शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

राळेगाव तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:11 IST

शेतात जागलीस गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने फडशा पाडला. विहिरगाव शिवारात अडणी येथील शेतकऱ्याला ठार मारले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राळेगाव तालुक्यात वाघाचा हा सातवा बळी ठरला आहे. प्रशासनाकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

ठळक मुद्देसातवा बळी : मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : शेतात जागलीस गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने फडशा पाडला. विहिरगाव शिवारात अडणी येथील शेतकऱ्याला ठार मारले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राळेगाव तालुक्यात वाघाचा हा सातवा बळी ठरला आहे. प्रशासनाकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आणखी किती बळी जाऊ देणार, हा त्यांचा प्रश्न आहे.वडकी येथून दहा किलोमीटरवरील अडणी येथील चंडकू भोनू फुटकी (५०) हे स्वमालकीच्या विहिरगाव शिवारात असलेल्या शेतात जागलीसाठी गेले होते. दुपारपर्यंत घरी पोहोचले नाही. कुटुंबातील लोकांनी शोध घेतला असता वाघाने ठार मारलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह शेतापासून तीन किलोमीटर अंतरावर आढळून आला.शेतात असलेल्या झोपडीपासून दूरपर्यंत रक्त पडून असल्याचे आढळल्याने चंडकू यांचा शोध लागला. या शेतकऱ्याच्या शेतात तूर, कापूस ही पिके आहेत. त्याचे संरक्षण करण्यासाठी गेलेले चंडकू वाघाचे बळी ठरले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे. राळेगाव परिसरात वाघाची प्रचंड दहशत आहे. शेतकरी, शेतमजूर कामावर जाण्याची हिंमत करत नाही. परिणामी शेतीची कामे रखडली आहे, तर मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.वनविभागाने गुंडाळली वाघाची शोध मोहीमराळेगाव तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरू असताना वनविभागाने अर्ध्यावरच नरभक्षक वाघाची शोध मोहीम गुंडाळली. लोकांनी दिलेल्या माहितीची कुठलीही दखल घेतली जात नाही. परिसरात वाघ दिसल्याचे सांगितल्यानंतर वनविभागाकडून साधा शोध घेण्याचाही प्रयत्न केला जात नाही. शिवाय घटना घडल्यानंतर तातडीने पोहोचण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. वनविभागाच्या या भूमिकेमुळेच सखी कृष्णापूर येथे उपविभागीय अधिकारी व त्यांच्या पथकाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आता विहिरगाव येथील घटनेबाबतही तेच घडले. पोलीस पोहोचले मात्र वनविभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याची याठिकाणी उशिरापर्यंत उपस्थिती नव्हती. त्यामुळे नागरिकांनी चंडकू यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती.एसडीओंचे वाहन पेटवूनही बोध नाहीराळेगाव तालुक्यात वाघाचे बळी वाढत असतानाच गुराख्याला ठार मारल्याने नागरिकांनी सखी कृष्णापूर येथे राळेगाव उपविभागीय अधिकाºयांचे वाहन जाळले होते. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर सखी परिसरात वाघाचा शोध सुरू झाला. तब्बल १५ दिवस पथकाचा या ठिकाणी मुक्काम होता. ट्रॅप लावले, पिंजऱ्यामध्ये सावज सोडले. यानंतर मात्र वाघ पकडण्याची मोहीम थांबली. लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले असतानाही प्रशासनाकडून ठोस प्रयत्न झाले नाही.

टॅग्स :Tigerवाघ