शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

राळेगाव तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:11 IST

शेतात जागलीस गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने फडशा पाडला. विहिरगाव शिवारात अडणी येथील शेतकऱ्याला ठार मारले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राळेगाव तालुक्यात वाघाचा हा सातवा बळी ठरला आहे. प्रशासनाकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

ठळक मुद्देसातवा बळी : मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : शेतात जागलीस गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने फडशा पाडला. विहिरगाव शिवारात अडणी येथील शेतकऱ्याला ठार मारले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राळेगाव तालुक्यात वाघाचा हा सातवा बळी ठरला आहे. प्रशासनाकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आणखी किती बळी जाऊ देणार, हा त्यांचा प्रश्न आहे.वडकी येथून दहा किलोमीटरवरील अडणी येथील चंडकू भोनू फुटकी (५०) हे स्वमालकीच्या विहिरगाव शिवारात असलेल्या शेतात जागलीसाठी गेले होते. दुपारपर्यंत घरी पोहोचले नाही. कुटुंबातील लोकांनी शोध घेतला असता वाघाने ठार मारलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह शेतापासून तीन किलोमीटर अंतरावर आढळून आला.शेतात असलेल्या झोपडीपासून दूरपर्यंत रक्त पडून असल्याचे आढळल्याने चंडकू यांचा शोध लागला. या शेतकऱ्याच्या शेतात तूर, कापूस ही पिके आहेत. त्याचे संरक्षण करण्यासाठी गेलेले चंडकू वाघाचे बळी ठरले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे. राळेगाव परिसरात वाघाची प्रचंड दहशत आहे. शेतकरी, शेतमजूर कामावर जाण्याची हिंमत करत नाही. परिणामी शेतीची कामे रखडली आहे, तर मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.वनविभागाने गुंडाळली वाघाची शोध मोहीमराळेगाव तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरू असताना वनविभागाने अर्ध्यावरच नरभक्षक वाघाची शोध मोहीम गुंडाळली. लोकांनी दिलेल्या माहितीची कुठलीही दखल घेतली जात नाही. परिसरात वाघ दिसल्याचे सांगितल्यानंतर वनविभागाकडून साधा शोध घेण्याचाही प्रयत्न केला जात नाही. शिवाय घटना घडल्यानंतर तातडीने पोहोचण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. वनविभागाच्या या भूमिकेमुळेच सखी कृष्णापूर येथे उपविभागीय अधिकारी व त्यांच्या पथकाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आता विहिरगाव येथील घटनेबाबतही तेच घडले. पोलीस पोहोचले मात्र वनविभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याची याठिकाणी उशिरापर्यंत उपस्थिती नव्हती. त्यामुळे नागरिकांनी चंडकू यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती.एसडीओंचे वाहन पेटवूनही बोध नाहीराळेगाव तालुक्यात वाघाचे बळी वाढत असतानाच गुराख्याला ठार मारल्याने नागरिकांनी सखी कृष्णापूर येथे राळेगाव उपविभागीय अधिकाºयांचे वाहन जाळले होते. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर सखी परिसरात वाघाचा शोध सुरू झाला. तब्बल १५ दिवस पथकाचा या ठिकाणी मुक्काम होता. ट्रॅप लावले, पिंजऱ्यामध्ये सावज सोडले. यानंतर मात्र वाघ पकडण्याची मोहीम थांबली. लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले असतानाही प्रशासनाकडून ठोस प्रयत्न झाले नाही.

टॅग्स :Tigerवाघ