शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही या, जलकुंभावर चढा

By admin | Updated: June 21, 2016 02:07 IST

नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्यांची अवस्था अतिशय विदारक आहे.

यवतमाळ : नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्यांची अवस्था अतिशय विदारक आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या लोकमत चमूने या ठिकाणी सोमवारी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता एक पुसद वगळता इतर ठिकाणच्या पाण्याच्या टाक्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. कुणीही या टाकीवर चढा, काहीही करा, अशी स्थिती ठिकठिकाणी दिसून आली. गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील कुलकुली गावात पाण्याच्या टाकीत विष टाकण्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. महिनाभरापूर्वी दारव्हा तालुक्यातील घनापूर येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीत विष कालवण्याचा प्रयत्न झाला होता. यामुळे जलसाठे आणि जलकुंभ किती सुरक्षित आहे याची पाहणी करण्यासाठी ‘लोकमत’ने सोमवारी स्टिंग आॅपरेशन केले, त्यात हे वास्तव उघडकीस आले. तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या मुख्यालयी यवतमाळ शहरातील तेथी जिवन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात असलेल्या दोन मोठ्या पाण्याच्या टाक्यांना कोणतीही सुरक्षा नाही. येथील गोदणी मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयातील आवारातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मोठ्या टाक्या आहेत. परंतु या टाक्यांना कोणतीही सुरक्षा नाही. कुणीही या कुणीही चढा, काहिही करा, अशी स्थिती या ठिकाणी सोमवारी दुपारी १.३० ते दोनच्या दरम्यान ‘लोकमत’चमूने प्रत्यक्ष अनुभवली. प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांच्या कक्षालगत असलेल्या या दोन पाण्याच्या टाक्यांची सुरक्षा किती चोख आहे, हे पाहण्यासाठी लोकमत चमुतील दोन सदस्य या ठिकाणी पोहचले. कुणीही चौकीदार नाही, गेट नाही, कुलूप नाही असे वास्तव येथे पाहायला मिळाले. त्यानंतर दहा मिनिटे खाली फोटो सेशन केल्यानंतर या टाक्यांवर असलेल्या पायऱ्याने वर चढले. परंतु कुणीही टोकले नाही. खालून वर, वरून खाली दोन-तीन राऊंड मारल्यानंतर आणि फोटो काढल्यानंतर जवळपास अर्ध्यातासानंतर एक व्यक्ती तिथे आली त्यांनी त्यांचा परिचय आॅपरेटर म्हणून दिला. यावेळी त्यांना या ठिकाणी टाकीवर चढण्यासाठी कुणी टोकत नाही का, अशी विचारणा केली असता, सावरा-सावर करीत त्यांनी आम्ही आहो ना, असे म्हटले. अहो पण आम्ही टाकीवर जाऊन आलो, असे सांगितल्यावर ते खजिल झाले आणि वरिष्ठांना कल्पना देतो, असे म्हणून निघून गेले. टाकीवर चढताना पायऱ्यांवर सुरूवातीला नाही म्हणायला एक छोटे लोखंडी गेट आहे. परंतु तेसुद्धा भंगार अवस्थेत सताड उघडे होते. कार्यालयीन वेळेत ही स्थिती होती तर सकाळी, रात्री किंवा सुटीच्या दिवशी या टाक्यांच्या सुरक्षेविषयी काय स्थिती असेल याची कल्पना न केलेली बरे. शहरातील लाखो लोकांना पाणी ज्या टाक्यांमधून पुरविले जाते, त्या टाक्यांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना या ठिकाणी नाहीत, ही बाब ध्यानात आल्यावर कुणाच्याही पायाखालून वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. यवतमाळ शहराप्रमाणेच वणी येथील पाणीपुरवठ्याची स्थिती अतिशय खालावलेली आहे. जीवन प्राधिकरणाकडून २० ते २५ वर्षांपूर्वीच पाणीपुरवठा यंत्रणा नगर परिषदेकडे हस्तांतरीत झाली आहे. टिळक चौकात शासकीय मैदानाजवळ असलेल्या या पाण्याच्या टाकीवर कुणीही या कधीही या आणि काहीही करा, अशी परिस्थिती अनुभवास मिळाली. कोणतीही सुरक्षा नाही, कुणी विचारायला तयार नाही. मोठ्या प्रमाणात गाळ साचलेल्या आणि अनेक वर्षांपासून स्वच्छ न केलेल्या या टाकीवर प्रत्यक्ष भेट दिलेल्या लोकमत चमुने पाहले व छायाचित्रही काढले. जीवन प्राधिकरणाकडून आणि वणी येथील नगर परिषदेकडून नागरिकांच्या जिवित्वाशी खेळ सुरू असल्याचेच यातून स्पष्ट होते. (लोकमत चमू) पुसद ठरले अपवाद४एकीकडे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ व वणी सारख्या शहरांमध्ये शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभांची सुरक्षा वाऱ्यावर असताना पुसद येथील जलकुंभांची सुरक्षा चोख असल्याचे दिसून आले. या ठिकाणी दुपारी साडेतीन वाजता लोकमत चमू पोहचली असता नगर परिषदेच्या जलकुंभाची कडेकोट सुरक्षा दिसून आली. या ठिकाणी संरक्षक भिंत असून चौकीदार गजानन इंगोले यांनी अडवून काय काम असल्याचे विचारले. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण माहिती दिली. मुख्य प्रवेशद्वारातून आत नेले.