शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

राळेगाव तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:11 IST

शेतात जागलीस गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने फडशा पाडला. विहिरगाव शिवारात अडणी येथील शेतकऱ्याला ठार मारले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राळेगाव तालुक्यात वाघाचा हा सातवा बळी ठरला आहे. प्रशासनाकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

ठळक मुद्देसातवा बळी : मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : शेतात जागलीस गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाने फडशा पाडला. विहिरगाव शिवारात अडणी येथील शेतकऱ्याला ठार मारले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राळेगाव तालुक्यात वाघाचा हा सातवा बळी ठरला आहे. प्रशासनाकडून बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आणखी किती बळी जाऊ देणार, हा त्यांचा प्रश्न आहे.वडकी येथून दहा किलोमीटरवरील अडणी येथील चंडकू भोनू फुटकी (५०) हे स्वमालकीच्या विहिरगाव शिवारात असलेल्या शेतात जागलीसाठी गेले होते. दुपारपर्यंत घरी पोहोचले नाही. कुटुंबातील लोकांनी शोध घेतला असता वाघाने ठार मारलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह शेतापासून तीन किलोमीटर अंतरावर आढळून आला.शेतात असलेल्या झोपडीपासून दूरपर्यंत रक्त पडून असल्याचे आढळल्याने चंडकू यांचा शोध लागला. या शेतकऱ्याच्या शेतात तूर, कापूस ही पिके आहेत. त्याचे संरक्षण करण्यासाठी गेलेले चंडकू वाघाचे बळी ठरले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे. राळेगाव परिसरात वाघाची प्रचंड दहशत आहे. शेतकरी, शेतमजूर कामावर जाण्याची हिंमत करत नाही. परिणामी शेतीची कामे रखडली आहे, तर मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.वनविभागाने गुंडाळली वाघाची शोध मोहीमराळेगाव तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरू असताना वनविभागाने अर्ध्यावरच नरभक्षक वाघाची शोध मोहीम गुंडाळली. लोकांनी दिलेल्या माहितीची कुठलीही दखल घेतली जात नाही. परिसरात वाघ दिसल्याचे सांगितल्यानंतर वनविभागाकडून साधा शोध घेण्याचाही प्रयत्न केला जात नाही. शिवाय घटना घडल्यानंतर तातडीने पोहोचण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. वनविभागाच्या या भूमिकेमुळेच सखी कृष्णापूर येथे उपविभागीय अधिकारी व त्यांच्या पथकाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आता विहिरगाव येथील घटनेबाबतही तेच घडले. पोलीस पोहोचले मात्र वनविभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याची याठिकाणी उशिरापर्यंत उपस्थिती नव्हती. त्यामुळे नागरिकांनी चंडकू यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती.एसडीओंचे वाहन पेटवूनही बोध नाहीराळेगाव तालुक्यात वाघाचे बळी वाढत असतानाच गुराख्याला ठार मारल्याने नागरिकांनी सखी कृष्णापूर येथे राळेगाव उपविभागीय अधिकाºयांचे वाहन जाळले होते. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर सखी परिसरात वाघाचा शोध सुरू झाला. तब्बल १५ दिवस पथकाचा या ठिकाणी मुक्काम होता. ट्रॅप लावले, पिंजऱ्यामध्ये सावज सोडले. यानंतर मात्र वाघ पकडण्याची मोहीम थांबली. लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले असतानाही प्रशासनाकडून ठोस प्रयत्न झाले नाही.

टॅग्स :Tigerवाघ