शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

 पावसाची दडी, अनेकांनी पेरण्या आटोपल्याने चिंता; हवामानाचा अंदाज खोटा ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 20:53 IST

Yawatmal News यंदा पावसाने हूल दिल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पेरण्या केलेले शेतकरी चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्दे पावसाअभावी बियाणे करपण्याची शक्यता

यवतमाळ: यावर्षी हवामान खात्याचा अंदाज सपशेल खोटा ठरला. यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधी होणार, असे भाकित करण्यात आल्याने व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची टाेबणी केली खरी; परंतु जून महिन्याचा पंधरवडा उलटल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात वणी तालुक्यात पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे जमिनीतच करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दमदार पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने वारंवार केले असले तरी, वणी तालुक्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर कपाशी टोबणी उरकली. त्यानंतर या तालुक्यातील काही भागात केवळ दोनदा पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस शिंदोला, कायर, रासा, गणेशपूर, वणी या भागात कोसळला. आतापर्यंत महसूल मंडळात ५० मिमी पाऊस कोसळल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरच कपाशीची टोबणी उरकली. आता पाऊस नसल्याने शेतात असलेल्या जलस्त्रोताद्वारे कपाशीला पाणी दिले जात आहे. ज्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी पाऊस येईल, या आशेने कपाशीची टोबणी केली, त्या शेतकऱ्यांची टोबणी उलटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 या भागात पाहिजे त्या प्रमाणात पाऊसच नसल्याने अद्यापही उकाडा कायम आहे. या उकाड्याने नागरिक हैराण आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांनी खते व बियाणांची खरेदी करून त्याची साठवण आपल्या घरी करून ठेवली आहे. मात्र पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहे. वणी तालुक्यात आतापर्यंत तीन हजार ८९५ हेक्टरवर कपाशी, ६३५ हेक्टरवर तूर, ४५ हेक्टरवर सोयाबीन, अशा एकूण चार हजार ५७५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.

बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी - कृषी विभाग

वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी किमान ७५ ते १० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. तसेच बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी, असे आवाहन वणी तालुका कृषी अधिकारी सुशांत माने यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती