शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

संचमान्यतेने कही खुशी-कही गम

By admin | Updated: March 31, 2016 03:01 IST

दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या संचमान्यता मंगळवारी मुख्याध्यापकांच्या हातात पडल्या.

शिक्षकेत्तरांचा गुंता कायमच : अनेक मुख्याध्यापक, शिक्षक ठरले अतिरिक्तविनोद ताजने वणीदोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या संचमान्यता मंगळवारी मुख्याध्यापकांच्या हातात पडल्या. संच मान्यता बघून शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. कही खुशी-कही गम, अशी स्थिती संचमान्यतेने केली आहे. जिल्ह्यातील ज्या माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिकचे वर्ग जोडलेले आहे, त्या शाळांची सुरू वर्षाची संच मान्यता अद्याप आली नाही. दोन्ही वर्षाच्या संचमान्यतेमध्ये शिक्षकेतराचा गुंताही सुटलाच नाही. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील संभ्रम अद्याप कायम आहे. माध्यमिक शाळांतील विद्यार्थी संख्येच्या आधारावर, त्या शाळेस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मान्य संख्या संचमान्यतेद्वारे दरवर्षी ठरविली जाते. मात्र मागील दोन वर्षांपासून संचमान्यता रखडल्या होत्या.माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी मंगळवारी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची सभा घेऊन सन २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षांच्या संचमान्यता तयार करून मुख्याध्यापकांच्या हाती दिल्या. शासनाच्या शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या शासन निर्णयाची सांगड जुळवून संचमान्यता तयार करणे, हे शिक्षण विभागापुढे मोठे आव्हान होते. तरीही ज्या माध्यमिक शाळांना अकरावी व बारावीचे वर्ग जोडलेले आहेत, त्यांच्या सन २०१५-१६ च्या संचमान्यता संपूर्ण राज्यातच तयार झाल्या नाही. तसेच शिक्षकेतरांच्या आकृतीबंधाचा फुगा न फुटल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजूर पदे संचमान्यतेमध्ये दाखविण्यात आलीच नाही. केवळ सध्या कार्यरत पदेच दाखविण्यात आली आहे. त्यामुळे आॅफ लाईन व आॅनलाईनचा गुंता कायमच आहे. आठवी ते दहावीचे वर्ग असणाऱ्या अनेक शाळांमध्ये नववी व दहावी मिळून ९० विद्यार्थी नसल्याने त्या शाळांना मुख्याध्यापक पद मान्य झाले नाही. परिणामी अनेक मुख्याध्यापक सुद्धा अतिरिक्त ठरले आहे. शिक्षक संस्था विद्यार्थी संख्येवर आधारित दिल्याने, काही शाळा दोन व तीन शिक्षकीही बनल्या आहे. मात्र शहरातील शाळांमध्ये भरपूर विद्यार्थी असल्याने त्या शाळांना अधिकची शिक्षक संख्या मान्य झाली आहे. त्यामुळे ‘कही खुशी-कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. तथापि वाढलेली शिक्षकांची पदे भरण्यास परवानगी नसल्याने पदे वाढूनही उपयोग नाही. अनेक शिक्षक, मुख्याध्यापक नवीन संचमान्यतेत अतिरिक्त ठरले आहे. त्यांचे समायोजन केले जाणार का?, याचीही कोंडी शिक्षण विभागाने अजून फोडली नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे. आता शाळांतील उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक ही पदेसुद्धा तुकडींच्या संख्येवर न ठरवता शाळेतील मान्य शिक्षकांच्या पदांचा संख्येवरून ठरविण्यात आली आहे. यामध्ये पाचवीवरील शिक्षकांची संख्या विचारात घेतली गेली नाही, हे विशेष.