शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

कालबाह्य बसमुळे प्रवाशांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:31 IST

पांढरकवडा शहरात नाण्यांची टंचाई पांढरकवडा : शहरात सध्या चिल्लर नाण्यांची टंचाई जाणवत असून ग्राहकांना अधिकचे पैसे द्यावे लागत आहे. ...

पांढरकवडा शहरात नाण्यांची टंचाई

पांढरकवडा : शहरात सध्या चिल्लर नाण्यांची टंचाई जाणवत असून ग्राहकांना अधिकचे पैसे द्यावे लागत आहे. व्यावसायिकांनी तर चिल्लर ऐवजी चॉकलेट देण्याचा फंडा सुरू केला आहे. काही व्यावसायिक मात्र चिल्लर असूनही ग्राहकांच्या हाती पाच, सात रूपयांचे चॉकलेट ठेवत आहे. तर अनेक ग्राहक एक-दोन रूपये चिल्लर न घेताच परत जात असल्याचे चित्र आहे.

भरधाव वाहनावर नियंत्रणाची गरज

पांढरकवडा : येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून वाहने भरधाव जात असल्याने अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहे. या महामार्गावरील ट्रक सारखी वाहने तर प्रचंड वेगात असतात. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. येथील वाहतूक पोलिसांनी यावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

अधिकाऱ्यांच्या नावावर वसुली सुरू

पांढरकवडा : येथील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावावर त्याच विभागातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी विविध कारणे सांगत अवैध व्यावसायिकांकडून वसुली सुरू केलेल्याचे सांगितले जात आहे. या वसुलींच्या गोरख धंद्याबाबत काही वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ असल्याचेही सांगितले जात आहे. अनेक कनिष्ठ कर्मचारी अवैध व्यावसायिकांकडे चकरा मारताना ही दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आधारवरील मोबाईल क्रमांक बनले डोकेदुखी

मारेगाव : आधार कार्ड आता आवश्यक दस्ताऐवज बनले आहे. आधार कार्ड अपडेट नसेल तर फार अडचण येते. त्यातच आधार कार्डवर अनेक योजनेत मोबाईल नंबर आवश्यक असल्याने आता हा मोबाईल नंबर आधार कार्ड धारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेकांनी ज्या सीमकार्ड कंपनीचा प्लॅन स्वस्त ते सीमकार्ड घेणे सुरू केल्याने अनेकांचे जुने मोबाईल नंबर आता बंद झाले आहे. त्यामुळे आता आधार कार्ड लिंक होत नसल्याने आधार कार्ड दुरूस्तीसाठी शहरात एकमेव असलेल्या पोस्टातील सेंटरवर नागरिकांची दुरूस्तीसाठी गर्दी होत आहे. आठ-आठ दिवस नंबर लागत नसल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कामाचा वेग वाढविण्यात यावा, अशी मागणी आहे.

वीज चोरी वाढली ; कारवाईची मागणी

मारेगाव : तालुक्यातील अनेक गावात विद्युत वाहिनीवर आकोडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु याकडे वीज वितरण कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याबाबत महावितरणने कठोर पावले उचलून कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

झुंजाईचा धबधबा ठरतोय आकर्षण

मारेगाव : तालुक्यातील वर्धा नदीवर असलेला झुंजाई येथील प्रेक्षणीय धबधबा सर्वांनाच आकर्षित करीत असून पर्यटकासाठी विशेषता तरूणांसाठी हा धबधबा आकर्षणाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी गर्दी वाढली असून सुरक्षेच्या दृष्टीने मात्र कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी बरेचदा याठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.