालय प्रतिनिधी)